शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

‘आयटी’ कधी समजणार ?

By admin | Updated: September 1, 2015 00:19 IST

तरुणाईचा सवाल : ‘कोल्हापूर संवाद’मध्ये विविध समस्यांचे गाऱ्हाणे

कोल्हापूर : ‘लोकमत’च्या ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ या विशेष पुरवणीच्या माध्यमातून कोल्हापुरातील तरुण मोठ्या प्रमाणात परदेशात नोकरी व व्यवसायासाठी असल्याचे समजले; पण ‘आयटी’चे महत्त्व कोल्हापूरला कधी कळणार, अशी विचारणा ‘कोल्हापूूर संवाद’ या कार्यक्रमात तरुणाईने केली. भ्रष्टाचारमुक्त महापालिका कारभाराबरोबर विविध समस्यांबाबतची गाऱ्हाणीही यावेळी परखडपणे मांडली. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावतीने सोमवारी शाहू स्मारक भवन येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूर संवाद’चे आयोजन केले होते. त्यामध्ये विविध महाविद्यालयांच्या तरुणांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या रुपरेषेबाबत बोलताना संयोजक सतेज पाटील म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीचा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा हा जनतेतून तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात साहित्य, अर्थतज्ज्ञ, ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्याशी संवाद साधून त्यांच्या महापालिकेकडून कोणत्या अपेक्षा आहेत, हे जाणून घेतले. तरुण हा राजकारणातील महत्त्वाचा घटक असल्याने त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.कोल्हापुरातच ‘आय.टी.’ पार्क होणे गरजेचे असल्याचे मयूर पाटील (डी. वाय. पाटील अभियांत्रिकी) याने सांगितले. कोल्हापूरकरांना ‘आयटी’चे महत्त्व कधी कळणार, अशी विचारणा भूषण जाधव याने केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका, अशी सूचना आदम शेख (केआयटी कॉलेज), शामल निगवेकर (न्यू कॉलेज) यांनी केली. आर्टस्च्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळत नसल्याची खंत कार्तिक पाटील (डी. वाय. पाटील अभियांत्रिकी) व केतन पायमल (दळवीज आर्टस्) यांनी व्यक्त केली. पासपोर्टची व्यवस्था येथे करावी, अशी मागणी ज्योती चव्हाण हिने केली. यावेळी सूरज माळी (शहाजी लॉ कॉलेज), आकाश वाली, सत्यजित कदम, प्रणाली पांडव, वैष्णवी उलपे, अवधूत गायकवाड, वीरेंद्र पाटील, शिवराज जाधव, अक्षय सावंत, गुणभूषण बहारिया, आकाश पुरेकर यांनीही विविध प्रश्न उपस्थित केले. यावेळी प्रतिमा सतेज पाटील, ऋतूराज पाटील उपस्थित होते. उमेदवारांना आचारसंहिता !काँग्रेसकडून उमेदवारी देताना काही आचारसंहिता देणार आहे. नगरसेवक झाल्यानंतर मोबाईल बंद नाही, चोवीस तास नागरिकांच्या संपर्कात, सकाळी तासभर घरात थांबून नागरिकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत, अशा अटीवरच उमेदवारी देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.वह्या मुलांपर्यंत पोहोचतात का?आपल्या वाढदिवसानिमित्त गोळा करण्यात आलेल्या वह्या मुलांपर्यंत पोहोचतात का? असा सवाल करत प्राथमिक शाळा पार्किंग व जनावरांचे अड्डे बनल्याचे प्रियांका ससे हिने सांगितले.