शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

‘आयआरबी’ परवडली... बाजार समिती नको !

By admin | Updated: January 8, 2015 00:38 IST

शेतकरी आक्रमक : रस्तेच नाहीत, प्रवेश कर कसला घेता?

कोल्हापूर : बाजार समितीत प्रवेश केल्यानंतर रस्ता शोधतच अडत दुकानापर्यंत जावे लागते. खाचखळग्यांनी वाहनांचे नुकसान होत असताना प्रवेश कर कसला घेता? अशी विचारणा करीत ‘प्रवेश कर बंद करा अन्यथा आंदोलन उभारावे लागेल,’ असा इशारा आज, बुधवारी शेतकऱ्यांना समिती प्रशासनाला दिला. कराची रक्कम पाहता ‘आयआरबी’ कंपनीचा टोल परवडला; पण बाजार समितीचा कर नको, असे म्हणण्याची वेळ आल्याच्याही संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी नोंदविल्या. पूर्वी बैलगाडीसाठी वर्षाला नाममात्र प्रवेश शुल्क घेतले जात असे. आता बैलगाड्या बंद झाल्याने शुल्क वाढविण्यात आले आहे. अशासकीय मंडळाच्या कार्यकाळात त्यांनी प्रवेश शुल्क वाढीचा निर्णय घेतला. ट्रकसाठी वीस, तर टेम्पो व रिक्षासाठी पंधरा रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. आज गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांकडे तक्रार करीत शुल्क रद्द करण्याची मागणी लावून धरली. व्यावसायिक हेतूने वाहने चालविली जातात, त्यांच्याकडून कर घेतला पाहिजे. तुम्हाला सुविधा देण्यासाठी कर घ्यावाच लागेल, तशी उपविधीमध्ये तरतूद असल्याने प्रशासक रंजन लाखे यांनी सांगितले. यावर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. खराब रस्ते असताना ‘आयआरबी’च्या टोल पेक्षाही तुमचा कर जास्त कसा? अशा प्रश्नांची सरबत्ती करीत बाजीराव पाटील यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले. ‘सांगली’ समितीत विनाशुल्क प्रवेशसांगली बाजार समितीत शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आकारले जात नाही. मग कोल्हापूरची बाजार समितीच ते का आकारते? सुविधांच्या नावाखाली पैसे उकळता; मग आतापर्यंत कोणत्या सुविधा तुम्ही दिल्या? असा सवाल शेतकरी करीत आहेत. उपविधीला आव्हान द्या; मग बघूबाजार समितीच्या उपविधीमधील तरतुदीप्रमाणे ही करवसुली सुरू आहे. तुम्हाला कर नको असेल तर उपविधीला आव्हान द्या. पणन संचालकांनी सांगितले तर रद्द करू, असे प्रशासक रंजन लाखे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. अशी होते वसुली -रिक्षा - १० रुपयेटेम्पो - १५ रुपयेट्रक - २० रुपये