शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

तुकडीऐवजी विद्यार्थी वाढविणार

By admin | Updated: July 9, 2015 23:58 IST

शासनाचा निर्णय : प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांना दिलासा; प्रस्तावाचा आज अखेरचा दिवस

कोल्हापूर : पदवीच्या प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांप्रश्नी पहिल्यांदा तुकडी वाढवून देण्याचा विचार राज्य शासनाने केला होता. मात्र, आता तुकडी नाही, विद्यार्थी संख्या वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत उच्चशिक्षण विभागाने या आनुषंगाने निर्णय घेतला. बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्याने यावर्षी प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आणि नवीन महाविद्यालय, तुकडी, विषयांना मान्यता न देण्याचा २९ एप्रिल २०१५ रोजी मंजूर झालेला शासन आदेश, अशा बाबींमुळे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा गुंता यावर्षीही कायम राहिला आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९१.५४ टक्के लागला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एक लाख चार हजार ९०६ होती, शिवाय सुमारे २५ हजार अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी विभागाच्या निकालाची टक्केवारी ०.५९ ने वाढली असून, एक लाख १५ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाढलेली संख्या पाहता यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सुमारे २० हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकड्यांना मान्यता देणे आवश्यक असल्याचे प्रयत्न प्राचार्य, संस्थाचालकांकडून सुरू होते. विद्यार्थी हित लक्षात घेऊन गेल्या महिन्यापासून त्यांनी शिवाजी विद्यापीठ, उच्चशिक्षण विभागाकडे तुकड्या वाढवून देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तुकडी वाढवून देण्याचा विचार शासनाने केला होता. त्यावर महाविद्यालयांकडून प्रस्ताव घेऊन ते उच्चशिक्षण विभागाकडे पाठवून द्यावेत, अशी सूचना विद्यापीठांना करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाकडे महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर होत असतानाच मुंबईत झालेल्या बैठकीत तुकडी नाही, तर सध्या असलेल्या वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात गेल्यावर्षी प्रमाणेच विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसार विद्यार्थी संख्या वाढवून मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. (प्रतिनिधी)नव्या निर्णयाचा आधारअतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकडी मागण्यासाठीचे प्रस्ताव विद्यापीठाकडे येत आहेत. प्रस्ताव देण्याची अंतिम मुदत आज, शुक्रवारपर्यंत आहे. दाखल झालेल्या प्रस्तावानंतर एकूण किती विद्यार्थी अतिरिक्त होणार, हे समजेल. नव्या निर्णयानुसार विद्यापीठ कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढवून दिली जाईल, अशी माहिती ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी दिली.