शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भरतीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये मागील तीन-चार वर्षांत भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश नेत्यांनी सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये मागील तीन-चार वर्षांत भरती केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश नेत्यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. कोणताही निर्णय घेताना मनमानी घेतल्यास याद राखा, अशा शब्दांत अधिकाऱ्यांची दोन तास झाडाझडती घेतली. ‘वारणा’, ‘राजारामबापू’ दूध संघांपेक्षा प्रतिलिटर २० पैसे जादा टँकरचे वाहतूक भाडे होते. ते तातडीने कमी करण्याचे आदेशही देण्यात आले.

‘गोकुळ’मध्ये सत्तांतर होऊन एक महिना तीन दिवस झाल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी ‘अमृतकलश’ पूजन निमित्ताने दूध प्रकल्प कार्यालयात आढावा बैठक घेतली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठकीपूर्वी अधिकाऱ्यांना प्रश्नावली दिली होती, त्या माहितीनुसार संघाच्या अधिकाऱ्यांनी नेत्यांसमोर सादरीकरण केले.

सध्याचे दूध संकलन, अस्थापनासह इतर बाबींवर होणारा खर्च, संघामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, दूध वितरण व्यवस्था, वाहतूक व्यवस्था व त्यावरील खर्च संघाची सध्याची आर्थिक स्थिती, आदी बाबींची माहिती कार्यकारी संचालक व इतर अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.

तब्बल दोन तास झालेल्या बैठकीत मंत्री मुश्रीफ व पालकमंत्री पाटील यांनी संघातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवले. संचालक चुकीचे कारभार करीत असताना त्यांना रोखण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती, मग तुम्हीही चुकीचा कारभार का केला? पूर्वीच्या सवय चालणार नाही, मनमानी निर्णय खपवून घेणार नाही. संचालकांना विश्वासात घेऊन कामकाज करण्याची सूचना दोन्ही नेत्यांनी केल्या.

कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणार्थी कालावधी हा एक वर्षाचा असताना दोन महिन्यांत कर्मचाऱ्यांना कायम कसे केले? सहकारात ‘गोकुळ’ला कायदा वेगळा आहे का? नेते व संचालकांनी सांगितले म्हणून अधिकाऱ्यांनी कायदे मोडायचे का? असे संतप्त सवालही दोन्ही नेत्यांनी केले. असे प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असा सज्जड दमही दिला.

बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, राजू आवळे, चंद्रदीप नरके, के. पी. पाटील, संध्यादेवी कुपेकर, ए. वाय. पाटील, सुजित मिणचेकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक उपस्थित होते.

अतिरिक्त कर्मचारी डोकेदुखी

मागील संचालक मंडळाने गरज नसताना मोठी नोकरभरती केल्याने कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. सध्या २२५० कर्मचारी कार्यरत असून, त्याशिवाय ४००-५०० कर्मचारी ठोक मानधनावर घेतले जातात, असे बैठकीत सांगण्यात आले. अपवादात्मक हमाल व तांत्रिक कर्मचारी वगळता ठोक मानधनावर कामगार घेऊन नका, अशा स्पष्ट सूचना नेत्यांनी दिल्या आहेत.