शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

इंटरनेट अन् श्वास... दृष्टिक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:59 IST

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट ...

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.

यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट बंदी लावण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल प्रशासनाने उचलले. त्यामुळे अफवांचा बाजार कमी झाला. स्थिती पूर्वपदावर येण्यास हातभार लागला. असे असले तरी नेटीझन्सची मात्र मोठी पंचाईत झाली. प्रेयसीच्या ओढीने ज्याप्रमाणे प्रियकर व्याकूळ होतो, त्याप्रमाणे नेटीझन्स कधी एकदा इंटरनेट चालू होते याची वाट पाहत होते. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे झाकेपर्यंत सतत व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साईटवर डोकावणाºयांना दोन दिवस अस्वस्थ वाटत होते. जणू आमचा श्वासच हरवला आहे, अशी एकाची बोलकी प्रतिक्रिया होती.

सध्या ही समाजमाध्यमे म्हणजे संवादक्रांतीचे दुसरे रूप समजले जाते. यामुळे माणसा-माणसांतील संवाद हरवला असला, ती एकमेकांपासून दूर असली तरी समाजमाध्यमातून जवळ असतात. सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंगच्या संदेशाने त्यांचा दिनक्रम सुरू होतो आणि गुड नाईटने संपतो. या संदेशातही व्हरायटी असते. कुणी भावनिक आवाहन करतो, कुणी सुविचार सांगतो, कुणी आणखी काही... तरुण पिढी तर या माध्यमांच्या आहारी गेल्याचेच चित्र सार्वत्रिक दिसते. शेजारी शेजारीही बसून एकमेकांशी न बोलता सगळ्यांची डोकी मोबाईलमध्येच असतात.

याला कसली क्रांती म्हणायची? शारीरिक व्यायाम, पुस्तकांचे वाचन कमी झालेले दिसते. तंदुरुस्तीसाठी जीमला जायचे फॅड असले तरी नेहमीची कामे करायला त्यांचा कंटाळा दिसतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते याला काही अपवादही असतात. मात्र, बहुतांश चित्र असेच असल्याचे पालकांशी बोलताना जाणवते. सूचना किंवा माहितीची देवाण - घेवाण करण्यासाठी नोकरदार मंडळी, संस्था, संघटना व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलचा वापर करतात. मात्र, दोन दिवस इंटरनेट सेवाच बंद राहिल्याने त्यांचे नियोजनही कोलमडले. एखाद्याला भेटायला जायचे असले तरी संदेश न टाकता थेट बोलूनच जावे लागले. अशीच परिस्थिती महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचीही झाली.

पण, या माध्यमांचा गैरवापर करणारेही कमी नाहीत. एखाद्याची बदनामी करण्यासाठी, चारित्र्यहनन करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. सायबर सेल अशा लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करीत असतो. तरीही, ही प्रवृत्ती कमी होत नाही. परवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट उघडून त्या अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. एखादा संदेश आपण कोणतीही खातरजमा न करता पुढे इतरांना पाठवित असतो. तो चुकीचा असेल तर समाजात चुकीची माहिती पसरते. भावनेला हात घालणारा, स्वाभिमान डिवचणारा संदेश असेल तर तो वाचून अनेकांची माथी भडकतात आणि ते हिंसाचाराला प्रवृत्त होतात. कोरेगाव भीमा प्रकरणातही खºया-खोट्याची सत्यता न पाहता असे संदेश फॉरवर्ड होत राहिल्याने तणाव वेगाने वाढला.

राज्यभर पसरला. इंटरनेट बंदीचा उपाय घटना घडल्या घडल्या लगेच केला असता तर हा तणाव इतका वेगाने वाढला नसता, असे म्हणायला वाव आहे. कारण कोल्हापुरात इंटरनेट बंदी लागताच संदेशांची देवाण-घेवाण थंडावली आणि परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येण्यास मदत झाली. एकूणच काय समाजमाध्यमे जितकी चांगली तितकीच वाईटही आहेत. त्यातले चांगले काय आणि वाईट काय, हे आपण निवडायचे आहे. समाज माध्यमांचा दुरुपयोग करणाºयांना आवर घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. पोलिसांना अशा लोकांची नावे कळवायला हवीत. अशा समाज कंटकांवर कठोर कारवाई केली तरच या माध्यमांचा गैरवापर करणाºयांना चाप बसेल. केवळ फायदे कसे घ्यायचे एवढेच पाहिले जाईल, दुरुपयोग करण्यास कुणी धजावणार नाही. हा दिवस येईल तो सुदिन समजावा.(चंद्रकांत कित्तुरे लेखक लोकमतचे उपवृत्तसंपादक आहेत)‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे