शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

इंटरनेट अन् श्वास... दृष्टिक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:59 IST

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट ...

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.

यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट बंदी लावण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल प्रशासनाने उचलले. त्यामुळे अफवांचा बाजार कमी झाला. स्थिती पूर्वपदावर येण्यास हातभार लागला. असे असले तरी नेटीझन्सची मात्र मोठी पंचाईत झाली. प्रेयसीच्या ओढीने ज्याप्रमाणे प्रियकर व्याकूळ होतो, त्याप्रमाणे नेटीझन्स कधी एकदा इंटरनेट चालू होते याची वाट पाहत होते. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे झाकेपर्यंत सतत व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साईटवर डोकावणाºयांना दोन दिवस अस्वस्थ वाटत होते. जणू आमचा श्वासच हरवला आहे, अशी एकाची बोलकी प्रतिक्रिया होती.

सध्या ही समाजमाध्यमे म्हणजे संवादक्रांतीचे दुसरे रूप समजले जाते. यामुळे माणसा-माणसांतील संवाद हरवला असला, ती एकमेकांपासून दूर असली तरी समाजमाध्यमातून जवळ असतात. सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंगच्या संदेशाने त्यांचा दिनक्रम सुरू होतो आणि गुड नाईटने संपतो. या संदेशातही व्हरायटी असते. कुणी भावनिक आवाहन करतो, कुणी सुविचार सांगतो, कुणी आणखी काही... तरुण पिढी तर या माध्यमांच्या आहारी गेल्याचेच चित्र सार्वत्रिक दिसते. शेजारी शेजारीही बसून एकमेकांशी न बोलता सगळ्यांची डोकी मोबाईलमध्येच असतात.

याला कसली क्रांती म्हणायची? शारीरिक व्यायाम, पुस्तकांचे वाचन कमी झालेले दिसते. तंदुरुस्तीसाठी जीमला जायचे फॅड असले तरी नेहमीची कामे करायला त्यांचा कंटाळा दिसतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते याला काही अपवादही असतात. मात्र, बहुतांश चित्र असेच असल्याचे पालकांशी बोलताना जाणवते. सूचना किंवा माहितीची देवाण - घेवाण करण्यासाठी नोकरदार मंडळी, संस्था, संघटना व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलचा वापर करतात. मात्र, दोन दिवस इंटरनेट सेवाच बंद राहिल्याने त्यांचे नियोजनही कोलमडले. एखाद्याला भेटायला जायचे असले तरी संदेश न टाकता थेट बोलूनच जावे लागले. अशीच परिस्थिती महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचीही झाली.

पण, या माध्यमांचा गैरवापर करणारेही कमी नाहीत. एखाद्याची बदनामी करण्यासाठी, चारित्र्यहनन करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. सायबर सेल अशा लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करीत असतो. तरीही, ही प्रवृत्ती कमी होत नाही. परवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट उघडून त्या अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. एखादा संदेश आपण कोणतीही खातरजमा न करता पुढे इतरांना पाठवित असतो. तो चुकीचा असेल तर समाजात चुकीची माहिती पसरते. भावनेला हात घालणारा, स्वाभिमान डिवचणारा संदेश असेल तर तो वाचून अनेकांची माथी भडकतात आणि ते हिंसाचाराला प्रवृत्त होतात. कोरेगाव भीमा प्रकरणातही खºया-खोट्याची सत्यता न पाहता असे संदेश फॉरवर्ड होत राहिल्याने तणाव वेगाने वाढला.

राज्यभर पसरला. इंटरनेट बंदीचा उपाय घटना घडल्या घडल्या लगेच केला असता तर हा तणाव इतका वेगाने वाढला नसता, असे म्हणायला वाव आहे. कारण कोल्हापुरात इंटरनेट बंदी लागताच संदेशांची देवाण-घेवाण थंडावली आणि परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येण्यास मदत झाली. एकूणच काय समाजमाध्यमे जितकी चांगली तितकीच वाईटही आहेत. त्यातले चांगले काय आणि वाईट काय, हे आपण निवडायचे आहे. समाज माध्यमांचा दुरुपयोग करणाºयांना आवर घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. पोलिसांना अशा लोकांची नावे कळवायला हवीत. अशा समाज कंटकांवर कठोर कारवाई केली तरच या माध्यमांचा गैरवापर करणाºयांना चाप बसेल. केवळ फायदे कसे घ्यायचे एवढेच पाहिले जाईल, दुरुपयोग करण्यास कुणी धजावणार नाही. हा दिवस येईल तो सुदिन समजावा.(चंद्रकांत कित्तुरे लेखक लोकमतचे उपवृत्तसंपादक आहेत)‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे