शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ‘आयटी पार्क’ उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नजीकच्या काळात आयटी पार्क उभारण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत. टाटा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नजीकच्या काळात आयटी पार्क उभारण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत. टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड, विप्रो, इन्फोसिस, आदी कंपन्यांशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कागल पंचतारांकित एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांची कामे आणि २५ कोटींच्या विद्युतीकरणाचे काम उद्योगमंत्री सुभाष देसाई व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले आहे. कोल्हापुरात नव्यानेच आलेल्या एसकेएलसारख्या कंपन्यांसह इतर कंपन्यांमधून शेकडो आयटीयन्स शिकून तयार आहेत. कोरोना महामारीची जागतिक स्थितीमुळे आयटी पार्क निर्मितीच्या कामाची गती थोडीशी कमी झाली असली तरी आयटी पार्कही लवकरच सुरू होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

दृष्टिक्षेपात पंचतारांकित औद्योगिक वसाहत-

एकूण भूखंड - १५००

उद्योग व व्यवसाय सुरू भूखंड -१ हजार

कायमस्वरुपी कर्मचारी - ४० हजार

कंत्राटी कर्मचारी- १२ हजार

रोजंदारी - ८ हजार

प्रमुख कंपन्या -

किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, इंडो-काउंट इंडस्ट्रीज लिमिटेड, रेमंड लक्झरी कॉटन्स लि., घाटगे-पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड, मेट्रो हायटेक को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क, नागरिका एक्सपोर्ट, ग्रासिम प्रीमियम फॅब्रिक्स प्रा. लि., सुदर्शन जीन्स प्रा. लि., अंशुल स्टील, आदी नामवंत कंपन्या.

औद्योगिक वसाहतीसाठी यांचे ठरले योगदान

तत्कालीन उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी औद्योगिक वसाहतीचा दर्जा दिला.

१९९९ मध्ये हसन मुश्रीफ आमदार झाल्यानंतर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा दर्जा.

सिद्धनेर्ली येथून दूधगंगा नदीवरून पाणी आणल्यानंतर खऱ्या अर्थाने या एमआयडीसीची वाटचाल सुरू.

सिद्धनेर्लीचे स्वर्गीय पांडुरंग दादू पाटील यांनी पाणी योजनेच्या जॅकवेलसाठी स्वतःची जमीन दिली.

त्या कार्यक्रमाला स्वर्गीय मंत्री पतंगराव कदम आले होते.

फोटो ओळी :

१)

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत उद्योगमंत्री सुभाष देसाई व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून २५ कोटी खर्चून मुख्य रस्त्याचे आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विद्युतीकरणामुळे मुख्य रस्ता असा उजळून गेला होता. (फोटो-२५०५२०२१-कोल-कागल एमआयडीसी)

२)

औद्योगिक वसाहतीमधील मुख्य चौक असा देखणा दिसत आहे. (फोटो-२५०५२०२१-कोल-कागल एमआयडीसी०१)