शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

सभागृह नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: September 21, 2015 00:07 IST

वाळवा पंचायत समिती : वसंतदादांच्या प्रेमापोटी काँग्रेससह विरोधी पक्ष एकवटणार

अशोक पाटील --इस्लामपूर   --माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या बगलबच्च्यांनी पक्षाची ताकद आणि आर्थिक जोरावर वाळवा पंचायत समितीच्या नवीन सभागृहाला राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा घाट घातला आहे, तर जुन्या सभागृहाला असलेले वसंतदादा पाटील यांचे नाव गायब करण्याचा कटही राष्ट्रवादीने आखला आहे. त्याविरोधात काँग्रेससह सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊन लढा देण्याचा इशारा काँग्रेसचे पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीची हुकूमशाही सुरू आहे. ताकदीच्या जिवावर स्वत:ची मालमत्ता समजून नामांतराचा ठराव करणाऱ्यांविरोधात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, काँग्रेसचे नानासाहेब महाडिक, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांच्यासह हुतात्मा गटाचे युवा नेते, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी एकत्र येऊन सभागृहाच्या नामांतराला विरोध करणार आहेत.मुळातच तालुका पंचायत समितीची मालमत्ता ही जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. नामांतरासाठी शासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच तसा ठरावही सभागृहाच्या बैठकीत होणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव बेकायदेशीर आहे. नवीन प्रशासकीय कार्यालयात अधिकारी व सदस्यांसाठी वातानुकूलित खोल्या बांधण्यात आल्या आहेत, तर विरोधकांसाठी कसलीही व्यवस्था नाही. सर्वसामान्य जनतेसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली नाही. सध्या पावसाअभावी पिकांची परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तालुक्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. याचा कसलाही विचार न करता सत्ताधारी राष्ट्रवादीला सभागृहाच्या नामांतराचाच प्रश्न महत्त्वाचा वाटत आहे, असाही आरोप पाटील यांनी केला आहे.एकंदरीत नामांतराचा वाद चांगलाच पेटणार असून, राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नामांतराचा हा मुद्दा येथील राजकीय पटावर आता चांगलाच रंगणार आहे. शिष्टाचार गेला, राजकारण आले...वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील तत्कालीन वादाची, संघर्षाची छाया त्यांच्या पुढील पिढीतही कायम राहिली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतही महापौर कार्यालयात यापूर्वी राजारामबापू पाटील यांची प्रतिमा लावण्यात आली होती. गत निवडणुकीत सत्ताबदल झाला. पण गेल्या दीड वर्षात महापौर कार्यालयातील प्रतिमा बदलल्या नव्हत्या. नुकतेच महापौर कार्यालयाचे नूतनीकरण झाले. त्यानंतर राजारामबापूंच्या प्रतिमेची जागा आता विष्णुअण्णा पाटील यांच्या प्रतिमेने घेतली आहे.वसंतदादा पाटील हे जिल्ह्याचे भाग्यविधाते आहेत. अशा या थोर नेत्याचे सभागृहाला दिलेले नाव बदलणे हे चुकीचे आहे. राष्ट्रवादीने नाव बदलण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात काँग्रेसचे नेते एकत्र येऊन आंदोलन करतील.- जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य, बोरगाव.पंचायत समिती ही शासकीय स्वायत्तता आहे. याठिकाणी नेत्यांचे नाव देणे योग्य होणार नाही. सत्ता बदलली की नाव बदलण्याचा पायंडा चुकीचा आहे. त्यामुळे शासकीय इमारतीला नावे देतानाच विचार होणे गरजेचे आहे. - राहुल महाडिक, माजी जि. प. सदस्य, येलूर.