शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘आतला आवाज ’

By admin | Updated: January 9, 2017 00:53 IST

‘आतला आवाज ’

डिसेंबरचा महिना सुरू झाला की, प्रत्येकाच्या मनाला नवीन वर्षाचे वेध लागतात. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तसेच नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू होते. पण, खरंच काय दिलं या २0१६ वर्षानं आपल्याला? महागाई, बलात्कार, जातीय दंगली, शेतकरी आत्महत्या हे सामाजिक प्रश्न कालही होते, आजही आहेत, आणि उद्याही कदाचित ते तसेच असतील. ‘असं का? ही परिस्थिती कधीच बदलणार नाही?’ मी स्वत:लाच विचारलं. आणि मी विचारात असतानाच कुणीतरी माझ्या कानात कुजबुजलं ‘एक्सक्यूज’मी.’ मी वळून बघितलं तर माझ्या आजूबाजूला कुणीच नव्हतं. घरात मी एकटीच होते. कोण बोललं मग? मी लक्षपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो आवाज माझाच आतून येत असल्याचा भास आला. अगदी खोल मनाच्या अंतरंगातून... तो मला म्हणाला, ‘आताच तू म्हणालीस की, या सरत्या वर्षानं मला काय दिलं? पण, मी तुला विचारतो की, तू तरी काय दिलंस बरं या वर्षाला?’ मी थोडी गोंधळलेच. खरंतर निरुत्तरच झाले. पण, ‘आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय,’ मी म्हणाले. ‘ठीक आहे. ऐक मग. महागाई, बलात्कार, जातीय दंगली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यासारखी कोणतीही समस्या असो, ती सोडविण्याची जबाबदारी जितकी सरकारची आहे, तितकीच तुझ्यासारख्या सामान्य नागरिकाचीही आहे.’ म्हणजे? माझा काय संबंध या सगळ्याशी? मी म्हणाले. ‘अगं, असं कसं म्हणतेस, हा विचारच या समस्या निवारण करण्याच्या मार्गातला मोठा अडथळा आहे. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर स्वच्छता अभियानाचंच घे. आज अनेक शहरांत अनेक गट तसेच मंडळं यासाठी कार्यरत आहेत. पण, तरीही अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य आहे तसंच आहे. स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असलेले आणि याविषयी संपूर्ण उदासीन असलेले याचं प्रमाण आजही खूपच व्यस्त आहे.’ ते ऐकल्यावर मलाही आठवलं, माझ्या घरातल्या कचऱ्याचं खत करण्याचा प्रकल्प मी सुरू केला. पण, बाहेरगेल्यावर नकळतपणे मीही या कचऱ्यात भर घालत होते. पुण्यालाजाताना वाटेत घेतलेल्या बटाटेवड्याचा कागद गाडीची काच खाली करून मी रस्त्याच्या कडेला टाकला होता. तिथं रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कचऱ्यात मी एक कागद टाकला तर बिघडलं कुठं? ‘अगं हाच विचार प्रत्येकजण करतं आणि ही समस्या सुटतच नाही. इतर समस्यांचंही तसंच आहे. पर्यावरण रक्षणासाठी झाडं लावणं जितकं जरुरीचं आहे तितकंच जुन्या झाडांचं रक्षण करणं,’ तो आवाज म्हणाला. परवाच आमच्या गल्लीतली जुनी झाडं कापल्यावर भकास झालेलं वातावरण मला आठवलं. कुणीतरी पुढं होऊन त्यांना जाब विचारावा असं वाटलं होतं. ‘पण मग तूच का पुढं झाली नाहीस?’ त्या आवाजानं मला विचारलं. ‘अगं, बलात्काराची घटना असो किंवा शेतकऱ्यांची आत्महत्या. ज्यांच्यावर हा प्रसंग ओढवतो त्यांच्या मनाचा विचार कितीजण करतात? त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात किंवा त्यांना आर्थिक मदत करतात?’ तो आवाज मला जाब विचारत होता. आता मलाही जाणवलं ‘खरंच, या घटना आपण थांबवू शकत नाही. पण, त्या प्रसंगात त्या व्यक्तीला, कुटुंबाला मानसिक तसेच आर्थिक आधार नक्कीच देऊ शकतो. त्या विचारानंही मला खूप बरं वाटलं. त्याचवेळी ही जाणीव याआधी कधीच कशी झाली नाही?’ असा प्रश्न पडला.‘खरं आहे तुझं. पण, याआधी असा निवांत वेळ, अशी शांतता तरी गेल्या कित्येक दिवसांत तू अनुभवली होतीस का? इतरांशी राहू दे. पण, स्वत:शी तरी संवाद साधला होतास का तू? आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याजवळच असतात. पण, त्यासाठी एखाद्या दिवशी थोडा वेळ स्वत:ला द्यायला हवा. स्वत:शी थोडा संवाद, आत्मपरीक्षण करायला हवं. मनावरची जळमटं व साठलेली माती दूर करून आपलाच खोल हरवलेला आवाज ऐकायला हवा... माणुसकीचा झरा आटण्यापूर्वी शोधायला हवा... स्वच्छता अभियान आधी मनामनात जागवायला हवं... मग येणाऱ्या वर्षात अनेक गोष्टी नव्या असतील...काही नव्यानं गवसतील... नक्की. अगदी नक्की.’ तो आवाज मला आश्वत करीत होता आणि मी माझ्या विचारात हरवले होते.- उज्ज्वला करमळकर