शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

साखर कारखाने विक्रीची चौकशी करा

By admin | Updated: April 29, 2016 00:48 IST

राजू शेट्टींची लोकसभेत मागणी : अधिवेशनात ‘शून्य प्रहर’मध्ये वेधले लक्ष

कोल्हापूर : महाराष्ट्रातील ३५ सहकारी साखर कारखान्यांची विक्री कवडीमोल किमतीत करून गैरव्यवहार व भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे संबंधित कारखान्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी सक्त वसुली संचालनालय (ईडी)तर्फे करावी, अशी मागणी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहर वेळेत केली. विदेशातील काळा पैसा कधी आणायचा तेव्हा आणा. मात्र, देशातील पांढऱ्या कपड्यात लपलेल्या दरोडेखोरांचा पहिल्यांदा बंदोबस्त करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खासदार शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील साखर उद्योगांमुळे अनेकांना वर्षातून १५० ते १७० दिवस रोजगार मिळतो. तीन कोटी ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यास ऊस पुरवठा करतो. शेतकऱ्यांच्या पैशांतून सहकारी साखर कारखाने उभारले. मात्र, गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार यामुळे अनेक सहकारी साखर कारखाने आजारी पडले. कर्जे थकल्याने राज्य बँक, जिल्हा बँक, राज्य शासनाने सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत कब्जा घेऊन विकले. एक साखर कारखाना उभारण्यासाठी ३०० कोटींची गुंतवणूक करावी लागते. प्रत्यक्षात ३५ आजारी सहकारी कारखान्यांची किमत दहा हजार कोटींपेक्षा अधिक होते. मात्र, काही राजकीय नेते स्वत:च्या फायद्यासाठी आजारी साखर कारखाने केवळ १४ ते ५० कोटी रुपयांपर्यंत लिलावात काढले. अशाप्रकारे गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील ३५ सहकारी साखर कारखाने केवळ १ हजार ७६ कोटी रुपयांना विकले आहेत. विक्रीतील कारखाने ज्या खासगी कंपन्यांनी खरेदी केली आहे. त्यांचे संचालक कोण आहेत ?, भागधारक कोण आहेत ?, खरेदीसाठी पैसा कुठून आणला ? त्याची चौकशी ‘ईडी’तर्फे करावी, अशी मागणी शेट्टी यांनी केली. (प्रतिनिधी) अनेक सहकारी सूतगिरण्या, कृषी प्रक्रिया उद्योग यांची खरेदी-विक्री झाली आहे. त्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचा वापर झाला आहे. त्याची ‘ईडी’तर्फे चौकशी करून संबंधित सहकारी संस्थांच्या सभासदांना न्याय मिळवून द्यावा.- राजू शेट्टी, खासदार