शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

तुकडीऐवजी विद्यार्थी वाढविणार

By admin | Updated: July 9, 2015 23:58 IST

शासनाचा निर्णय : प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांना दिलासा; प्रस्तावाचा आज अखेरचा दिवस

कोल्हापूर : पदवीच्या प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांप्रश्नी पहिल्यांदा तुकडी वाढवून देण्याचा विचार राज्य शासनाने केला होता. मात्र, आता तुकडी नाही, विद्यार्थी संख्या वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत उच्चशिक्षण विभागाने या आनुषंगाने निर्णय घेतला. बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्याने यावर्षी प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या आणि नवीन महाविद्यालय, तुकडी, विषयांना मान्यता न देण्याचा २९ एप्रिल २०१५ रोजी मंजूर झालेला शासन आदेश, अशा बाबींमुळे पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा गुंता यावर्षीही कायम राहिला आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल ९१.५४ टक्के लागला होता. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एक लाख चार हजार ९०६ होती, शिवाय सुमारे २५ हजार अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर्षी विभागाच्या निकालाची टक्केवारी ०.५९ ने वाढली असून, एक लाख १५ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाढलेली संख्या पाहता यंदा प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सुमारे २० हजार विद्यार्थी अतिरिक्त ठरणार आहेत. त्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकड्यांना मान्यता देणे आवश्यक असल्याचे प्रयत्न प्राचार्य, संस्थाचालकांकडून सुरू होते. विद्यार्थी हित लक्षात घेऊन गेल्या महिन्यापासून त्यांनी शिवाजी विद्यापीठ, उच्चशिक्षण विभागाकडे तुकड्या वाढवून देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तुकडी वाढवून देण्याचा विचार शासनाने केला होता. त्यावर महाविद्यालयांकडून प्रस्ताव घेऊन ते उच्चशिक्षण विभागाकडे पाठवून द्यावेत, अशी सूचना विद्यापीठांना करण्यात आली होती. त्यानुसार विद्यापीठाकडे महाविद्यालयांकडून प्रस्ताव सादर होत असतानाच मुंबईत झालेल्या बैठकीत तुकडी नाही, तर सध्या असलेल्या वर्गांमध्ये विद्यार्थी संख्या वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात गेल्यावर्षी प्रमाणेच विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसार विद्यार्थी संख्या वाढवून मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. (प्रतिनिधी)नव्या निर्णयाचा आधारअतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी वाढीव तुकडी मागण्यासाठीचे प्रस्ताव विद्यापीठाकडे येत आहेत. प्रस्ताव देण्याची अंतिम मुदत आज, शुक्रवारपर्यंत आहे. दाखल झालेल्या प्रस्तावानंतर एकूण किती विद्यार्थी अतिरिक्त होणार, हे समजेल. नव्या निर्णयानुसार विद्यापीठ कायद्यातील तरतुदी लक्षात घेऊन महाविद्यालयांना विद्यार्थी संख्या वाढवून दिली जाईल, अशी माहिती ‘बीसीयुडी’चे संचालक डॉ. डी. आर. मोरे यांनी दिली.