शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्यास विम्याचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे अशा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विम्याचा परतावा देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी शिरोळमधील ५ टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे यंदाच्या खरीप हंगामात शिरोळ तालुक्यातील ७ पैकी ६ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरुंदवाड या गावांचा समावेश आहे. पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार ६ महसूल मंडळ गटात सोयाबीन व भुईमूग या पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याचे आढळले आहे.

ज्या शेतक-यांनी सोयाबीन व भुईमूग पीक विमा हप्ता रक्कम २३ जुलै २०२१ अखेर किंवा त्यापूर्वी भरली आहे किंवा त्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम वजा झाली आहे असेच शेतकरी मदतीसाठी पात्र असणार आहे. अपेक्षित नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ देण्यात येणार असून ही मदत अंतिम नुकसानभरपाई रक्कमेतून दिली जाईल. कृषि व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय शासननिर्णयानुसार ही नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी ५ क्षेत्रातील शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरुंदवाड येथील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

----

नुकसानीचा तपशील

तालुका : पिक : क्षेत्र, महसूल मंडल गट : सरासरी उत्पादकता कि./ हे., : प्रत्यक्ष उत्पादन : टक्के

शिरोळ : सोयाबीन : शिरोळ, नृसिंहवाडी : २०७२.८ : ० : ०

जयसिंगपूर, नांदणी : १८१८.६ : ५७३.०७ (जयसिंगपूर) : ३१.५१

शिरढोण, दत्तवाड, कुरुंदवाड : १७०३.३ : ० : ०

------------

शिरोळ : भुईमूग : शिरोळ, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर : १३३०.९ : ३८३.३३ (जयसिंगपूर) : २८.८०

शिरढोण, दत्तवाड, कुरुंदवाड : १२०९ : ० : ०

-----------