शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम पिकासाठी विम्याचे कवच

By admin | Updated: November 17, 2014 23:52 IST

शेतकऱ्यांना लाभदायक : विमा योजनेत सरकारचा ७५ टक्के वाटा

एम. ए. पठाण- कोल्हापूर -राज्यातील रेशीम शेतीसाठी १२व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत केंद्रपुरस्कृत सीडीपी योजनेमधून रेशीम पीक विमा योजना लागू झाली आहे. परिणामी, रेशीम उद्योगवाढीसाठी चालना मिळणार आहे.रेशीम उद्योग हा कृषी आधारित कुटीर उद्योग आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारांना याद्वारे रोजगार उपलब्ध होत आहे. रेशीम उद्योगात तुतीची लागवड करून कोष उत्पादन करणे, कोषापासून धागा तयार करणे, धाग्याला पीळ देणे, कापड तयार करणे, कापडावर प्रक्रिया करणे, या बाबींचा समावेश होतो.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. त्यामुळे ऊसपट्ट्यात रेशीम पिकासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हे रेशीम कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोरील आव्हान आहे. अशा उद्योगास चालना देण्यासाठी विविध योजना केंद्र शासनातर्फे राबविल्या जात आहेत. रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी द न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीमार्फत रेशीम पीक योजना लागू केली आहे. रेशीम शेतकऱ्यांना विमा हप्ता नाममात्र २५ टक्के भरावा लागणार आहे. उर्वरित ७५ टक्के हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे. सी. बी. अंडीपुंजासाठी हप्त्याची रक्कम रुपये ८४ रुपये प्रति १00 अंडीपुंज व बायव्हाहटाईन अंडीपुंजासाठी रुपये ९७.५0 प्रति १00 अंडीपुंज, अशी निर्धारित केली. सी. बी. पिकासाठी आठ हजार रुपये प्रति १00 अंडीपुंज, बायहोटटाईन पिकासाठी दहा हजार रुपये प्रति १00 अंडीपुंज, असे विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.अर्थसाहाय्याची पद्धतीइच्छुक सहकारी संस्थांनी याबाबत रेशीम पैदास विकास संचालक किंवा सहकार निबंधक, किंवा महामंडळाच्या प्रादेशिक संचालक यांच्याशी संपर्क साधावा. विहित नमुन्यातील सहकार निबंधक यांच्याकडे अर्ज करावेत. अर्जाच्या आगाऊ प्रती महामंडळाचे प्रादेशिक संचालनालय, किंवा मुख्य कार्यालयाकडे पाठवाव्यात. संस्थेच्या अर्जासमवेत सहकार निबंधकांची शिफारस असणे आवश्यक आहे.जिल्ह्यात तुती लागवडीसाठी गडहिंग्लज, चंदगड, हातकणंगले परिसरात प्रतिसाद मिळत आहे. तुती लागवड करणारे १५३ शेतकरी असून, एकूण १७१ एकर क्षेत्र तुती लागवडीखाली आहे. यंदा १५0 एकरांचे उद्दिष्ट ठेवले होते. यामध्ये ७२ शेतकऱ्यांनी ७७ एकरांमध्ये तुती लागवड केली आहे. भविष्यात रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी विमा योजना लाभदायक ठरू शकते.रेशीम-किडे पालन करुन सुताच्या लडी बनविणाऱ्या प्राथमिक सहकारी संस्था व राज्यस्तरीय संघांना अर्थसाहाय्य.तांत्रिक आणि स्थापण्यासाठी /एकात्मिक रेशीम पैदासविकास करण्यासाठी.रेशीम-आधारित उद्योग प्रकल्पासाठी, प्रकल्प सुसाध्यतेचाअभ्यास अर्थसाहाय्य.जिल्ह्यात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुती लागवड, रोप वितरण, शेड उभारणी, आदींसाठी योजना आहेत. त्याचबरोबर रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी आता रेशीम पीक विमा योजना शासनाने लागू केली असून, याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा. - एम. के. मुल्ला रेशीम विकास अधिकारी, कोल्हापूर