शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरभरतीत ‘ओपन’वर अन्याय

By admin | Updated: January 19, 2017 00:51 IST

महानगरपालिका : ‘सकल मराठा’ची चौकशीची मागणी; शिष्टमंडळाकडून आयुक्तांची भेट

कोल्हापूर : महापालिकेने २६ नोव्हेंबर २०१६ मध्ये घेतलेल्या वर्ग १, वर्ग २ मधील सरळसेवा भरतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुनर्घोषणेचा उल्लेख न करता परीक्षा घेतली. त्यामुळे सर्वसाधारण गटातील उमेदवारांवर अन्याय झाला आहे. या व २५ सप्टेंबर २०१४ पासून महापालिकेत झालेल्या नोकरभरतीची चौकशी करण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. महापालिकेने आस्थापनेवरील गट अ व गट ब मधील निर्देशित केलेल्या संवर्गांतील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यात सर्वसाधारण गटातील उमेदवार, परीक्षार्थी यांच्याबाबत, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचे कायदे व नियमावली यांचा प्रशासनाकडून चुकीचा अर्थ लावला. परिणामी या गटातील उमेदवारांवर अन्याय झाला. महापालिकेने महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियमांची पायमल्ली केली. यापूर्वीही अर्थात २५ सप्टेंबर २०१४ पासून महापालिकेत केलेल्या नोकरभरतीची या पुनर्घोषणेच्या अनुषंगाने चौकशी व्हावी. यासह काही कारणांनी ही भरती प्रलंबित ठेवली. त्यावर पुनर्घोषणेच्या अनुषंगाने विचार व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सकल मराठा समाज, क्षेत्रीय मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, क्षेत्रीय मराठा मेडिको चेंबर्स आॅफ कॉमर्स, क्षेत्रीय मराठा इंजिनिअर्स चेंबर आॅफ कॉमर्स, मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, शिवाजी पेठ तालीम मंडळे, प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्था, कॉमन मॅन संघटना, स्वाभिमान संघटना, बजरंग दल, हिंदू महासभा, हिंदू युवा या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अशी आहे पुनर्घोषणा... आयोगाच्या दिनांक १ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या निकाल प्रक्रियेच्या कार्यपध्दतीनुसार लोकसेवा आयोगाच्या यापुढे घेणाऱ्या परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर मागासवर्गीयांना देय असलेली वय, परीक्षा शुल्क तसेच इतर पात्रता विषयक अटी, निकषासंदर्भात सवलत उमेदवाराने घेतली असल्यास अशा उमेदवारांची अमागास वर्गवारीच्या पदावर शिफारस करण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. ही सूचना यापूर्वी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत नमुद असेल त्या प्रकरणी व यापुढे प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातीसंदर्भात लागू असेल असे स्पष्टीकरण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी २५ सप्टेंबर २०१४ ला प्रसिध्दीस दिले आहे.विद्यापीठातही तक्रार करणार..पुनर्घोषणेच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील भरतीबाबत माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेऊन प्रथम विद्यापीठाच्या प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने काहीच कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था आहे. तर राज्य शासनाचे नियम वेगळे असतात. राज्याने जर आयोगासारखी पुनर्घोषणेच्या अनुषंगाने कोल्हापूर महापालिकेत नोकरभरती करावी, असे अध्यादेश काढले तर त्यानुसार कार्यवाही करू. याबाबत राज्य शासनाच्या सहसचिवांकडून मार्गदर्शन घेतले आहे. त्यामुळे सध्याची भरती प्रक्रिया योग्य आहे. - पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका२१ जागा व ४६८३ उमेदवारमहानगरपालिके त रिक्त असलेल्या पर्यावरण संवर्धन अधिकारी, सहायक अभियंता (यांत्रिकी), कायदा व विधि सेवा अधिकारी, सिस्टिम मॅनेजर (ई-प्रशासन), कीटकनाशक अधिकारी, कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या संवर्गातील २१ जागांसाठी परीक्षा घेतली आहे. एकूण ४६८३ उमेदवारांनी कोल्हापूरसह राज्यातील रत्नागिरी, सांगली, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, जळगाव, नागपूर, मुंबई अशा ११ शहरांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दिली, परंतु या परीक्षेचा निकाल राखीव ठेवला आहे.