शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

आंदोलनकर्त्यांनाच अपमानित करणे ही निंदनीय बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

इचलकरंजी : आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यंत आदराचा विषय आहेत. मात्र, शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची ...

इचलकरंजी : आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यंत आदराचा विषय आहेत. मात्र, शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची व त्यांच्या समर्थकांची सरसकट 'आंदोलनजीवी' अशी हेटाळणी करून समस्त आंदोलनकर्त्यांनाच अपमानित केले जात आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीत आयोजित 'आंदोलनजीवी देशउभारे देशभक्त असतात देशविके नव्हे' या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत आंदोलने, निदर्शने, मोर्चा असे मार्ग अवलंबणे गृहीत असते, पण सत्याला सामोरे जाण्याची, शंकांचे निरसन करण्याची कुवत वा धमक नसली की, अशी असंस्कृत भाषा येत असते. ती भ्याड मनोवृत्तीतून अथवा हुकूमशाही विकृतीतून येत असते. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने शेतकरी आंदोलनजीवी नसून पंतप्रधानच भांडवलदारजीवी असल्याची व ते आंदोलक आहेत जुमलेबाज नाहीत, अशी टीका करून शेतकऱ्यांची हेटाळणी केल्याबद्दल माफी मागावी अशी, तसेच २६ जानेवारीच्या प्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी केली आहे. सरकारने एक-दोन बगलबच्च्या भांडवलदारांच्या ओसंडून वाहणाऱ्या तिजोऱ्या पुन्हा भरण्याऐवजी या देशातील अब्जावधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविले पाहिजेत. दमनाला अहिंसेने उत्तर देऊन यशस्वी होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासह सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, समतेसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा हा देश आहे, असे चर्चासत्रात मत पुढे आले. प्रसाद कुलकर्णी यांच्या बीजभाषणानंतर झालेल्या चर्चासत्रात शशांक बावचकर, दयानंद लिपारे, तुकाराम अपराध, राजन मुठाणे, महालिंग कोळेकर, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी, बापूसाहेब भोसले सहभागी झाले होते.