शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
4
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
5
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
6
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
7
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
8
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
9
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
10
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
11
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
12
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
13
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
14
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
15
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
16
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
17
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
18
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
19
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
20
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं

थेट पाईपलाईनच्या कामाची चौकशी करणार

By admin | Updated: October 27, 2015 00:53 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही : कमिशनसाठी परवानगी न घेता काम सुरू असल्याचा आरोप

कोल्हापूर : आवश्यक असलेल्या विविध खात्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या परवानग्या न घेता केवळ कमिशनसाठी थेट पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामाची चौकशी करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी एका खासगी दूरचित्रवाहिनीने आयोजित केलेल्या महापालिकेचा रणसंग्राम कार्यक्रमात दिली. राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कमिशनसाठी काम सुरू केल्याचा मुद्दा खोडून काढला. दादांनी अभ्यास करून बोलावे, असा सल्लाही दिला. येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, पालकमंत्री पाटील, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी एकाच व्यासपीठावर येऊन महापालिका निवडणुकीतील भूमिका मांडली. एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप रंगले. यावेळी अनेक प्रश्नांवर पालकमंत्री पाटील यांना अन्य नेत्यांनी घेरण्याचा व कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्री पाटील यांनी रोखठोक भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री पाटील म्हणाले, कोणतेही काम सुरुवात करण्यापूर्वी सर्व परवानगी घेणे आवश्यक आहे; पण काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेले थेट पाईपलाईनचे काम कोणतीही परवानगी न घेता सुरू आहे. पाईपलाईन जेथून येणार आहे, तेथील शेतकऱ्यांची संमती नाही. सार्वजनिक बांधकाम व वन विभागाची परवानगी नाही. त्यामुळे कमिशन काढून घेऊन ठेकेदाराला पहिला हप्ता देऊन काम सुरू केले आहे. उपनगरांत आरोग्याच्या सुविधा नाहीत. चांगला विकास झालेला नाही. त्यामुळे हद्दवाढीसाठी संबंधित गावांचा विरोध आहे. त्यामुळे विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, अशी शासनाची भूमिका आहे. आमदार मुश्रीफ म्हणाले, खासगी शेतीतून तीन फुटांखालून पाईपलाईन घेऊन जाण्यासाठी परवानगीची गरज नाही. दादांचा अभ्यास कमी आहे. हवे तर चंद्र्रकांतदादा यांच्या अध्यक्षतेखाली थेट पाईपलाईनच्या कामाची चौकशी होऊ दे. सतेज पाटील यांनी दादांना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे, त्यांनी अभ्यास करून बोलावे, असा सल्ला दिला.टोलच्या प्रश्नासंबंधी पालकमंत्री पाटील म्हणाले, केवळ तांत्रिक अडचणीमुळे तीन महिन्यांसाठी टोल स्थगित केला आहे. टोल बंद करण्यासाठी शासनाने आयआरबीला किती पैसे द्यायचे हे निश्चित झाल्यानंतर कायमचा टोल बंद केला जाईल. कायमस्वरूपी टोलचे भूत कोल्हापूरकरांच्या मानगुटीवरून दूर केले जाईल. मुश्रीफ म्हणाले, शंभर दिवसांत टोलमुक्त करू असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात एक वर्ष पूर्ण झाले तरी टोल कायमपणे हद्दपार करण्यात भाजपला यश आले नाही. त्यामुळे पुन्हा टोल सुरू होणार आहे. सतेज पाटील यांनी, शासनाच्या तिजोरीत खणखणाट आहे, त्यामुळे पुन्हा टोल सुरू होणार नाही या आश्वासनावर विश्वास नाही, असे सांगितले. क्षीरसागर यांनी १४०० कोटी विकासासाठी निधी आला असेल तर तो गेला कोठे, असा सवाल उपस्थित केला. शहरातील मूलभूत समस्या कायम आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी होती.निवडणुकीत गुंडगिरी; दहशतीचा वापरताराराणी आघाडीचे लोक काही प्रभागांत पैसे वाटताना मिळाले आहेत. याच कारणावरून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात हाणामारी झाली आहे. वाहने फोडली आहेत. कार्यालयावर हल्ला केला आहे. अशाप्रकारे भाजप-ताराराणी आघाडी गुंडगिरी, दहशत माजवून धुमाकूळ घालते आहे, असा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला. मुश्रीफ यांनीही ताराराणी-भाजपचेच लोक पैसे वाटून दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप केला. यावर हा आरोप खोटा असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.जोरदार विरोध...निवडणुकीत मारामारी, पैसे वाटणे असे प्रकार घडतच असतात, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगताच उपस्थितांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर मंत्री पाटील यांनी, वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये, पैसे वाटणे, गुंडगिरी करणे यामध्ये भाजपचा कोठेही संबंध नाही, केवळ दोन गटांत मारामारी झाली आहे, असे सांगितले.