शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट अन् श्वास... दृष्टिक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:59 IST

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट ...

समाजमाध्यमांचा वापर फायद्यासाठी करायचा की, गैरफायद्यासाठी हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या आठवड्यात कोरेगाव भीमा प्रकरणावरून राज्यभरात प्रचंड तणाव, तर काही ठिकाणी दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली. समाजमाध्यमातून देण्यात आलेले संदेश ही स्थिती निर्माण होण्याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती.

यामुळेच ज्या ठिकाणी संवेदनशील आणि तणावाचे वातावरण आहे त्या ठिकाणी इंटरनेट बंदी लावण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल प्रशासनाने उचलले. त्यामुळे अफवांचा बाजार कमी झाला. स्थिती पूर्वपदावर येण्यास हातभार लागला. असे असले तरी नेटीझन्सची मात्र मोठी पंचाईत झाली. प्रेयसीच्या ओढीने ज्याप्रमाणे प्रियकर व्याकूळ होतो, त्याप्रमाणे नेटीझन्स कधी एकदा इंटरनेट चालू होते याची वाट पाहत होते. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री डोळे झाकेपर्यंत सतत व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल साईटवर डोकावणाºयांना दोन दिवस अस्वस्थ वाटत होते. जणू आमचा श्वासच हरवला आहे, अशी एकाची बोलकी प्रतिक्रिया होती.

सध्या ही समाजमाध्यमे म्हणजे संवादक्रांतीचे दुसरे रूप समजले जाते. यामुळे माणसा-माणसांतील संवाद हरवला असला, ती एकमेकांपासून दूर असली तरी समाजमाध्यमातून जवळ असतात. सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंगच्या संदेशाने त्यांचा दिनक्रम सुरू होतो आणि गुड नाईटने संपतो. या संदेशातही व्हरायटी असते. कुणी भावनिक आवाहन करतो, कुणी सुविचार सांगतो, कुणी आणखी काही... तरुण पिढी तर या माध्यमांच्या आहारी गेल्याचेच चित्र सार्वत्रिक दिसते. शेजारी शेजारीही बसून एकमेकांशी न बोलता सगळ्यांची डोकी मोबाईलमध्येच असतात.

याला कसली क्रांती म्हणायची? शारीरिक व्यायाम, पुस्तकांचे वाचन कमी झालेले दिसते. तंदुरुस्तीसाठी जीमला जायचे फॅड असले तरी नेहमीची कामे करायला त्यांचा कंटाळा दिसतो. अभ्यासाकडे दुर्लक्ष केले जाते याला काही अपवादही असतात. मात्र, बहुतांश चित्र असेच असल्याचे पालकांशी बोलताना जाणवते. सूचना किंवा माहितीची देवाण - घेवाण करण्यासाठी नोकरदार मंडळी, संस्था, संघटना व्हॉटस्अ‍ॅप, ई-मेलचा वापर करतात. मात्र, दोन दिवस इंटरनेट सेवाच बंद राहिल्याने त्यांचे नियोजनही कोलमडले. एखाद्याला भेटायला जायचे असले तरी संदेश न टाकता थेट बोलूनच जावे लागले. अशीच परिस्थिती महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचीही झाली.

पण, या माध्यमांचा गैरवापर करणारेही कमी नाहीत. एखाद्याची बदनामी करण्यासाठी, चारित्र्यहनन करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. सायबर सेल अशा लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करीत असतो. तरीही, ही प्रवृत्ती कमी होत नाही. परवा मुख्यमंत्र्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाऊंट उघडून त्या अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. एखादा संदेश आपण कोणतीही खातरजमा न करता पुढे इतरांना पाठवित असतो. तो चुकीचा असेल तर समाजात चुकीची माहिती पसरते. भावनेला हात घालणारा, स्वाभिमान डिवचणारा संदेश असेल तर तो वाचून अनेकांची माथी भडकतात आणि ते हिंसाचाराला प्रवृत्त होतात. कोरेगाव भीमा प्रकरणातही खºया-खोट्याची सत्यता न पाहता असे संदेश फॉरवर्ड होत राहिल्याने तणाव वेगाने वाढला.

राज्यभर पसरला. इंटरनेट बंदीचा उपाय घटना घडल्या घडल्या लगेच केला असता तर हा तणाव इतका वेगाने वाढला नसता, असे म्हणायला वाव आहे. कारण कोल्हापुरात इंटरनेट बंदी लागताच संदेशांची देवाण-घेवाण थंडावली आणि परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येण्यास मदत झाली. एकूणच काय समाजमाध्यमे जितकी चांगली तितकीच वाईटही आहेत. त्यातले चांगले काय आणि वाईट काय, हे आपण निवडायचे आहे. समाज माध्यमांचा दुरुपयोग करणाºयांना आवर घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यायला हवा. पोलिसांना अशा लोकांची नावे कळवायला हवीत. अशा समाज कंटकांवर कठोर कारवाई केली तरच या माध्यमांचा गैरवापर करणाºयांना चाप बसेल. केवळ फायदे कसे घ्यायचे एवढेच पाहिले जाईल, दुरुपयोग करण्यास कुणी धजावणार नाही. हा दिवस येईल तो सुदिन समजावा.(चंद्रकांत कित्तुरे लेखक लोकमतचे उपवृत्तसंपादक आहेत)‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे