शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

पार्श्वनाथ बँकेत जुन्या नोटा भरणाऱ्यांचीही चौकशी करा

By admin | Updated: November 18, 2016 23:58 IST

हसन मुश्रीफ : चंद्रकांतदादांना खुले आव्हान; नवीन चलन नसल्याने जिल्हा बँकांची मुस्कटदाबी; पंतप्रधानांच्या निर्णयाने अनेकांचा बळी

कागल : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुरगूडच्या प्रचारसभेत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्यांनी १००० आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटा भरल्या त्यांची नावे जाहीर करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे मी स्वागत करतो. ही नावे तर त्यांनी जाहीर करावीच. त्याचबरोबर आयकर विभाग, ईडीमार्फत या सर्वांची जाहीर चौकशीही करावी. मात्र, अशाच पद्धतीने पार्श्वनाथ बँकेत ज्यांनी जुन्या नोटा भरल्या त्यांचीही नावे जाहीर करून चौकशी करावी, असे आव्हान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना दिले आहे.कागल येथे भैया माने यांच्या अंबिका सदरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा बँकेत जर अशा कोणाच्या नोटा आल्या असतील तर ती नावे ते जाहीर करू शकतात. कारण आज शासन त्यांचेच आहे. त्यांच्यासोबत पार्श्वनाथ बँकेतही कोणी कोणी या जुन्या नोटांचा भरणा केला आहे तीही नावे जनतेला समजायला हवीत. सत्य उघडकीस येण्यासाठी पालकमंत्र्यांनी ही नावे जाहीर करावीच; पण या लोकांची आयकर विभागामार्फत, ईडीमार्फत चौकशी करावी, आपले बोलणे फक्त जाहीर सभेत प्रचारापुरते होते असे लोकांना वाटू नये यासाठी आता चंद्रकांतदादांनी तातडीने हे काम करावे. कोल्हापूर जिल्हा बँक ही ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे. १९२ शाखा आहेत. नवीन चलन उपलब्ध करून दिले नसल्याने सर्व जिल्हा बँकांची मुस्कटदाबी सुरू आहे. जिल्हा बँकेशी संलग्न असणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. ग्रामीण भागातील लोक याबद्दल रस्त्यावर येतील, अशी परिस्थिती बनली आहे. मागणी एवढी रक्कम मिळत नसल्याने जिल्हा बँकेवर फार मोठा पेचप्रसंग उभा राहिला आहे. संपूर्ण ग्राहक, जनता त्रस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या निर्णयाने अनेकांचा बळी घेतला आहे आणि भाजपचे लोक त्याचे राजकारणच करण्यात मग्न आहेत. येत्या नगरपालिका निवडणुकीत याचे परिणाम भाजपला पहावयास मिळतील. मतदार भाजपचाच सर्जिकल स्ट्राईक करतील. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही या निर्णयाबद्दल रस्त्यावर उतरू, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)पार्श्वनाथ बँकच का?पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हा बँकेचे नाव घेतले. मग तुम्ही पार्श्वनाथ बँकेचेच नाव का घेत आहात? या प्रश्नावर आ. मुश्रीफ म्हणाले की, हा प्रश्न चंद्रकांतदादांनाच विचारा, तेच याचे उत्तर देतील.