शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

नगराध्यक्षप्रश्नी ‘शविआ’मध्ये अस्वस्थता

By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST

इचलकरंजी नगरपालिका : काँग्रेसची एकजूट; निर्णय नसल्याने शहर विकास आघाडी अधांतरीच

राजाराम पाटील - इचलकरंजी -नगरपालिकेतील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत शहर विकास आघाडी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना पाठिंबा देण्याचा फेरविचार करीत आहे. असे सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या विशेष बैठकीस तिघे वगळता २६ जणांनी उपस्थिती दाखविल्याने काँग्रेसजनांची एकजूट असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे ‘शविआ’ आता लटकत राहिल्याने पालिकेच्या राजकीय गोटात अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत निर्णयाप्रमाणे राजीनामा दिला नाही. त्यांच्या या बंडास ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सत्तेत राहून प्रभागातील विकासकामे व नागरी सेवा-सुविधा पुरविल्याने ‘शविआ’ची प्रतिमा चांगली होऊन या कामांच्या जोरावर निवडणुकांना सामोरे जाता येईल, असा हेतू ‘शविआ’ने ठेवला.इकडे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटानेही नगराध्यक्षांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. मात्र, पाच महिन्यांनंतर ‘शविआ’च्या बहुतांश नगरसेवकांची कामे होत नाहीत म्हणून नाराजी पसरली. पक्षप्रतोद अजित जाधव, अध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवक-नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ५ जूननंतर परगावाहून परतणारे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. आता आमदार सुरेश हाळवणकर अद्यापही परतले नसल्याने ‘शविआ’च्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीस नगराध्यक्षा बिरंजे, नगरसेवक संजय तेलनाडे व चंद्रकांत शेळके हे तिघे अनुपस्थितीत राहिले. उर्वरित २६ जणांनी बैठकीस उपस्थिती दाखविली.मात्र, या बैठकीस माजी मंत्री प्रकाश आवाडे आले नाहीत. त्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीस २९ पैकी २६ नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहिल्याने काँग्रेसची एकजूट दिसून आली. राष्ट्रवादीच्या भूमिकेची उत्सुकतानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक असून, त्यापैकी कारंडे गटाचे चार व जांभळे गटाचे सात नगरसेवक असे बलाबल आहे. दोन्ही गटांत कमालीचा वाद आहे. कोणत्याही प्रश्नावर समन्वयाची भूमिका नसल्याने नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती दिशा असणार, याचेच औत्सुक्य आहे.