शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ कोणी घ्यायची हेच ठरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पुढे या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पध्दतीही निश्चित ...

कोल्हापूर : कोरोनामुळे राज्य शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पुढे या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पध्दतीही निश्चित केली. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. पण, ही सीईटी शिक्षण विभाग, राज्य परीक्षा परिषद, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग (एसएससी, एचएससी बोर्ड) यापैकी कोणी घ्यायची हेच अद्याप ठरलेेले नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सीईटीची तारीख लवकर जाहीर करावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

मूल्यांकनाची पध्दती निश्चित झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यात सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण ‌विभागाने घेतला. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी असणार आहे. त्यासाठी शंभर गुणांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा पेपर असणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी दोन तासांची वेळ विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. सीईटी देण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती असणार नाही. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या जागा शिल्लक राहतील, त्यावर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांना मूल्यांकन पध्दतीने दहावीला मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांची महाविद्यालयनिहाय निवड यादी जाहीर करून त्यांना अकरावीमध्ये प्रवेश दिला जाईल. दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एक महिना उरला आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी सीईटी घेतल्यास ते पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सीईटी कोणी घ्यायची हे लवकर निश्चित होऊन या परीक्षेची तारीख जाहीर होणे आवश्यक आहे.

चौकट

शासन आदेशाची प्रतीक्षा

कोल्हापूर शहरात अकरावीची केंद्रीय प्रवेश परीक्षा आम्ही ऑनलाईन पध्दतीने राबवित आहोत. यावर्षी शासन आदेशानुसार सीईटी घेण्याची आमची तयारी आहे. त्याबाबतच्या शासन आदेशाची आम्ही प्रतीक्षा करत असल्याचे सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.

विद्यार्थी, पालक काय म्हणतात?

आमचे मूल्यांकन पूर्ण करून पुढील महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होणार असेल, तर सीईटीची तारीख लवकर जाहीर करावी. ज्यामुळे आम्हाला या परीक्षेची तयारी करता येईल.

- अनुराग पोवार, विद्यार्थी, टेंबलाईवाडी.

आकडेवारी दृष्टिक्षेपात...

दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी : ५६७६४

मुलांची संख्या : ३१६२३

मुलींची संख्या : २५१४१

अकरावी प्रवेशाच्या जिल्ह्यातील जागा : ३५०००

जिल्ह्यातील महाविद्यालये : १५०

अकरावी प्रवेशाच्या शहरातील जागा : १४६००

शहरातील महाविद्यालये : ३५