शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

करवीर पंचायत समितीचे काम सुरळीत होण्यासाठी दोन आठवडे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

कसबा बावडा : पुराच्या पाण्यात बुडालेल्या करवीर पंचायत समितीमधील पुराचे पाणी आता पूर्णपणे ओसरले असले तरी पंचायत समितीचे ...

कसबा बावडा : पुराच्या पाण्यात बुडालेल्या करवीर पंचायत समितीमधील पुराचे पाणी आता पूर्णपणे ओसरले असले तरी पंचायत समितीचे कामकाज सुरळीत सुरू होण्यासाठी तब्बल दोन आठवड्यांचा कालावधी जावा लागणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या पंचायत समितीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिलेली नाही.

करवीर पंचायत समिती जयंती नाल्याच्या शेजारी आहे. त्यामुळे पूर आला की नाल्याचे पाणी पंचायतीच्या आवारात हमखास येते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ साली आलेल्या पुरात पंचायत समिती बुडाली होती. त्यावेळी दफ्तर खराब झाले होते. तब्बल पंधरा दिवस कर्मचारी दफ्तर वाढविण्याचे कामच करत होते. आता मात्र कर्मचाऱ्यांनी सावध होऊन पुराचे पाणी वाढत असतानाच दफ्तराची बांधाबांध करून ते मेन राजाराम हायस्कूलमध्ये हलवले. त्यामुळे दफ्तर वाचले, मात्र अन्य साहित्य पुराच्या पाण्यात बुडून खराब झाले आहे.

तब्बल दहा फूट पाणी पंचायत च्या सर्व विभागात होते. त्यामुळे लाखडी टेबल-खुर्च्या, फर्निचर खराब झाले आहे . ठिकठिकाणचे वायरिंग तुटले आहे. स्विच खराब झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा कुलरही खराब झाला आहे. सर्व विभाग चिखलाने माखले आहेत. त्याच्या स्वच्छतेसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. स्वच्छतेसाठी लागणारे खराटा, झाडू, फिनेल, पाण्याचा टँकर हे कुठून आणायचे आणि त्यासाठी पैसे खर्च कोण करणार असा प्रश्नही कर्मचारी वर्गातून उपस्थित होत आहे. एकंदरीत पंचायत समितीचे कामकाज सुरळीत होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे.

चौकट: आज सभापती पदाची निवड

करवीर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी पाटील यांनी राजीनामा दिल्याने आज, गुरुवारी नूतन सभापती पदाची निवड पंचायत समितीच्या सभागृहात होणार आहे. त्यामुळे सभागृहाची स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे.

फोटो: पुरात बुडालेल्या करवीर पंचायत समितीमध्ये साफसफाई करताना पंचायतच्या महिला कर्मचारी.

(फोटो: रमेश पाटील )