शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सभागृह नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

By admin | Updated: September 21, 2015 00:07 IST

वाळवा पंचायत समिती : वसंतदादांच्या प्रेमापोटी काँग्रेससह विरोधी पक्ष एकवटणार

अशोक पाटील --इस्लामपूर   --माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या बगलबच्च्यांनी पक्षाची ताकद आणि आर्थिक जोरावर वाळवा पंचायत समितीच्या नवीन सभागृहाला राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा घाट घातला आहे, तर जुन्या सभागृहाला असलेले वसंतदादा पाटील यांचे नाव गायब करण्याचा कटही राष्ट्रवादीने आखला आहे. त्याविरोधात काँग्रेससह सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊन लढा देण्याचा इशारा काँग्रेसचे पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.पाटील म्हणाले, वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीची हुकूमशाही सुरू आहे. ताकदीच्या जिवावर स्वत:ची मालमत्ता समजून नामांतराचा ठराव करणाऱ्यांविरोधात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, काँग्रेसचे नानासाहेब महाडिक, माजी जि. प. सदस्य राहुल महाडिक, जि. प. सदस्य सम्राट महाडिक, माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांच्यासह हुतात्मा गटाचे युवा नेते, वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी एकत्र येऊन सभागृहाच्या नामांतराला विरोध करणार आहेत.मुळातच तालुका पंचायत समितीची मालमत्ता ही जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. नामांतरासाठी शासनाची परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच तसा ठरावही सभागृहाच्या बैठकीत होणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव बेकायदेशीर आहे. नवीन प्रशासकीय कार्यालयात अधिकारी व सदस्यांसाठी वातानुकूलित खोल्या बांधण्यात आल्या आहेत, तर विरोधकांसाठी कसलीही व्यवस्था नाही. सर्वसामान्य जनतेसाठी बैठक व्यवस्था करण्यात आलेली नाही. सध्या पावसाअभावी पिकांची परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तालुक्यात स्वाइन फ्लूने थैमान घातले आहे. याचा कसलाही विचार न करता सत्ताधारी राष्ट्रवादीला सभागृहाच्या नामांतराचाच प्रश्न महत्त्वाचा वाटत आहे, असाही आरोप पाटील यांनी केला आहे.एकंदरीत नामांतराचा वाद चांगलाच पेटणार असून, राष्ट्रवादीच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र येण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नामांतराचा हा मुद्दा येथील राजकीय पटावर आता चांगलाच रंगणार आहे. शिष्टाचार गेला, राजकारण आले...वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यातील तत्कालीन वादाची, संघर्षाची छाया त्यांच्या पुढील पिढीतही कायम राहिली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतही महापौर कार्यालयात यापूर्वी राजारामबापू पाटील यांची प्रतिमा लावण्यात आली होती. गत निवडणुकीत सत्ताबदल झाला. पण गेल्या दीड वर्षात महापौर कार्यालयातील प्रतिमा बदलल्या नव्हत्या. नुकतेच महापौर कार्यालयाचे नूतनीकरण झाले. त्यानंतर राजारामबापूंच्या प्रतिमेची जागा आता विष्णुअण्णा पाटील यांच्या प्रतिमेने घेतली आहे.वसंतदादा पाटील हे जिल्ह्याचे भाग्यविधाते आहेत. अशा या थोर नेत्याचे सभागृहाला दिलेले नाव बदलणे हे चुकीचे आहे. राष्ट्रवादीने नाव बदलण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात काँग्रेसचे नेते एकत्र येऊन आंदोलन करतील.- जितेंद्र पाटील, माजी जि. प. सदस्य, बोरगाव.पंचायत समिती ही शासकीय स्वायत्तता आहे. याठिकाणी नेत्यांचे नाव देणे योग्य होणार नाही. सत्ता बदलली की नाव बदलण्याचा पायंडा चुकीचा आहे. त्यामुळे शासकीय इमारतीला नावे देतानाच विचार होणे गरजेचे आहे. - राहुल महाडिक, माजी जि. प. सदस्य, येलूर.