शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारीत भागीदारी हेच आमदारांचे कर्तृत्व --: विनय कोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:17 IST

सन २००४ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना करून पहिल्याच प्रयत्नांत राज्यातून चार आमदार निवडून आणणारे आणि राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सत्तेत आणणारे या पक्षाचे संस्थापक विनय कोरे पुन्हा एकदा शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची विविध विषयांवरील रोखठोक मते.

ठळक मुद्दे विनय कोरे --रोखठोकविरोधकांनी गुºहाळघरही सुरू केले नाही; सत्यजित पाटील यांच्यावर घणाघात; ‘जनसुराज्य’चे विलीनीकरण नाही

समीर देशपांडे ।’ प्रश्न : गेल्या १५ वर्षांमध्ये आपला पक्ष विलीन करण्याची खूप चर्चा झाली. तुमची भूमिका काय ?उत्तर - मी सन १९९९ मध्ये आमदार झालो. मात्र, आमदार हा राज्याच्या हिताचे धोरण ठरवितो हा विचार पुढे नेण्यासाठी मी पक्षाची स्थापना केली. आपण पक्ष विलीन करणार नाही. आघाडी सरकारच्या काळात मला तसा आग्रह होता. मात्र, भाजपने माझ्यावर दबाव टाकला नाही. उलट ज्यांना प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळाली नाही त्यांना ‘जनसुराज्य’ची उमेदवारी दिली.

’ प्रश्न : तुमच्या या स्वतंत्र बाण्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातूनही काढण्याचा प्रयत्न झाला, हे खरे आहे का ?उत्तर - होय, खरे आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मी लोकसभेला नांदेडमधून प्रीती शिंदे या धनगर समाजाच्या युवतीला उमेदवारी दिली. त्यावेळी मी चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. हा राग धरून मला मंत्रिमंडळातून काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आम्ही कार्यक्षेत्र वाढवले. त्याची अनेकांनी धास्ती घेतली आणि आमची कोंडी करायला सुरू केली. त्यांचा मध्यंतरीच्या काही वर्षांत आम्हाला मोठा त्रास झाला.

’ प्रश्न : विद्यमान आमदारांच्या कामाबाबत आपले मत काय?उत्तर - रस्ते, गटर्स ही कामे प्रत्येक आमदार करीत असतो. शासनाच्या योजनांमधून ती होतच राहतात. तुम्ही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काय केलात हे महत्त्वाचे ठरते. विद्यमान आमदारांनी आपला भाऊ आणि मेहुणा यांना मोठे ठेकेदार बनविले आणि आपण त्यात भागीदार बनले हेच त्यांचे मोठे कर्तृत्व. बाकी विकास नाहीच

’ प्रश्न : शिक्षण, रोजगाराबाबत शाहूवाडीची स्थिती काय आहे?उत्तर - ज्या शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे करण्याचा कायदा केला त्यांच्याच नावाच्या तालुक्यामध्ये ५ वी ते ७ या तीन वर्गात १८५०० मुले शिकतात आणि ८ आणि ९ वी या दोन वर्गांत ८००० मुले, मुली शिकतात हे शाहूवाडी तालुक्याचे भीषण शैक्षणिक वास्तव आहे. शाहूवाडीतील १०० मुलांना शिक्षण सोडून लोणावळ्याच्या एकाच हॉटेलमध्ये काम करावे लागते ही वस्तुस्थिती आहे. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील बेरोजगारांसाठी विद्यमान आमदारांनी एक साधे गुºहाळघरही सुरू केले नाही.

’ प्रश्न : अमर पाटील यांच्याबरोबरचा संघर्ष कसा संपवलात?उत्तर - मी अमरभाऊंना हे पटवून दिले की तुम्ही आणि मी दोघेही जनतेसाठी काम करीत आहोत. दोघांच्या भांडणामध्ये ज्या जनतेसाठीच हा डाव मांडला आहे त्यांची कामेच होणार नाहीत. तुम्ही तुमचा गट स्वतंत्र ठेवा. यापुढच्या काळात जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ, तिथे मी तुमच्या पाठीशी राहतो. ही भूमिका पटल्यानेच अमरभाऊ आणि कर्णसिंह गायकवाड यांनी माझ्यासमवेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

’ प्रश्न : तुमचा विकासाचा अजेंडा काय आहे?उत्तर - आमचा पक्ष ज्या सुराज्य संकल्पनेवर आधारित आहे त्यांची अंमलबजावणी हेच माझे ध्येय आहे. आपला विकास आपणच केला पाहिजे; परंतु लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातून सक्षम लोकप्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी जनतेने पार पाडली पाहिजे. दहशतमुक्त, सुरक्षित, रस्ते, आरोग्य, पिण्याचे पाणी, रोजगार यासह त्यासाठी जीवन समाधानाने जगता यावे, असा समाज निर्माण व्हावा हाच माझा अजेंडा आहे. यावेळी जनतेला माझे हे मत पटविण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

 

पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांचे चित्र बदलून दाखविणार आहे. दहशतमुक्त, सुरक्षित, रस्ते, आरोग्य, पिण्याचे पाणी, रोजगार यांसह जीवन समाधानाने जगता यावे, असा समाज निर्माण व्हावा हाच माझा अजेंडा आहे.- विनय कोरे

 

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकkolhapurकोल्हापूरVinay Koreविनय कोरे