शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

‘दूधगंगा’ जमीन घोटाळ्याची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:19 IST

कोल्हापूर : काळम्मावाडी प्रकल्पातील (दूधगंगा प्रकल्प) संकलन रजिस्टर दुरुस्तीच्या नावाखाली कुटुंबसंख्या वाढवून शेकडो एकर जमीन हडप केल्याप्रकरणाची अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी चौकशी सुरू केली आहे. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून या चौकशीसाठी ‘खास पथक’ स्थापण्यास जिल्हाधिकाºयानी मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्दे खास पथकाची नियुक्ती : जिल्हाधिकाºयांची मंजुरी; शेकडो एकर जमीन हडप करणाºयांचे धाबे दणाणलेप्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने हे पथक स्थापन करण्यात आले व्याप्तीही मोठी असल्याने चौकशीस कालावधी लागणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काळम्मावाडी प्रकल्पातील (दूधगंगा प्रकल्प) संकलन रजिस्टर दुरुस्तीच्या नावाखाली कुटुंबसंख्या वाढवून शेकडो एकर जमीन हडप केल्याप्रकरणाची अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी चौकशी सुरू केली आहे. त्या प्रक्रियेचा भाग म्हणून या चौकशीसाठी ‘खास पथक’ स्थापण्यास जिल्हाधिकाºयानी मंजुरी दिली आहे.

प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने हे पथक स्थापन करण्यात आले आहे. ही चौकशी सुरू झाल्यामुळे या प्रकरणातील दलालांचे धाबे दणाणले आहे. ‘लोकमत’ने दि. १० ते १६ जुलै अशी सात दिवस या जमीन घोटाळ्याबद्दल वृत्तमालिका लिहिली होती. तिची दखल घेऊन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले होते.

या गैरव्यवहारात प्राथमिक अंदाजानुसार अशी किमान ६०० एकर जमीन प्रकल्पग्रस्तांना जादा व ज्यांचा धरणाशी संबंध नाही, अशाही लोकांना वाटप झाली असल्याची माहिती आहे. याबद्दल थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी झाल्या आहेत. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार (सध्या पुण्यात रोजगार हमी विभागाचे उपायुक्त) व जिल्हा पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी (भूसंपादन अधिकारी, पुणे) यांच्या काळात हा गैरव्यवहार झाला आहे. त्यामध्ये अधिकारी व प्रकल्पग्रस्तांच्या नावावर संघटना चालविणाºया काही दलालांचा समावेश आहे. ही चौकशी सुरू झाल्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहेत.

याप्रकरणी एसआयटी नेमून चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांकडे केली होती. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या गैरव्यवहारप्रश्नी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, या प्रकरणात उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.पुनर्वसन कर्मचाºयांना वगळलेहा व्यवहार जिल्हा पुनर्वसन कार्यालयाशी संबंधितच आहे, परंतु तरीही या चौकशीच्या कामापासून पुनर्वसन कार्यालयातील कर्मचाºयांना दूर ठेवले आहे. त्यातील काहींचा गैरव्यवहारास हातभार लागल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित केले होते, परंतु ‘झिरो पेंडन्सी’ व सात-बारा संगणीकरणामुळे मे महिन्यात होणाºया बदल्यांची प्रक्रिया थांबली आहे. इतरवेळी बदल्या करायच्या झाल्यास त्यासाठी महसूल आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे बहुधा या महिन्याच्या अखेरीस थांबलेल्या बदल्यांचा निर्णय झाल्यास या सर्व कर्मचाºयांची उचलबांगडी तेथून केली जाऊ शकेल.संकलन रजिस्टर अद्ययावतदूधगंगा प्रकल्पाचा नियत दिनांक २ नोव्हेंबर १९७८ आहे व त्यात सन २०१५ मध्ये दुरुस्ती करण्याचे कारणच नव्हते; परंतु हे ‘रजिस्टर दुरुस्ती’च्या नावाखाली पद्धतशीरपणे हा गैरव्यवहार झाला आहे. त्याची प्रकरणनिहाय छाननी करण्यात येणार आहे. बाधित खातेदार, त्यातील किती लोकांना अजून जमीन देय आहे, आतापर्यंत कोणत्या आदेशान्वये जमिनीचे वाटप झाले, त्याचे भूसंपादन विभागाचे निवाडे ही सगळी माहिती घेतली जाणार आहे. ती एकत्रित झाल्यानंतर त्यास प्रसिद्धी दिली जाईल. 

कुटुंबात ८ पेक्षा जास्त सदस्यसंख्या दाखवून जिथे व्यवहार झाले आहेत, त्यांच्याकडे पुरावे मागितले जाणार आहेत. त्याची पडताळणी होणार आहे. संशयास्पद व्यवहारात नोटिसा काढून पुरावे सादर करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. अगदी गावतलाठ्यापर्यंत या चौकशीचे धागेदोरे आहेत. त्याची व्याप्तीही मोठी असल्याने चौकशीस कालावधी लागणार आहे.चौकशी पथक असेअप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर हे तपास पथकाचे प्रमुख असतील. या पथकात जिल्हा पुनर्वसन अधिकारी अशोक पाटील, प्रभारी भूसंपादन अधिकारी क्रमांक ६ व १२, राधानगरी तहसीलदार, करमणूक विभागाचे तहसीलदार, दोन नायब तहसीलदार अणि चार अव्वल कारकून, लिपिक आणि संगणक आॅपरेटरांचा समावेश आहे.