शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिसरकारच्या अमृतमहोत्सवाचा ‘जागर’; येडेमच्छिंद्र ग्रामस्थांचा निर्धार; ‘लोकमत’च्या लेखाची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:10 IST

शिरटे : ‘सातारचे प्रतिसरकार...गळालेल्या पानातील स्वातंत्र्याची रत्ने’ या शीर्षकाखालील लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) या क्रांतिसिंहांच्या गावाने पुढाकार घेत या स्वातंत्र्यलढ्याचा ‘जागर’ करण्याचा निर्धार केला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा लढा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची वास्तवता दोन लेखांद्वारे मांडण्यात आली होती. दोन्ही लेखांचे ...

शिरटे : ‘सातारचे प्रतिसरकार...गळालेल्या पानातील स्वातंत्र्याची रत्ने’ या शीर्षकाखालील लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) या क्रांतिसिंहांच्या गावाने पुढाकार घेत या स्वातंत्र्यलढ्याचा ‘जागर’ करण्याचा निर्धार केला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा लढा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची वास्तवता दोन लेखांद्वारे मांडण्यात आली होती. दोन्ही लेखांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या अनुषंगाने क्रांतिसिंहांचे गाव असलेल्या येडेमच्छिंद्र येथे मंगळवारी (दि. २) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून पर्यायी यंत्रणा उभारून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते. प्रतिसरकारच्या स्थापनेस यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात क्रांतिसिंहांच्या अलौकिक कार्याचा विसर पडू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. क्रांतिसिंहांचे कार्य नव्या पिढीपुढे मांडण्यासाठी, त्यांच्या शौर्याचे स्मरण करून प्रेरणास्रोत म्हणून त्यांच्या स्मृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे.लेखातून मांंडल्या गेलेल्या या विषयावर उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजता ज्योतिर्लिंग मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रतिसरकारचा अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करून नियोजन केले जाणार आहे.लेखाच्या प्रतींचे वाटप‘जागर’ या सदरामधून सलग दोन रविवारी प्रसिद्ध केलेल्या लेखाच्या पाचशे छायांकीत प्रती येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव पाटील व हौसेराव पाटील यांनी घरोघरी वाटल्या. ग्रामस्थांमधून यामुळे जागृती निर्माण झाली. त्यामुळे बैठकीबाबतचे नियोजन करण्यात आले.प्रतिसरकार हे तत्कालीन सातारा जिल्ह्यात स्थापन झाले होते. शासनाने हे लक्षात घेऊन सातारा येथे क्रांतिसिंहांचे भव्य दिव्य स्मारक उभारणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात मांडलेल्या प्रतिसरकारचे सर्व शिलेदार व नानकसिंग यांच्याविषयीची माहिती नवयुवकांना प्रेरणा देणारी आहे.- आनंद पाटील, शिक्षक, महादेववाडी (ता. वाळवा)