शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
3
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
5
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
6
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
7
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
8
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
9
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
10
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
11
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
13
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
14
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
15
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
16
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
17
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
18
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
19
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
20
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी

नगराध्यक्षप्रश्नी ‘शविआ’मध्ये अस्वस्थता

By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST

इचलकरंजी नगरपालिका : काँग्रेसची एकजूट; निर्णय नसल्याने शहर विकास आघाडी अधांतरीच

राजाराम पाटील - इचलकरंजी -नगरपालिकेतील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत शहर विकास आघाडी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना पाठिंबा देण्याचा फेरविचार करीत आहे. असे सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या विशेष बैठकीस तिघे वगळता २६ जणांनी उपस्थिती दाखविल्याने काँग्रेसजनांची एकजूट असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे ‘शविआ’ आता लटकत राहिल्याने पालिकेच्या राजकीय गोटात अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत निर्णयाप्रमाणे राजीनामा दिला नाही. त्यांच्या या बंडास ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सत्तेत राहून प्रभागातील विकासकामे व नागरी सेवा-सुविधा पुरविल्याने ‘शविआ’ची प्रतिमा चांगली होऊन या कामांच्या जोरावर निवडणुकांना सामोरे जाता येईल, असा हेतू ‘शविआ’ने ठेवला.इकडे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटानेही नगराध्यक्षांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. मात्र, पाच महिन्यांनंतर ‘शविआ’च्या बहुतांश नगरसेवकांची कामे होत नाहीत म्हणून नाराजी पसरली. पक्षप्रतोद अजित जाधव, अध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवक-नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ५ जूननंतर परगावाहून परतणारे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. आता आमदार सुरेश हाळवणकर अद्यापही परतले नसल्याने ‘शविआ’च्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीस नगराध्यक्षा बिरंजे, नगरसेवक संजय तेलनाडे व चंद्रकांत शेळके हे तिघे अनुपस्थितीत राहिले. उर्वरित २६ जणांनी बैठकीस उपस्थिती दाखविली.मात्र, या बैठकीस माजी मंत्री प्रकाश आवाडे आले नाहीत. त्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीस २९ पैकी २६ नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहिल्याने काँग्रेसची एकजूट दिसून आली. राष्ट्रवादीच्या भूमिकेची उत्सुकतानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक असून, त्यापैकी कारंडे गटाचे चार व जांभळे गटाचे सात नगरसेवक असे बलाबल आहे. दोन्ही गटांत कमालीचा वाद आहे. कोणत्याही प्रश्नावर समन्वयाची भूमिका नसल्याने नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती दिशा असणार, याचेच औत्सुक्य आहे.