शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिसरकारच्या अमृतमहोत्सवाचा ‘जागर’; येडेमच्छिंद्र ग्रामस्थांचा निर्धार; ‘लोकमत’च्या लेखाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:10 IST

शिरटे : ‘सातारचे प्रतिसरकार...गळालेल्या पानातील स्वातंत्र्याची रत्ने’ या शीर्षकाखालील लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) या क्रांतिसिंहांच्या गावाने पुढाकार घेत या स्वातंत्र्यलढ्याचा ‘जागर’ करण्याचा निर्धार केला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा लढा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची वास्तवता दोन लेखांद्वारे मांडण्यात आली होती. दोन्ही लेखांचे ...

शिरटे : ‘सातारचे प्रतिसरकार...गळालेल्या पानातील स्वातंत्र्याची रत्ने’ या शीर्षकाखालील लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) या क्रांतिसिंहांच्या गावाने पुढाकार घेत या स्वातंत्र्यलढ्याचा ‘जागर’ करण्याचा निर्धार केला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा लढा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची वास्तवता दोन लेखांद्वारे मांडण्यात आली होती. दोन्ही लेखांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या अनुषंगाने क्रांतिसिंहांचे गाव असलेल्या येडेमच्छिंद्र येथे मंगळवारी (दि. २) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून पर्यायी यंत्रणा उभारून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते. प्रतिसरकारच्या स्थापनेस यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात क्रांतिसिंहांच्या अलौकिक कार्याचा विसर पडू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. क्रांतिसिंहांचे कार्य नव्या पिढीपुढे मांडण्यासाठी, त्यांच्या शौर्याचे स्मरण करून प्रेरणास्रोत म्हणून त्यांच्या स्मृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे.लेखातून मांंडल्या गेलेल्या या विषयावर उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजता ज्योतिर्लिंग मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रतिसरकारचा अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करून नियोजन केले जाणार आहे.लेखाच्या प्रतींचे वाटप‘जागर’ या सदरामधून सलग दोन रविवारी प्रसिद्ध केलेल्या लेखाच्या पाचशे छायांकीत प्रती येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव पाटील व हौसेराव पाटील यांनी घरोघरी वाटल्या. ग्रामस्थांमधून यामुळे जागृती निर्माण झाली. त्यामुळे बैठकीबाबतचे नियोजन करण्यात आले.प्रतिसरकार हे तत्कालीन सातारा जिल्ह्यात स्थापन झाले होते. शासनाने हे लक्षात घेऊन सातारा येथे क्रांतिसिंहांचे भव्य दिव्य स्मारक उभारणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात मांडलेल्या प्रतिसरकारचे सर्व शिलेदार व नानकसिंग यांच्याविषयीची माहिती नवयुवकांना प्रेरणा देणारी आहे.- आनंद पाटील, शिक्षक, महादेववाडी (ता. वाळवा)