शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

अंबाबाई मूर्ती संवर्धनासाठी श्रीपूजकांचाच पुढाकार

By admin | Updated: June 3, 2017 15:00 IST

बदनामीचे षडयंत्र , श्रीपूजकांनी मांडली भूमिका

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0३ : अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी सर्वप्रथम श्रीपूजकांनी पुढाकार घेतला आहे. अभिषेक बंद पासून आर्द्रता नियंत्रणात आणण्यापर्यंतच्या उपाययोजना केल्या आहेत. असे असताना केवळ द्वेषातून श्रीपूजक अंबाबाई मूर्तीची काळजी घेत नाहीत, पावित्र्य राखत नाही असे आरोप केले जात आहे. श्रीपूजकांची नाहक बदनामी करणाऱ्या घटकांवर योग्य ती कारवाई करु असा इशारा श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळाच्यावतीने शनिवारी झालेल्या पत्रकार बैठकीत देण्यात आला. अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग आणि झीज या विषयावर गेल्या आठ दिवसांपासून वादंग निर्माण झाले होते. अखेर शुक्रवारी पुरातत्वचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांनी मूर्ती अंतर्गतरित्या सुस्थितीत असून पांढगे डाग घालवून झीज रोखण्यासाठी पून्हा एकदा संवर्धन प्रक्रिया करावी लागेल असा निर्वाळा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हक्कदार श्रीपूजक मंडळाचे सचिव माधव मुनिश्वर, अ‍ॅड. केदार मुनिश्वर, नगरसेवक अजित ठाणेकर, शिरीष मुनिश्वर यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर केली. ते म्हणाले, श्रीपूजक, देवस्थान समिती आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अंबाबाई मूर्तीवर २०१५ मध्ये रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली. गेल्या दोन वर्षात त्यावर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. गेल्या काही दिवसात श्रीपूजक मूर्तीची काळजी घेत नाहीत, आर्द्रतेचे नियम अमलात आणत नाही असे आरोप करण्यात आले. मात्र मिश्रा यांच्यामुळेच त्यावर उत्तर मिळाले आहे. मूर्तीची झीज थांबवण्यासाठी श्रीपूजकांनीच १९७० साली व पुढे १९९७ साली अभिषेक पूर्णत: बंद केले. आर्द्रता नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यातील अनेक बाबी देवस्थान समितीच्या अखत्यारित आहे. त्या सगळ््यांची तातडीने पुर्तता करणे, फरशा काढणे, भिंतींवरील रंग काढणे यासाठी काही कालावधी लागणार आहे. सिंगना परवानगी साठेंकडूनच..निवृत्त झालेल्या मनेजन सिंगना श्रीपूजकांनी मूर्तीला हात कसे लावू दिले? या प्रश्नावर केदार मुनिश्वर म्हणाले, सिंग खाजगी दौऱ्यासाठी जात असताना कोल्हापूरात आले. यावेळी त्यांनी मी सोबत संवर्धनाचे साहित्य आणले आहे मूर्तीवर थर देवू का असे विचारले असता माधव मुनिश्वरनी त्यांना नकार दिला व देवस्थानकडे परवानगी घ्या असे सांगितले. त्यानंतर सिंगनी दोन तास देवस्थानच्या कार्यालयात तत्कालिन सचिव शुभांगी साठे यांच्याशी चर्चा केली आणि साठेंनीच त्यांना परवानगी दिल्यानंतर आम्ही हे काम करु दिले. तेंव्हा आम्हाला ते निवृत्त झाले होते हे माहित नव्हते. मात्र त्यांनी ही बाब सदस्यांना व प्रशासनाला का सांगितली नाही हे आम्हाला माहित नाही. खाडेंच्या हकालपट्टीची मागणी करणार यावेळी अजित ठाणेकर म्हणाले, दान पेटी वगळता देवस्थान आणि श्रीपूजकांमध्ये कोणतेही वाद नाहीत. देवस्थान समितीवर दोनवेळा सदस्य म्हणून गेलेल्या संगीता खाडे यांच्या चूकीच्या वागण्यामुळेच पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी त्यांना बाजूला ठेवले होते. आता त्यांनी हीन शब्दात श्रीपूजकांबद्दल बेजबाबदार वक्तव्ये करून समाजात क्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांची देवस्थान सदस्य पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. नागचिन्हाबाबत सकारात्मकचनागचिन्ह घडवू नये साठी पूजाऱ्यांनी आमच्यावर दबाव टाकला होता असा आरोप सिंग यांनी केला होता, त्यावर ते म्हणाले, आम्ही व मूर्तीअभ्यासकांनीही सगळे संदर्भ, छायाचित्रे दिली होती. मॉडेल म्हणून एका कलाकाराने घडवलेली मूर्तीही ते पाहून आले. तरी त्यांनी नागचिन्ह का घडवला नाही हे आम्हाला माहित नाही. त्यानंतर आम्ही नागचिन्हाबाबत समिती घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र प्रशासनाने त्यावर कमिटीच नेमली नाही.