शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

नागरिकच डेंग्यू, चिकुनगुण्याची काळजी घेत नसल्याचे स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:24 IST

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत शहरातील विविध भागात डेंग्यू, चिकुनगुण्या साथरोग नियंत्रणाकरिता डास-अळींचे सर्वेक्षण करण्यात आले. ...

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत शहरातील विविध भागात डेंग्यू, चिकुनगुण्या साथरोग नियंत्रणाकरिता डास-अळींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात २६७७ घरे तपासण्यात आली, तर या घरात वापरासाठी साठविण्यात येणाऱ्या ४६५५ कंटेनर पैकी २२ कंटेनरमध्ये डास-अळी आढळल्या. दूषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले आहे.

मंगळवारी ई वाॅर्डातील धरतीमाता कॉलनी, लिशा हॉटेल, पर्ल्स हॅास्पिटल, आंबेडकर नगर, जातपडताळणी ऑफिस, पत्रकार नगर, संजय गांधी, गायकवाड हौ. सोसा., भंडारी गल्ली, मेथे गल्ली, कपूर वसाहत, कामगार चाळ, कदमवाडी, सह्याद्री सोसा., मदारी वसाहत, माळ गल्ली, कोपार्डे गल्ली, यशोदा पार्क, कारे मळा, शिवराज कॉलनी, गजानन कॉलनी, वैशाली अपार्ट., धुमाळ कॉलनी, गव्हर्न्मेंट कॉलनी, दत्त हौ. सोसायटी, आदी ठिकाणी डास-अळीचे सर्वेक्षण करण्यात आले.

महानगरपालिकेमार्फत वारंवार जनजागृती करूनही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून जनजागृती करूनदेखील पुन्हा पुन्हा सर्वेक्षण करावे लागत आहे. डेंग्यू, चिकुनगुण्या यासारख्या आजारांना पळवून लावायचे असेल तर घराघरांत नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

- काय करायला पाहिजे -

- सेप्टिक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविण्यात यावी

- पाण्याचे पिंप, भांडी भरून एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.

- फ्रिजमधील डिफ्रॉस ट्रे मधील पाणी आठ दिवसांतून एकदा रिकामे करावे.

- घराजवळील रिकामे टायर्स्, नारळाच्या करवंटया, डबे यात पाणी साठू देऊ नये.

- डास प्रतिबंधक कॉईल तथा क्रिम वापरावी.