शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

शेडबाळ-वैशाली विशेष रेल्वेची जैन समाजाची मागणी

By admin | Updated: December 24, 2015 01:05 IST

त्रिदिवसीय जन्मकल्याणक महोत्सव : वैशालीच्या विकासासाठी निधी द्या

बाहुबली : तीर्थंकर भगवान महावीर यांची जन्मभूमी वासोकुण्ड, वैशाली (बिहार) येथे १९ एप्रिल २०१६ रोजी त्रिदिवसीय जन्मकल्याणक महोत्सव होणार आहे. यासाठी पूज्य आचार्य विद्यानंदी महाराज यांचे जन्म ठिकाण शेडबाळ (कर्नाटक) ते वैशाली (बिहार) दरम्यान रेल्वे सुरू करावी. तसेच वैशालीच्या विकासासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी जैन बांधवांच्या राष्ट्रीय पातळीवर कुंदकुन्द ट्रस्ट दिल्ली, दक्षिण भारत जैन सभा, समस्त जैन समाजाने केली आहे. कोल्हापूरचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक, स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक यांच्या सान्निध्यात दक्षिण भारतातील जैन बांधवांना प्रेरित करण्यासाठी या सभेचे बाहुबली येथील एडोमेन्ट ट्रस्ट येथे आयोजन केले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी कल्लाप्पाणा आवडे होते. यावेळी बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजक लाल बहादूर विश्वविद्यालय जैन विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमार उपाध्ये (दिल्ली) यांनी भगवान महावीरांच्या जन्मस्थळ वैशाली येथे निर्माणाधिन विविध मंदिरांबद्दल माहिती दिली. आवाडे यांनी दक्षिण भारतात सर्वाधिक जैन समाज आहे तो अशा धार्मिक समारंभाना सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. यावेळी सतीशचंद्र जैन, माजी न्यायमूर्ती सनत्कुमार आरवाडे, अनिल जैन (कॅनडा), राजकुमार जैन (दिल्ली), रावसाहेब पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भट्टारक स्वामींनी आशीर्वचन दिले. बाहुबलीवरील प्रतिकात्मक मानस्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मिलिंद फडे पुणे, ए. ए. कापसे, महावीर गाठ, बी. टी. बेडगे, श्रीधर हेरवडे, रावसाहेब पाटील, डी. सी. पाटील उपस्थित होते.वैशाली पंचकल्याणकच्या निमित्ताने दक्षिण व उत्तर भारतातील जैन बांधवतील दरी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे जैन बांधवांमध्ये उत्साह पहावयास मिळत होता.