शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ग्रामीण औद्योगिक बांधकामांची चौकशी सुरू

By admin | Updated: August 29, 2016 00:43 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : सर्व तहसीलदारांना तत्काळ अहवाल देण्याच्या सूचना

कोल्हापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत झालेल्या औद्योगिक बांधकामांची जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी चौकशी सुरू केली आहे. ही बांधकामे करताना रीतसर शासकीय परवानगी घेतली आहे का? याची शहानिशा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनाम्याद्वारे करावी व तसा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. महापालिका व नगरपालिका क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील बांधकामांचे परवानगी देण्याचे अधिकार संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदारांना होते; परंतु ९ जून २०१५च्या अधिसूचनेनुसार औद्योगिक विभाग, तसेच शेती तथा न विकास विभागातील औद्योगिक बांधकामाच्या ‘एफएसआय’ (वाढीव चटई निर्देशांक) ची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकामाचे परवाने प्रांताधिकारी, तहसीलदारांकडून घ्यायचे व वाढीव चटई निर्देशांकाच्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे यायचे. यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागायचे. हे लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामांच्या परवानगीचे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे असलेले अधिकार १२ जुलै २०१६ पासून स्वत:कडे घेतले आहेत. त्यानुसारच कार्यवाही सुरू आहे. याबाबत ग्रामीण भागातील औद्योगिक बांधकामांची किती प्रकरणे आपल्याकडे आली असून, त्यांतील किती प्रकरणांची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली आहे? अशी विचारणा जिल्हाधिकारी कार्यालयाने नगररचना कार्यालयाला केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्याकडे औद्योगिक बांधकामासंदर्भात एकही प्रकरण आले नसून कोणतीही शिफारस केली नसल्याचे कळविले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट ग्रामीण भागातील सर्वच औद्योगिक बांधकामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. २६ जुलैला हे आदेश सर्व तहसीलदारांना दिले असून, त्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. परंतु, पूरस्थिती, अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे ही कार्यवाही वेळेत होऊ शकलेली नाही. पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधितांना पुन्हा सूचना देऊन तत्काळ याबाबतचा अहवाल पंचनाम्यासह सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रादेशिक योजना ज्या भागात लागू करण्यात आली आहे, त्यामध्ये शिरोळ, हातकणंगले हे दोन्ही तालुके पूर्णपणे; तर पन्हाळा, करवीर व कागल तालुक्यांतील काही भाग समाविष्ट आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत सर्वांत जास्त औद्योगिक बांधकामांसाठी वापर होत आहे. त्यामुळे या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. येथील बांधकामे जर संबंधित शासकीय यंत्रणेच्या परवानगीशिवाय झाली असतील तर अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. मूळ बांधकामाच्या ‘एस्टिमेट’च्या दहापट दंड भरणे असे या कारवाईचे स्वरूप आहे.