शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

इंटरनेट अन् श्वास... दृष्टिक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:59 IST

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट ...

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.

यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट बंदी लावण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल प्रशासनाने उचलले. त्यामुळे अफवांचा बाजार कमी झाला. स्थिती पूर्वपदावर येण्यास हातभार लागला. असे असले तरी नेटीझन्सची मात्र मोठी पंचाईत झाली. प्रेयसीच्या ओढीने ज्याप्रमाणे प्रियकर व्याकूळ होतो, त्याप्रमाणे नेटीझन्स कधी एकदा इंटरनेट चालू होते याची वाट पाहत होते. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे झाकेपर्यंत सतत व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साईटवर डोकावणाºयांना दोन दिवस अस्वस्थ वाटत होते. जणू आमचा श्वासच हरवला आहे, अशी एकाची बोलकी प्रतिक्रिया होती.

सध्या ही समाजमाध्यमे म्हणजे संवादक्रांतीचे दुसरे रूप समजले जाते. यामुळे माणसा-माणसांतील संवाद हरवला असला, ती एकमेकांपासून दूर असली तरी समाजमाध्यमातून जवळ असतात. सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंगच्या संदेशाने त्यांचा दिनक्रम सुरू होतो आणि गुड नाईटने संपतो. या संदेशातही व्हरायटी असते. कुणी भावनिक आवाहन करतो, कुणी सुविचार सांगतो, कुणी आणखी काही... तरुण पिढी तर या माध्यमांच्या आहारी गेल्याचेच चित्र सार्वत्रिक दिसते. शेजारी शेजारीही बसून एकमेकांशी न बोलता सगळ्यांची डोकी मोबाईलमध्येच असतात.

याला कसली क्रांती म्हणायची? शारीरिक व्यायाम, पुस्तकांचे वाचन कमी झालेले दिसते. तंदुरुस्तीसाठी जीमला जायचे फॅड असले तरी नेहमीची कामे करायला त्यांचा कंटाळा दिसतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते याला काही अपवादही असतात. मात्र, बहुतांश चित्र असेच असल्याचे पालकांशी बोलताना जाणवते. सूचना किंवा माहितीची देवाण - घेवाण करण्यासाठी नोकरदार मंडळी, संस्था, संघटना व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलचा वापर करतात. मात्र, दोन दिवस इंटरनेट सेवाच बंद राहिल्याने त्यांचे नियोजनही कोलमडले. एखाद्याला भेटायला जायचे असले तरी संदेश न टाकता थेट बोलूनच जावे लागले. अशीच परिस्थिती महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचीही झाली.

पण, या माध्यमांचा गैरवापर करणारेही कमी नाहीत. एखाद्याची बदनामी करण्यासाठी, चारित्र्यहनन करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. सायबर सेल अशा लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करीत असतो. तरीही, ही प्रवृत्ती कमी होत नाही. परवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट उघडून त्या अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. एखादा संदेश आपण कोणतीही खातरजमा न करता पुढे इतरांना पाठवित असतो. तो चुकीचा असेल तर समाजात चुकीची माहिती पसरते. भावनेला हात घालणारा, स्वाभिमान डिवचणारा संदेश असेल तर तो वाचून अनेकांची माथी भडकतात आणि ते हिंसाचाराला प्रवृत्त होतात. कोरेगाव भीमा प्रकरणातही खºया-खोट्याची सत्यता न पाहता असे संदेश फॉरवर्ड होत राहिल्याने तणाव वेगाने वाढला.

राज्यभर पसरला. इंटरनेट बंदीचा उपाय घटना घडल्या घडल्या लगेच केला असता तर हा तणाव इतका वेगाने वाढला नसता, असे म्हणायला वाव आहे. कारण कोल्हापुरात इंटरनेट बंदी लागताच संदेशांची देवाण-घेवाण थंडावली आणि परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येण्यास मदत झाली. एकूणच काय समाजमाध्यमे जितकी चांगली तितकीच वाईटही आहेत. त्यातले चांगले काय आणि वाईट काय, हे आपण निवडायचे आहे. समाज माध्यमांचा दुरुपयोग करणाºयांना आवर घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. पोलिसांना अशा लोकांची नावे कळवायला हवीत. अशा समाज कंटकांवर कठोर कारवाई केली तरच या माध्यमांचा गैरवापर करणाºयांना चाप बसेल. केवळ फायदे कसे घ्यायचे एवढेच पाहिले जाईल, दुरुपयोग करण्यास कुणी धजावणार नाही. हा दिवस येईल तो सुदिन समजावा.(चंद्रकांत कित्तुरे लेखक लोकमतचे उपवृत्तसंपादक आहेत)‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे