शहरं
Join us  
Trending Stories
1
निशस्त्र आंदोलकांवर गोळीबार, बॉम्ब टाकण्याचे आदेश, शेख हसीना दोषी, कोर्टाने सुनावली फाशीची शिक्षा 
2
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
3
भाजपाचा यू टर्न! काशिनाथ चौधरींच्या पक्षप्रवेशाला स्थगिती; पालघर साधू हत्याकांडात झाले होते आरोप
4
Delhi Blast : नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
5
Video: माकडाच्या उडीने REEL मध्ये आलं वेगळंच 'थ्रिल' !! घाबरलेल्या मुलीने पुढे काय केलं बघा
6
चाणक्यनीती: कोणी त्रास देत असेल तर अशा हितशत्रूंशी लढण्यासाठी वापरा 'या' ३ गुप्त रणनीती! |
7
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
8
भारत सरकार शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठवणार? नियम काय सांगतात?
9
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
10
ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?
11
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
12
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
13
Amravati: अमरावतीत उपजिल्हा रुग्णालयात तीन बालकांसह गर्भवतीचा दुदैवी अंत!
14
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
15
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
16
UPI Transaction Failed: UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
17
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
18
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
19
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
20
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
Daily Top 2Weekly Top 5

पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्यास विम्याचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे अशा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विम्याचा परतावा देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी शिरोळमधील ५ टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे यंदाच्या खरीप हंगामात शिरोळ तालुक्यातील ७ पैकी ६ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरुंदवाड या गावांचा समावेश आहे. पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार ६ महसूल मंडळ गटात सोयाबीन व भुईमूग या पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याचे आढळले आहे.

ज्या शेतक-यांनी सोयाबीन व भुईमूग पीक विमा हप्ता रक्कम २३ जुलै २०२१ अखेर किंवा त्यापूर्वी भरली आहे किंवा त्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम वजा झाली आहे असेच शेतकरी मदतीसाठी पात्र असणार आहे. अपेक्षित नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ देण्यात येणार असून ही मदत अंतिम नुकसानभरपाई रक्कमेतून दिली जाईल. कृषि व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय शासननिर्णयानुसार ही नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी ५ क्षेत्रातील शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरुंदवाड येथील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

----

नुकसानीचा तपशील

तालुका : पिक : क्षेत्र, महसूल मंडल गट : सरासरी उत्पादकता कि./ हे., : प्रत्यक्ष उत्पादन : टक्के

शिरोळ : सोयाबीन : शिरोळ, नृसिंहवाडी : २०७२.८ : ० : ०

जयसिंगपूर, नांदणी : १८१८.६ : ५७३.०७ (जयसिंगपूर) : ३१.५१

शिरढोण, दत्तवाड, कुरुंदवाड : १७०३.३ : ० : ०

------------

शिरोळ : भुईमूग : शिरोळ, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर : १३३०.९ : ३८३.३३ (जयसिंगपूर) : २८.८०

शिरढोण, दत्तवाड, कुरुंदवाड : १२०९ : ० : ०

-----------