शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चिखलीकरांच्या पुनर्वसन जागेची प्रॉपर्टी कार्डे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील ग्रामस्थांचे सोनतळी येथे पुनर्वसन केले. मात्र त्या जागेची प्रॉपर्टी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथील ग्रामस्थांचे सोनतळी येथे पुनर्वसन केले. मात्र त्या जागेची प्रॉपर्टी कार्डे मिळत नसल्याने घरांच्या बांधकामासाठी बँकांकडून कर्जे मिळत नाहीत. यासाठी या जागेचे संबंधितांच्या नावांची प्रॉपर्टी कार्डे करून द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवाजी पुलावर आले असता, त्यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यात १९८९ ला आलेल्या महापुरात प्रयाग चिखलीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर शासनाने संबंधित पूरग्रस्तांना सोनतळी येथे घरे बांधण्यासाठी जागा दिल्या. जागांचे वाटप होऊन ३२ वर्षे झाली; मात्र अद्यापही शेती म्हणूनच सात-बारा पत्रकी नोंद आहे. प्राॅपर्टी कार्ड नसल्याने ग्रामस्थांना कर्ज मिळत नाही, परिणामी घरे बांधता येत नाहीत. तरी संबंधितांना प्रॉपर्टी कार्डे काढून द्यावीत. त्याचबरेाबर २०१९ मध्ये नुकसान झालेल्यांना अद्याप ९५ हजार रुपयांची मदत मिळालेली नाही. त्याशिवाय कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावर कमान पद्धतीने पूल बांधावेत, या मागण्यांचे निवेदन प्रयाग-चिखली ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.