शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

‘एकीकरण’चा बालेकिल्ला दुहीमुळे सर होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:55 IST

प्रकाश बिळगोजी ।लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ. मात्र, एकीकरण समितीच्या दुहीमुळे गेली दहा वर्षे हा गड राष्ट्रीय पक्षाकडे म्हणजे भाजपकडे आहे. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या उचगाव मतदारसंघातील पश्चिम भाग आणि बागेवाडी मतदारसंघातील पूर्व भागातील खेडी मिळून ...

प्रकाश बिळगोजी ।लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ. मात्र, एकीकरण समितीच्या दुहीमुळे गेली दहा वर्षे हा गड राष्ट्रीय पक्षाकडे म्हणजे भाजपकडे आहे. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या उचगाव मतदारसंघातील पश्चिम भाग आणि बागेवाडी मतदारसंघातील पूर्व भागातील खेडी मिळून नव्याने हा ग्रामीण मतदारसंघ बनला आहे. कट्टर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते या मतदारसंघात मोडतात. समिती, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पुन्हा एकदा या मतदारसंघात होणार आहे. मागील २०१३ च्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि समितीत या तिन्ही पक्षात बंडखोरी झाली होती. यात भाजपचे संजय पाटील विजयी झाले होते.अशी असेल लढतया मतदारसंघात राज्य महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर या काँग्रेसमधून, तर आमदार संजय पाटील हे भाजपमधून आणि एकीकरण समितीतून माजी आमदार मनोहर किणेकर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांची एन्टी इंकम्पसी फॅक्टर म्हणून विद्यमान आमदार संजय पाटील यांनी मतदारसंघ बदल करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, तर एकीकरण समितीतूनदेखील किणेकर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची मागणी होत आहे. तसे न झाल्यास मागील निवडणुकीप्रमाणेच लढत असेल.बंडखोरीची शक्यताया मतदारसंघात जसे मराठी माणसात एकमत न झाल्यास समितीच्या दोन्ही गटातील उमेदवार समोरासमोर उभे राहू शकतात, तर दुसरीकडे काँग्रेसमध्येदेखील माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे समर्थक शिवनगौडा पाटील यांनी निधर्मी जनता दलात सामील होऊन आपली उमेदवारी नक्की केली आहे. भाजपमध्ये केजीपी-भाजप या निवडणुकीत एक झाले तरी जनसंपर्क कमी पडल्याने एन्टी इंकम्पसीमुळे विद्यमान भाजप आमदारांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही.मराठी अस्मिता आणि विकास हीच मुख्य कारणे या मतदारसंघात येतात. पश्चिम भाग ९० टक्के मराठी भाषिक मतदार आहे, तर पूर्व भागातील अर्धा भाग मराठी आहे, त्यामुळे मराठीचे प्राबल्य या मतदारसंघावर आहे. एकीकरण समितीत एकी झाल्यास एकास एक उमेदवार आल्यास या मतदारसंघात समितीला विजय मिळवणे सोपे जाईल, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच ग्रामीण मतदारसंघातील गावागावांतून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे मुख्यत: समिती विरुद्ध काँग्रेस अशीच लढत या मतदारसंघात दिसण्याची चिन्हे आहेत.