शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

पिकाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्यास विम्याचा परतावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:29 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे अशा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विम्याचा परतावा देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी शिरोळमधील ५ टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे यंदाच्या खरीप हंगामात शिरोळ तालुक्यातील ७ पैकी ६ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरुंदवाड या गावांचा समावेश आहे. पिकांच्या नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार ६ महसूल मंडळ गटात सोयाबीन व भुईमूग या पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन होणार असल्याचे आढळले आहे.

ज्या शेतक-यांनी सोयाबीन व भुईमूग पीक विमा हप्ता रक्कम २३ जुलै २०२१ अखेर किंवा त्यापूर्वी भरली आहे किंवा त्यांच्या खात्यातून विमा हप्ता रक्कम वजा झाली आहे असेच शेतकरी मदतीसाठी पात्र असणार आहे. अपेक्षित नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्क्यांपर्यंतची रक्कम आगाऊ देण्यात येणार असून ही मदत अंतिम नुकसानभरपाई रक्कमेतून दिली जाईल. कृषि व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय शासननिर्णयानुसार ही नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी ५ क्षेत्रातील शिरोळ, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, दत्तवाड व कुरुंदवाड येथील सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

----

नुकसानीचा तपशील

तालुका : पिक : क्षेत्र, महसूल मंडल गट : सरासरी उत्पादकता कि./ हे., : प्रत्यक्ष उत्पादन : टक्के

शिरोळ : सोयाबीन : शिरोळ, नृसिंहवाडी : २०७२.८ : ० : ०

जयसिंगपूर, नांदणी : १८१८.६ : ५७३.०७ (जयसिंगपूर) : ३१.५१

शिरढोण, दत्तवाड, कुरुंदवाड : १७०३.३ : ० : ०

------------

शिरोळ : भुईमूग : शिरोळ, नृसिंहवाडी, नांदणी, जयसिंगपूर : १३३०.९ : ३८३.३३ (जयसिंगपूर) : २८.८०

शिरढोण, दत्तवाड, कुरुंदवाड : १२०९ : ० : ०

-----------