शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

रेशीम पिकासाठी विम्याचे कवच

By admin | Updated: November 17, 2014 23:52 IST

शेतकऱ्यांना लाभदायक : विमा योजनेत सरकारचा ७५ टक्के वाटा

एम. ए. पठाण- कोल्हापूर -राज्यातील रेशीम शेतीसाठी १२व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत केंद्रपुरस्कृत सीडीपी योजनेमधून रेशीम पीक विमा योजना लागू झाली आहे. परिणामी, रेशीम उद्योगवाढीसाठी चालना मिळणार आहे.रेशीम उद्योग हा कृषी आधारित कुटीर उद्योग आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारांना याद्वारे रोजगार उपलब्ध होत आहे. रेशीम उद्योगात तुतीची लागवड करून कोष उत्पादन करणे, कोषापासून धागा तयार करणे, धाग्याला पीळ देणे, कापड तयार करणे, कापडावर प्रक्रिया करणे, या बाबींचा समावेश होतो.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. त्यामुळे ऊसपट्ट्यात रेशीम पिकासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हे रेशीम कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोरील आव्हान आहे. अशा उद्योगास चालना देण्यासाठी विविध योजना केंद्र शासनातर्फे राबविल्या जात आहेत. रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी द न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीमार्फत रेशीम पीक योजना लागू केली आहे. रेशीम शेतकऱ्यांना विमा हप्ता नाममात्र २५ टक्के भरावा लागणार आहे. उर्वरित ७५ टक्के हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे. सी. बी. अंडीपुंजासाठी हप्त्याची रक्कम रुपये ८४ रुपये प्रति १00 अंडीपुंज व बायव्हाहटाईन अंडीपुंजासाठी रुपये ९७.५0 प्रति १00 अंडीपुंज, अशी निर्धारित केली. सी. बी. पिकासाठी आठ हजार रुपये प्रति १00 अंडीपुंज, बायहोटटाईन पिकासाठी दहा हजार रुपये प्रति १00 अंडीपुंज, असे विमा संरक्षण प्राप्त होणार आहे.अर्थसाहाय्याची पद्धतीइच्छुक सहकारी संस्थांनी याबाबत रेशीम पैदास विकास संचालक किंवा सहकार निबंधक, किंवा महामंडळाच्या प्रादेशिक संचालक यांच्याशी संपर्क साधावा. विहित नमुन्यातील सहकार निबंधक यांच्याकडे अर्ज करावेत. अर्जाच्या आगाऊ प्रती महामंडळाचे प्रादेशिक संचालनालय, किंवा मुख्य कार्यालयाकडे पाठवाव्यात. संस्थेच्या अर्जासमवेत सहकार निबंधकांची शिफारस असणे आवश्यक आहे.जिल्ह्यात तुती लागवडीसाठी गडहिंग्लज, चंदगड, हातकणंगले परिसरात प्रतिसाद मिळत आहे. तुती लागवड करणारे १५३ शेतकरी असून, एकूण १७१ एकर क्षेत्र तुती लागवडीखाली आहे. यंदा १५0 एकरांचे उद्दिष्ट ठेवले होते. यामध्ये ७२ शेतकऱ्यांनी ७७ एकरांमध्ये तुती लागवड केली आहे. भविष्यात रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी विमा योजना लाभदायक ठरू शकते.रेशीम-किडे पालन करुन सुताच्या लडी बनविणाऱ्या प्राथमिक सहकारी संस्था व राज्यस्तरीय संघांना अर्थसाहाय्य.तांत्रिक आणि स्थापण्यासाठी /एकात्मिक रेशीम पैदासविकास करण्यासाठी.रेशीम-आधारित उद्योग प्रकल्पासाठी, प्रकल्प सुसाध्यतेचाअभ्यास अर्थसाहाय्य.जिल्ह्यात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तुती लागवड, रोप वितरण, शेड उभारणी, आदींसाठी योजना आहेत. त्याचबरोबर रेशीम उद्योगास चालना देण्यासाठी आता रेशीम पीक विमा योजना शासनाने लागू केली असून, याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा. - एम. के. मुल्ला रेशीम विकास अधिकारी, कोल्हापूर