शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनाची दखल... मंत्र्यांचे आदेश बेदखल !

By admin | Updated: March 3, 2015 00:26 IST

दोन वर्षांपासून संघर्ष : सरकार आणि कंपनीचा पर्यावरणासह जनतेच्या जिवाशी खेळ--लढाई ‘एव्हीएच’ची

राम मगदूम - गडहिंग्लज -तब्बल दोन वर्षांपासून ‘एव्हीएच’ कंपनीच्या विरोधात जनतेचा संघर्ष सुरू आहे. आंदोलनाला दोनदा हिंसक वळणदेखील लागले. त्यामुळे शासनाने आंदोलनाची दखल घेवून ‘आदेश’ही काढले. मात्र, त्या आदेशांची अंमलबजावणी केली जात नाही. सरकारी ‘बाबू’ मंत्र्याचे आदेशदेखील पाळत नाहीत, असा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळेच सरकार आणि कंपनी दोघेही चंदगडच्या पर्यावरणाशी आणि निसर्गप्रेमी जनतेच्या जिवाशी खेळत आहेत की काय? असा सवाल विचारला जात आहे.२०१३ मध्ये ‘एव्हीएच’विरोधी जनआंदोलने आणि या प्रश्नावरील विधानसभेतील ‘लक्षवेधी’वरील चर्चेअंती तत्कालीन पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी राज्यस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत प्रकल्पाचे बांधकाम थांबविण्याचे आश्वासन विधिमंडळ सभागृहात दिले होते. मात्र, या आदेशाची ‘वेळेत’ अंमलबजावणी करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘दिरंगाई’ केली. त्यामुळेच कंपनीला प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण करण्याची संधी मिळाली.शासकीय आदेशाला न्यायालयातून स्थगिती मिळवून प्रकल्पाचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्णत्वास नेले जात असतानाच कोणत्याही परिस्थितीत उत्पादन सुरू होऊ नये, यासाठी आंदोलकांनी पाठपुरावा केला. तरीदेखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळेच जनआंदोलनाने पुन्हा उचल खाल्ली आहे. सनदशीर लढाईबरोबरच न्यायालयीन लढाईदेखील सुरू झाली आहे. (समाप्त)मंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता१ आॅगस्ट २०१३ : आमदार संध्यादेवी कुपेकर व सहकाऱ्यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवरील सभागृहातील चर्चेअंती पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी राजस्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाचा एव्हीएच प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत कंपनीने सुरू केलेले बांधकाम तत्काळ थांबविण्याबाबत निर्देश द्यावेत, असा आदेश पर्यावरण खात्याच्या उपसचिवांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना दिले. मात्र, हा आदेश कंपनीपर्यंत पोहोचविण्यात ‘दिरंगाई’ झाल्यामुळे कंपनीने मंत्र्यांच्या आदेशाला न्यायालयातून स्थगिती आणून बांधकाम पूर्ण केले.११ फेब्रुवारी २०१५ : विधानसभेत ‘लक्षवेधी’ अनुषंगाने झालेली चर्चा आणि आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या निवेदनाचा विचार करून पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ‘एव्हीएच’ प्रकल्पाच्या उत्पादनाला स्थगिती दऊन यापूर्वी कंपनीला दिलेल्या पुनर्तपासणी आणि जनसुनावणी घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असा आदेश पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरणाचे प्रधान सचिव तथा सदस्य सचिवांना दिला. तरी याचीही अंमलबजावणी झालेली नाही.जनसुनावणीच उपायनिसर्गप्रेमी जनता आणि पर्यावरणवादी आंदोलकांचे एव्हीएच प्रकल्पाच्या विरोधातील आक्षेप आणि कंपनीची बाजू तमाम जनतेसमोर येण्यासाठी शासनाने याप्रश्नी जनसुनवाई घेणे हाच एकमेव उपाय आहे, अन्यथा ‘एव्हीएच’ विरोधातील लढाई दीर्घकाळ चालण्याची चिन्हे आहेत. न्यायालयातून निकाल मिळेल; पण न्याय मिळणार नाही. आंदोलकांच्या हरकतींची शहानिशा करण्यासाठी प्रकल्पाच्या प्रदूषणाची आणि जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी तमाम ‘चंदगड’करांची माय-बाप सरकारला विनवणी आहे.