शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांची चौकशी ठप्पच

By admin | Updated: August 25, 2015 00:19 IST

गैरव्यवहार : सहकारमंत्र्यांकडील चौकशी जैसे थे, मालमत्ता जप्तीची गर्जना करणारे युतीचे नेते गप्पच

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४५ माजी संचालकांची चौकशी सहकार विभागाच्या पातळीवरच ठप्प झाली आहे. उच्च न्यायालाने ‘कलम ८८’च्या कारवाईला स्थगिती दिली असली तरी सहकार विभागाने पुढील कारवाई करणे अपेक्षित होती. माजी संचालकांच्या मालमत्ता जप्त करणारच, अशी भीमगर्जना करणारे युतीचे नेते गेले पाच महिने एकदम शांत कसे झाले? २८ मार्चला होणाऱ्या सुनावणीचे पुढे काय झाले. याबाबत सहकार क्षेत्रात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. विनातारण व अल्पतारण कर्ज वाटप करून नुकसान केल्याप्रकरणी जिल्हा बँकेचे ४५ माजी संचालक व एक कार्यकारी संचालकांवर सहकार विभागाने ‘कलम ८८’ नुसार १४७ कोटींची जबाबदारी निश्चितीची कारवाई केली होती. जबाबदारी निश्चित केल्याप्रमाणे पैसे भरले नाहीत, तर मालमत्ता जप्तीच्या नोटिसा विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी जानेवारी २०१५ मध्ये माजी संचालकांना काढल्या होत्या. याविरोधात तेरा संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केले, पण दोषी संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केल्याने काही संचालकांनी थेट न्यायालय गाठले. त्यावर सुनावणी होऊन सहकारमंत्र्यांकडे अपील करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. सहकारमंत्र्यांनी मालमत्ता जप्तीला स्थगिती देत मूळ कारवाईबाबत २८ मार्चला सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत माजी संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हणणे सादर केले. त्यावर सुनावणी होऊन ‘८८’ च्या कारवाईला स्थागिती देत सहकारमंत्र्यांनी दिलेले आदेश रद्दबातल ठरविल्याने माजी संचालकांचा जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. बॅँकेची निवडणूक होऊन चार महिने झाले, पण सहकारमंत्र्यांकडील सुनावणी पुढे सरकलीच नाही. राज्य पातळीवर सहकारात मिळेल त्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याची संधी युतीचे विशेषत: भाजपचे नेते सोडत नाहीत. स्वीकृत संचालकांच्या माध्यमातून सहकारात प्रवेश करून दोन्ही काँग्रेसच्या सत्तेवर नजर ठेवण्याचा प्रयत्न युतीचा आहे. मग जिल्हा बॅँकेच्या कारवाईच्या माध्यमातून आयत्या आलेल्या संधीचा फायदा न घेता युतीचे सरकार गप्प कसे झाले. हे सर्वसामान्यांना पडलेले कोडे आहे.