शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

‘डॉल्बी’च्या विसर्जनातून दोन बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना

By admin | Updated: May 19, 2017 00:24 IST

‘डॉल्बी’च्या विसर्जनातून दोन बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा गतवर्षी गणेशोत्सवात पोलिसांनी केलेला संकल्प अखेर पूर्णत्वास गेला आहे. गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘डॉल्बी’साठी खर्च होणारे पैसे ‘जलयुक्त शिवारा’ला दिल्याने, जिल्ह्यात दोन सिमेंट बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दुष्काळ हटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पोलिस दलाने सामाजिक बांधिलकीतून विधायक व रचनात्मक काम करुन राज्यातील सर्व जिल्ह्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. मल्लेवाडी (ता. मिरज) व मणेराजुरी (ता. तासगाव) येथे २७ लाखांच्या गणेशोत्सव मंडळांच्या वर्गणीतून हे बंधारे साकारण्यात आले आहेत. मल्लेवाडीतील बंधाऱ्याचा शुक्रवारी, दि. १९ रोजी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा होत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मल्लेवाडीतील बंधाऱ्याचे ‘सुखकर्ता’, तर मणेराजुरीच्या बंधाऱ्याचे ‘विघ्नहर्ता’ असे नामकरण करण्यात आले आहे. गतवर्षीचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ करण्याचा निर्धार पोलिस यंत्रणेने केला होता. यासाठी मंडळांच्या गावोगावी २०७ बैठका घेतल्या. मी स्वत: तालुकास्तरावर दहा बैठका घेतल्या. डॉल्बीच्या दुष्परिणामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेस हातभार लावण्याचा निर्णय घेतला. मंडळांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८६३ मंडळांनी लोकवर्गणीतून जमा झालेले २७ लाख ८० हजार रुपये योजनेसाठी दिले. त्यातूनच दोन सिमेंट बंधारे बांधले आहेत. म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून मल्लेवाडीच्या बंधाऱ्यात कायम पाणी दिसेल.पोलिस प्रमुखांची धडपड यशस्वीजिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी उपक्रमासाठी केलेली धडपड अखेर यशस्वी झाली आहे. ‘नो डॉल्बी’मुळे पारंपरिक वाद्यांनाही सुगीचे दिवस आले. दणदणाटाशिवाय पहिल्यांदाच गणेशोत्सव पार पडला. अशाप्रकारे अनेक चांगले परिणाम या मोहिमेतून साकारले. त्यामुळे गतवर्षी गणेशोत्सवाने क्रांतीची बीजे पेरून नवा आदर्श निर्माण केला आहे. मंडळांना पुरस्कारशिंदे म्हणाले, ही संकल्पना प्रत्यक्षात पूर्णत्वास येण्यात मोलाटा वाटा असलेल्या मंडळांना ‘विघ्नहर्ता’ पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पोलिस ठाणे स्तरावर एक हजार, सातशे व पाचशे रुपये, तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे. जिल्हास्तरावरही मंडळांना पाच हजार, तीन हजार व दोन हजार अशी बक्षिसे मंडळांना दिली जाणार आहेत.