शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉल्बी’च्या विसर्जनातून दोन बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना

By admin | Updated: May 19, 2017 00:24 IST

‘डॉल्बी’च्या विसर्जनातून दोन बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा गतवर्षी गणेशोत्सवात पोलिसांनी केलेला संकल्प अखेर पूर्णत्वास गेला आहे. गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘डॉल्बी’साठी खर्च होणारे पैसे ‘जलयुक्त शिवारा’ला दिल्याने, जिल्ह्यात दोन सिमेंट बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दुष्काळ हटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पोलिस दलाने सामाजिक बांधिलकीतून विधायक व रचनात्मक काम करुन राज्यातील सर्व जिल्ह्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. मल्लेवाडी (ता. मिरज) व मणेराजुरी (ता. तासगाव) येथे २७ लाखांच्या गणेशोत्सव मंडळांच्या वर्गणीतून हे बंधारे साकारण्यात आले आहेत. मल्लेवाडीतील बंधाऱ्याचा शुक्रवारी, दि. १९ रोजी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा होत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मल्लेवाडीतील बंधाऱ्याचे ‘सुखकर्ता’, तर मणेराजुरीच्या बंधाऱ्याचे ‘विघ्नहर्ता’ असे नामकरण करण्यात आले आहे. गतवर्षीचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ करण्याचा निर्धार पोलिस यंत्रणेने केला होता. यासाठी मंडळांच्या गावोगावी २०७ बैठका घेतल्या. मी स्वत: तालुकास्तरावर दहा बैठका घेतल्या. डॉल्बीच्या दुष्परिणामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेस हातभार लावण्याचा निर्णय घेतला. मंडळांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८६३ मंडळांनी लोकवर्गणीतून जमा झालेले २७ लाख ८० हजार रुपये योजनेसाठी दिले. त्यातूनच दोन सिमेंट बंधारे बांधले आहेत. म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून मल्लेवाडीच्या बंधाऱ्यात कायम पाणी दिसेल.पोलिस प्रमुखांची धडपड यशस्वीजिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी उपक्रमासाठी केलेली धडपड अखेर यशस्वी झाली आहे. ‘नो डॉल्बी’मुळे पारंपरिक वाद्यांनाही सुगीचे दिवस आले. दणदणाटाशिवाय पहिल्यांदाच गणेशोत्सव पार पडला. अशाप्रकारे अनेक चांगले परिणाम या मोहिमेतून साकारले. त्यामुळे गतवर्षी गणेशोत्सवाने क्रांतीची बीजे पेरून नवा आदर्श निर्माण केला आहे. मंडळांना पुरस्कारशिंदे म्हणाले, ही संकल्पना प्रत्यक्षात पूर्णत्वास येण्यात मोलाटा वाटा असलेल्या मंडळांना ‘विघ्नहर्ता’ पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पोलिस ठाणे स्तरावर एक हजार, सातशे व पाचशे रुपये, तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे. जिल्हास्तरावरही मंडळांना पाच हजार, तीन हजार व दोन हजार अशी बक्षिसे मंडळांना दिली जाणार आहेत.