शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

ग्रामीण औद्योगिक बांधकामांची चौकशी सुरू

By admin | Updated: August 29, 2016 00:43 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : सर्व तहसीलदारांना तत्काळ अहवाल देण्याच्या सूचना

कोल्हापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत झालेल्या औद्योगिक बांधकामांची जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी चौकशी सुरू केली आहे. ही बांधकामे करताना रीतसर शासकीय परवानगी घेतली आहे का? याची शहानिशा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनाम्याद्वारे करावी व तसा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. महापालिका व नगरपालिका क्षेत्र वगळून ग्रामीण भागातील बांधकामांचे परवानगी देण्याचे अधिकार संबंधित प्रांताधिकारी व तहसीलदारांना होते; परंतु ९ जून २०१५च्या अधिसूचनेनुसार औद्योगिक विभाग, तसेच शेती तथा न विकास विभागातील औद्योगिक बांधकामाच्या ‘एफएसआय’ (वाढीव चटई निर्देशांक) ची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल करण्यात आले आहेत. त्यामुळे बांधकामाचे परवाने प्रांताधिकारी, तहसीलदारांकडून घ्यायचे व वाढीव चटई निर्देशांकाच्या परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे यायचे. यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागायचे. हे लक्षात घेता, जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामांच्या परवानगीचे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे असलेले अधिकार १२ जुलै २०१६ पासून स्वत:कडे घेतले आहेत. त्यानुसारच कार्यवाही सुरू आहे. याबाबत ग्रामीण भागातील औद्योगिक बांधकामांची किती प्रकरणे आपल्याकडे आली असून, त्यांतील किती प्रकरणांची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे केली आहे? अशी विचारणा जिल्हाधिकारी कार्यालयाने नगररचना कार्यालयाला केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्याकडे औद्योगिक बांधकामासंदर्भात एकही प्रकरण आले नसून कोणतीही शिफारस केली नसल्याचे कळविले. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी थेट ग्रामीण भागातील सर्वच औद्योगिक बांधकामांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. २६ जुलैला हे आदेश सर्व तहसीलदारांना दिले असून, त्यांनी १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. परंतु, पूरस्थिती, अधिकाऱ्यांच्या बदल्या यामुळे ही कार्यवाही वेळेत होऊ शकलेली नाही. पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधितांना पुन्हा सूचना देऊन तत्काळ याबाबतचा अहवाल पंचनाम्यासह सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रादेशिक योजना ज्या भागात लागू करण्यात आली आहे, त्यामध्ये शिरोळ, हातकणंगले हे दोन्ही तालुके पूर्णपणे; तर पन्हाळा, करवीर व कागल तालुक्यांतील काही भाग समाविष्ट आहे. शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत सर्वांत जास्त औद्योगिक बांधकामांसाठी वापर होत आहे. त्यामुळे या तालुक्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. येथील बांधकामे जर संबंधित शासकीय यंत्रणेच्या परवानगीशिवाय झाली असतील तर अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. मूळ बांधकामाच्या ‘एस्टिमेट’च्या दहापट दंड भरणे असे या कारवाईचे स्वरूप आहे.