शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षप्रश्नी ‘शविआ’मध्ये अस्वस्थता

By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST

इचलकरंजी नगरपालिका : काँग्रेसची एकजूट; निर्णय नसल्याने शहर विकास आघाडी अधांतरीच

राजाराम पाटील - इचलकरंजी -नगरपालिकेतील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत शहर विकास आघाडी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना पाठिंबा देण्याचा फेरविचार करीत आहे. असे सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या विशेष बैठकीस तिघे वगळता २६ जणांनी उपस्थिती दाखविल्याने काँग्रेसजनांची एकजूट असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे ‘शविआ’ आता लटकत राहिल्याने पालिकेच्या राजकीय गोटात अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत निर्णयाप्रमाणे राजीनामा दिला नाही. त्यांच्या या बंडास ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सत्तेत राहून प्रभागातील विकासकामे व नागरी सेवा-सुविधा पुरविल्याने ‘शविआ’ची प्रतिमा चांगली होऊन या कामांच्या जोरावर निवडणुकांना सामोरे जाता येईल, असा हेतू ‘शविआ’ने ठेवला.इकडे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटानेही नगराध्यक्षांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. मात्र, पाच महिन्यांनंतर ‘शविआ’च्या बहुतांश नगरसेवकांची कामे होत नाहीत म्हणून नाराजी पसरली. पक्षप्रतोद अजित जाधव, अध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवक-नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ५ जूननंतर परगावाहून परतणारे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. आता आमदार सुरेश हाळवणकर अद्यापही परतले नसल्याने ‘शविआ’च्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीस नगराध्यक्षा बिरंजे, नगरसेवक संजय तेलनाडे व चंद्रकांत शेळके हे तिघे अनुपस्थितीत राहिले. उर्वरित २६ जणांनी बैठकीस उपस्थिती दाखविली.मात्र, या बैठकीस माजी मंत्री प्रकाश आवाडे आले नाहीत. त्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीस २९ पैकी २६ नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहिल्याने काँग्रेसची एकजूट दिसून आली. राष्ट्रवादीच्या भूमिकेची उत्सुकतानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक असून, त्यापैकी कारंडे गटाचे चार व जांभळे गटाचे सात नगरसेवक असे बलाबल आहे. दोन्ही गटांत कमालीचा वाद आहे. कोणत्याही प्रश्नावर समन्वयाची भूमिका नसल्याने नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती दिशा असणार, याचेच औत्सुक्य आहे.