शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आंदोलनकर्त्यांनाच अपमानित करणे ही निंदनीय बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

इचलकरंजी : आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यंत आदराचा विषय आहेत. मात्र, शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची ...

इचलकरंजी : आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यंत आदराचा विषय आहेत. मात्र, शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची व त्यांच्या समर्थकांची सरसकट 'आंदोलनजीवी' अशी हेटाळणी करून समस्त आंदोलनकर्त्यांनाच अपमानित केले जात आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीत आयोजित 'आंदोलनजीवी देशउभारे देशभक्त असतात देशविके नव्हे' या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत आंदोलने, निदर्शने, मोर्चा असे मार्ग अवलंबणे गृहीत असते, पण सत्याला सामोरे जाण्याची, शंकांचे निरसन करण्याची कुवत वा धमक नसली की, अशी असंस्कृत भाषा येत असते. ती भ्याड मनोवृत्तीतून अथवा हुकूमशाही विकृतीतून येत असते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शेतकरी आंदोलनजीवी नसून पंतप्रधानच भांडवलदारजीवी असल्याची व ते आंदोलक आहेत जुमलेबाज नाहीत, अशी टीका करून शेतकऱ्यांची हेटाळणी केल्याबद्दल माफी मागावी अशी, तसेच २६ जानेवारीच्या प्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. सरकारने एक-दोन बगलबच्च्या भांडवलदारांच्या ओसंडून वाहणाऱ्या तिजोऱ्या पुन्हा भरण्याऐवजी या देशातील अब्जावधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविले पाहिजेत. दमनाला अहिंसेने उत्तर देऊन यशस्वी होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, समतेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा हा देश आहे, असे चर्चासत्रात मत पुढे आले. प्रसाद कुलकर्णी यांच्या बीजभाषणानंतर झालेल्या चर्चासत्रात शशांक बावचकर, दयानंद लिपारे, तुकाराम अपराध, राजन मुठाणे, महालिंग कोळेकर, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी, बापूसाहेब भोसले सहभागी झाले होते.