शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

शेतीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या इच्छुक

By admin | Updated: November 11, 2015 23:52 IST

आजरा तालुका : स्थानिक प्रजातींचे बियाणे, खतांचे अस्तित्व धोक्यात

ज्योतीप्रसाद सावंत ल्ल आजराआजरा तालुक्यात असणारी पाण्याची मुबलकता, कसदार जमीन व सकारात्मक भौगोलिक वातावरण यामुळे तालुक्यात नवनवीन शेतीमधील उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने बाहेरच्या बड्या कंपन्या करार तत्त्वावर जमिनीचे मोठे तुकडे घेण्यास प्रयत्नशील असून, दर्जेदार बियाणे, सेंद्रीय शेतीस प्राधान्य व आवश्यकता भासल्यास दर्जेदार खतांचा वापर केला जाणार असल्याने स्थानिक प्रजाती व त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर होणाऱ्या स्थानिक खतांच्या अस्तित्वाबाबत येत्या काही वर्षांत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.करार पद्धतीने दीर्घ कालावधीकरिता विविध पिकांच्या लागवडीसाठी बाहेरच्या कंपन्या आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जमिनी घेण्यास इच्छुक आहेत. त्यादृष्टीने हालचालीही सुरू आहेत. शंभर ते अगदी दहा हजार एकरपर्यंतच्या जमिनींचा शोध आजरा तालुक्यात सुरू आहे. यंत्रांच्या साहाय्याने अत्याधुनिक बियाण्यांचा व प्रगत जैविक, द्रवीय खतांचा वापर करून ही शेती केली जाणार आहे. एका मोठ्या कंपनीने या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बटाटा व हरभरा लागवड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.आंतरराष्ट्रीय कंपन्यांना या सर्व प्रकारात यश आले तर स्थानिक पारंपरिक वाणांचे स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी शेतकरी वर्गास मोठे कष्ट करावे लागणार आहेत. काही शेतकऱ्यांनी थेट करार करून त्यांच्यामार्फत बी-बियाणे, खते पुरवून शेती करवून घेण्याचे पर्यायही शेतकऱ्यांसमोर पुढे येत आहेत.संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास करून दर्जाशी तडजोड न करता बाजारात ज्याची मागणी आहे अशीच पिके पिकविण्याकडे यापुढे अशा कंपन्यांचा कल राहणार आहे. प्राधान्याने सेंद्रीय पद्धतीने पीक घेण्यात येणार असल्याने रासायनिक व इतर खत विक्रीवर मर्यादा येण्याची शक्यता आहे.एकंदर करार तत्त्वावर आंतरराष्ट्रीय कंपन्या आजरा तालुक्यात शेतीवर वर्चस्व निर्माण करण्यास प्रयत्नशील असून, यामुळे स्थानिक शेतीला धोक्याचा इशारा मिळू लागला आहे.ऊस उत्पादन घटणार?बागायत पिकांच्या जमिनीवर अशा कंपन्यांचा डोळा असून, विनासायास भक्कम रकमा जमीनमालकांना मिळणार असल्याने ऊस पिकामध्ये घट होणार आहे.