शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

नगराध्यक्षप्रश्नी ‘शविआ’मध्ये अस्वस्थता

By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST

इचलकरंजी नगरपालिका : काँग्रेसची एकजूट; निर्णय नसल्याने शहर विकास आघाडी अधांतरीच

राजाराम पाटील - इचलकरंजी -नगरपालिकेतील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत शहर विकास आघाडी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना पाठिंबा देण्याचा फेरविचार करीत आहे. असे सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या विशेष बैठकीस तिघे वगळता २६ जणांनी उपस्थिती दाखविल्याने काँग्रेसजनांची एकजूट असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे ‘शविआ’ आता लटकत राहिल्याने पालिकेच्या राजकीय गोटात अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत निर्णयाप्रमाणे राजीनामा दिला नाही. त्यांच्या या बंडास ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सत्तेत राहून प्रभागातील विकासकामे व नागरी सेवा-सुविधा पुरविल्याने ‘शविआ’ची प्रतिमा चांगली होऊन या कामांच्या जोरावर निवडणुकांना सामोरे जाता येईल, असा हेतू ‘शविआ’ने ठेवला.इकडे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटानेही नगराध्यक्षांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. मात्र, पाच महिन्यांनंतर ‘शविआ’च्या बहुतांश नगरसेवकांची कामे होत नाहीत म्हणून नाराजी पसरली. पक्षप्रतोद अजित जाधव, अध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवक-नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ५ जूननंतर परगावाहून परतणारे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. आता आमदार सुरेश हाळवणकर अद्यापही परतले नसल्याने ‘शविआ’च्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीस नगराध्यक्षा बिरंजे, नगरसेवक संजय तेलनाडे व चंद्रकांत शेळके हे तिघे अनुपस्थितीत राहिले. उर्वरित २६ जणांनी बैठकीस उपस्थिती दाखविली.मात्र, या बैठकीस माजी मंत्री प्रकाश आवाडे आले नाहीत. त्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीस २९ पैकी २६ नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहिल्याने काँग्रेसची एकजूट दिसून आली. राष्ट्रवादीच्या भूमिकेची उत्सुकतानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक असून, त्यापैकी कारंडे गटाचे चार व जांभळे गटाचे सात नगरसेवक असे बलाबल आहे. दोन्ही गटांत कमालीचा वाद आहे. कोणत्याही प्रश्नावर समन्वयाची भूमिका नसल्याने नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती दिशा असणार, याचेच औत्सुक्य आहे.