शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘एकीकरण’चा बालेकिल्ला दुहीमुळे सर होईना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:55 IST

प्रकाश बिळगोजी ।लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ. मात्र, एकीकरण समितीच्या दुहीमुळे गेली दहा वर्षे हा गड राष्ट्रीय पक्षाकडे म्हणजे भाजपकडे आहे. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या उचगाव मतदारसंघातील पश्चिम भाग आणि बागेवाडी मतदारसंघातील पूर्व भागातील खेडी मिळून ...

प्रकाश बिळगोजी ।लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बेळगाव ग्रामीण मतदारसंघ. मात्र, एकीकरण समितीच्या दुहीमुळे गेली दहा वर्षे हा गड राष्ट्रीय पक्षाकडे म्हणजे भाजपकडे आहे. २००८ साली झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या उचगाव मतदारसंघातील पश्चिम भाग आणि बागेवाडी मतदारसंघातील पूर्व भागातील खेडी मिळून नव्याने हा ग्रामीण मतदारसंघ बनला आहे. कट्टर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते या मतदारसंघात मोडतात. समिती, भाजप आणि काँग्रेस अशी तिहेरी लढत पुन्हा एकदा या मतदारसंघात होणार आहे. मागील २०१३ च्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि समितीत या तिन्ही पक्षात बंडखोरी झाली होती. यात भाजपचे संजय पाटील विजयी झाले होते.अशी असेल लढतया मतदारसंघात राज्य महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर या काँग्रेसमधून, तर आमदार संजय पाटील हे भाजपमधून आणि एकीकरण समितीतून माजी आमदार मनोहर किणेकर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांची एन्टी इंकम्पसी फॅक्टर म्हणून विद्यमान आमदार संजय पाटील यांनी मतदारसंघ बदल करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, तर एकीकरण समितीतूनदेखील किणेकर यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची मागणी होत आहे. तसे न झाल्यास मागील निवडणुकीप्रमाणेच लढत असेल.बंडखोरीची शक्यताया मतदारसंघात जसे मराठी माणसात एकमत न झाल्यास समितीच्या दोन्ही गटातील उमेदवार समोरासमोर उभे राहू शकतात, तर दुसरीकडे काँग्रेसमध्येदेखील माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे समर्थक शिवनगौडा पाटील यांनी निधर्मी जनता दलात सामील होऊन आपली उमेदवारी नक्की केली आहे. भाजपमध्ये केजीपी-भाजप या निवडणुकीत एक झाले तरी जनसंपर्क कमी पडल्याने एन्टी इंकम्पसीमुळे विद्यमान भाजप आमदारांना ही निवडणूक म्हणावी तेवढी सोपी नाही.मराठी अस्मिता आणि विकास हीच मुख्य कारणे या मतदारसंघात येतात. पश्चिम भाग ९० टक्के मराठी भाषिक मतदार आहे, तर पूर्व भागातील अर्धा भाग मराठी आहे, त्यामुळे मराठीचे प्राबल्य या मतदारसंघावर आहे. एकीकरण समितीत एकी झाल्यास एकास एक उमेदवार आल्यास या मतदारसंघात समितीला विजय मिळवणे सोपे जाईल, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदरच ग्रामीण मतदारसंघातील गावागावांतून प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे मुख्यत: समिती विरुद्ध काँग्रेस अशीच लढत या मतदारसंघात दिसण्याची चिन्हे आहेत.