शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुकडीऐवजी विद्यार्थी वाढविणार

By admin | Updated: July 9, 2015 23:58 IST

शासनाचा निर्णय : प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांना दिलासा; प्रस्तावाचा आज अखेरचा दिवस

कोल्हापूर : पदवीच्या प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांप्रश्नी पहिल्यांदा तुकडी वाढवून देण्याचा विचार राज्य शासनाने केला होता. मात्र, आता तुकडी नाही, विद्यार्थी संख्या वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत उच्चशिक्षण विभागाने या आनुषंगाने निर्णय घेतला. बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्याने यावर्षी प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आणि नवीन महाविद्यालय, तुकडी, विषयांना मान्यता न देण्याचा २९ एप्रिल २०१५ रोजी मंजूर झालेला शासन आदेश, अशा बाबींमुळे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा गुंता यावर्षीही कायम राहिला आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९१.५४ टक्के लागला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एक लाख चार हजार ९०६ होती, शिवाय सुमारे २५ हजार अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी विभागाच्या निकालाची टक्केवारी ०.५९ ने वाढली असून, एक लाख १५ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाढलेली संख्या पाहता यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सुमारे २० हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकड्यांना मान्यता देणे आवश्यक असल्याचे प्रयत्न प्राचार्य, संस्थाचालकांकडून सुरू होते. विद्यार्थी हित लक्षात घेऊन गेल्या महिन्यापासून त्यांनी शिवाजी विद्यापीठ, उच्चशिक्षण विभागाकडे तुकड्या वाढवून देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तुकडी वाढवून देण्याचा विचार शासनाने केला होता. त्यावर महाविद्यालयांकडून प्रस्ताव घेऊन ते उच्चशिक्षण विभागाकडे पाठवून द्यावेत, अशी सूचना विद्यापीठांना करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाकडे महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर होत असतानाच मुंबईत झालेल्या बैठकीत तुकडी नाही, तर सध्या असलेल्या वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात गेल्यावर्षी प्रमाणेच विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसार विद्यार्थी संख्या वाढवून मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. (प्रतिनिधी)नव्या निर्णयाचा आधारअतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकडी मागण्यासाठीचे प्रस्ताव विद्यापीठाकडे येत आहेत. प्रस्ताव देण्याची अंतिम मुदत आज, शुक्रवारपर्यंत आहे. दाखल झालेल्या प्रस्तावानंतर एकूण किती विद्यार्थी अतिरिक्त होणार, हे समजेल. नव्या निर्णयानुसार विद्यापीठ कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढवून दिली जाईल, अशी माहिती ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी दिली.