शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांची चौकशी ठप्पच

By admin | Updated: August 25, 2015 00:19 IST

गैरव्यवहार : सहकारमंत्र्यांकडील चौकशी जैसे थे, मालमत्ता जप्तीची गर्जना करणारे युतीचे नेते गप्पच

राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४५ माजी संचालकांची चौकशी सहकार विभागाच्या पातळीवरच ठप्प झाली आहे. उच्च न्यायालाने ‘कलम ८८’च्या कारवाईला स्थगिती दिली असली तरी सहकार विभागाने पुढील कारवाई करणे अपेक्षित होती. माजी संचालकांच्या मालमत्ता जप्त करणारच, अशी भीमगर्जना करणारे युतीचे नेते गेले पाच महिने एकदम शांत कसे झाले? २८ मार्चला होणाऱ्या सुनावणीचे पुढे काय झाले. याबाबत सहकार क्षेत्रात सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. विनातारण व अल्पतारण कर्ज वाटप करून नुकसान केल्याप्रकरणी जिल्हा बँकेचे ४५ माजी संचालक व एक कार्यकारी संचालकांवर सहकार विभागाने ‘कलम ८८’ नुसार १४७ कोटींची जबाबदारी निश्चितीची कारवाई केली होती. जबाबदारी निश्चित केल्याप्रमाणे पैसे भरले नाहीत, तर मालमत्ता जप्तीच्या नोटिसा विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी जानेवारी २०१५ मध्ये माजी संचालकांना काढल्या होत्या. याविरोधात तेरा संचालकांनी सहकारमंत्र्यांकडे अपील केले, पण दोषी संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केल्याने काही संचालकांनी थेट न्यायालय गाठले. त्यावर सुनावणी होऊन सहकारमंत्र्यांकडे अपील करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले. सहकारमंत्र्यांनी मालमत्ता जप्तीला स्थगिती देत मूळ कारवाईबाबत २८ मार्चला सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत माजी संचालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हणणे सादर केले. त्यावर सुनावणी होऊन ‘८८’ च्या कारवाईला स्थागिती देत सहकारमंत्र्यांनी दिलेले आदेश रद्दबातल ठरविल्याने माजी संचालकांचा जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. बॅँकेची निवडणूक होऊन चार महिने झाले, पण सहकारमंत्र्यांकडील सुनावणी पुढे सरकलीच नाही. राज्य पातळीवर सहकारात मिळेल त्या ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करण्याची संधी युतीचे विशेषत: भाजपचे नेते सोडत नाहीत. स्वीकृत संचालकांच्या माध्यमातून सहकारात प्रवेश करून दोन्ही काँग्रेसच्या सत्तेवर नजर ठेवण्याचा प्रयत्न युतीचा आहे. मग जिल्हा बॅँकेच्या कारवाईच्या माध्यमातून आयत्या आलेल्या संधीचा फायदा न घेता युतीचे सरकार गप्प कसे झाले. हे सर्वसामान्यांना पडलेले कोडे आहे.