शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

‘एफआरपी’ऐवजी साखर म्हणजे भीक नको; पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:48 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उर्वरित एफआरपीपोटी शेतकऱ्यांना साखर देण्याची खासदार राजू शेट्टी यांनी केलेली मागणी ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उर्वरित एफआरपीपोटी शेतकऱ्यांना साखर देण्याची खासदार राजू शेट्टी यांनी केलेली मागणी अव्यवहार्यच आहे. शेतकºयांकडे मार्केटिंगचे तंत्र नसल्याने सध्या शेतीमालाची व्यापाºयांकडून लूट सुरू आहे. त्यात साखर घेऊन तिची विक्री करणे हे त्यांच्या आवाक्याबाहेर असून, पैशांऐवजी शेतकºयांच्या गळ्यात साखर मारून साखर कारखाने सुटतील; पण शेतकरी अडकणार आहेत. बाजारातील साखरेचा भाव, तिची विक्री व्यवस्था आणि व्यापाºयांच्या मनमानीमुळे ‘भीक नको; पण कुत्रे आवर’ म्हणण्याची वेळ शेतकºयांवर या निर्णयाने येऊ शकते.एकरकमी ‘एफआरपी’वरून राज्यात ‘स्वाभिमानी’ व साखर कारखानदार आमने-सामने आले आहेत. सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देऊ शकत नसल्याचे कारण पुढे करीत, राज्यातील कारखान्यांनी दोन टप्प्यांत एफआरपी खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केल्याने ‘स्वाभिमानी’ने आंदोलन केले. कोल्हापूर, सांगलीत आंदोलन सुरू असताना खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांची भेट घेऊन पहिली उचल दिल्यानंतर ‘एफआरपी’मधील उर्वरित रक्कम रोखीने देण्याऐवजी तेवढ्या रकमेची साखर शेतकºयांना द्यावी, अशी मागणी केली. या मागणीची शेतकºयांसह साखर कारखानदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. शेट्टी यांची मागणी पैसेवसुलीच्या अर्थाने व तात्त्विकत: योग्य असली तरी व्यावहारिकदृष्ट्या ती योग्य नाही. बॅँकांकडे साखर तारण आहे, शेतकºयांना द्यायचे ठरविले तरी बॅँका ती सोडणार नाहीत. तरीही शेतकºयांना साखर दिली तरी तिची विल्हेवाट लावणे कठीण आहे. केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय शेतकºयांना विनापरवाना खुल्या बाजारात साखर विक्री करता येणार नाही. जरी विक्री करायची ठरविली तरी त्यांच्याकडे साठवणुकीची क्षमता व सुरक्षितता नसल्याने शेतकरी हातात साखर पडताच विक्रीचा प्रयत्न करणार; परिणामी व्यापारी दर पाडण्याची भीतीही आहे. शेतकºयांकडे मार्केटिंगची यंत्रणा नसल्याने वांगी, भेंडी हा शेतीमाल विक्री करतानाच त्याची लूट होते; मग साखरेचे काय होणार? त्यामुळे एफआरपीच्या उर्वरित रकमेऐवजी कारखाने शेतकºयांना साखर देऊन स्वत: सुटतील; पण शेतकरी अडकणार आहेत. एकूणच शेट्टी यांची ही मागणी म्हणजे शेतकºयांच्या दृष्टीने ‘भीक नको, पण कुत्रे आवर’ अशीच होणार आहे.आॅस्ट्रेलियात शेतकºयांना पैशाऐवजी साखरआॅस्ट्रेलियात शेतकºयांना उसाच्या पैशाऐवजी एकूण उत्पादित साखरेपैकी संबंधित शेतकºयाला ६५ टक्के साखर द्यायची आणि३५ टक्के कारखान्याला घेतली जाते. शेतकरी कारखान्यांच्या मदतीने एक तर निर्यात करतात किंवा वायदे बाजारात साखर विक्री करतात; पण तेवढे मोठे शेतकरी आणि मार्केटिंगचे तंत्र भारतीय शेतकºयांकडे नसल्याने ते येथे शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.किलो साखर वर्षाला कुटुंबाला पुरेशीऊस उत्पादकांपैकी ८५ टक्के उत्पादन एक-दीड एकराच्या आतील आहे. सरासरी दीड एकरात ६० टन उसाचे उत्पादन गृहीत धरले आणि ‘एफआरपी’तील ८० टक्के रक्कम दिल्यानंतर उर्वरित २० टक्के (सरासरी ५०० रुपये प्रतिटन) देय रकमेची १० क्विंटल साखर होते. देशात घरगुती साखर वापरण्याचे प्रमाण प्रतिमाणसी महिन्याला दीड किलो आहे. पाचजणांच्या कुटुंबाला महिन्याला ७.५ किलो आणि वर्षाला सरासरी ९० किलो साखर लागते. त्यामुळे मिळणाºया १० क्विंटलपैकी नऊ क्विंटलची विक्री करावी लागणार आहे.