शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उद्योगाला ‘डिजिटल’ची जोड आवश्यक: मनोज कोटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 23:43 IST

कोल्हापूर : विविध क्षेत्रांत डिजिटल तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. त्यामुळे बदलत्या काळात उद्योग-व्यवसाय टिकवून ठेवण्यासह तो वाढवायचा असल्यास त्याला ‘डिजिटल मार्केटिंग’ची जोड देणे आवश्यक आहे. उद्योजक, व्यावसायिकांनी आॅफलाईन आणि आॅनलाईनमध्ये समतोल साधून कार्यरत राहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मनोज कोटक यांनी रविवारी येथे केले.येथील आयटी ...

कोल्हापूर : विविध क्षेत्रांत डिजिटल तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. त्यामुळे बदलत्या काळात उद्योग-व्यवसाय टिकवून ठेवण्यासह तो वाढवायचा असल्यास त्याला ‘डिजिटल मार्केटिंग’ची जोड देणे आवश्यक आहे. उद्योजक, व्यावसायिकांनी आॅफलाईन आणि आॅनलाईनमध्ये समतोल साधून कार्यरत राहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मनोज कोटक यांनी रविवारी येथे केले.येथील आयटी असोसिएशन आॅफ कोल्हापूरतर्फे आयोजित लाईव्ह आयटी फोरममध्ये ‘डिजिटल मार्केटिंग २.०’ या विषयावर कोटक यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर इंजिनिअरिंग असो.च्या माधवराव बुधले सभागृहातील या कार्यक्रमास ‘आयटी असोसिएशन’चे अध्यक्ष ओंकार देशपांडे, उपाध्यक्ष विश्वजित देसाई प्रमुख उपस्थित होते. कोटक म्हणाले, डेस्कटॉप ते स्मार्टफोन आणि ई-मेल ते व्हॉट्स अ‍ॅपपर्यंत तंत्रज्ञान येऊन पोहोचले आहे. तंत्रज्ञानातील बदलामुळे उद्योग-व्यवसायाचे स्वरूपही बदलत असून, नव्या संधीही मिळत आहेत. या संधी साधण्यासह प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी उद्योग-व्यवसायाला डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंगची जोड आवश्यक आहे. कार्यक्रमास ‘आयटी असोसिएशन’चे सचिव प्रसन्न कुलकर्णी, खजानीस स्नेहल बियाणी, कौस्तुभ नाबर, मनीष राजगोळकर, संजीव शिवापूरकर, गिरीश आरेकर, आदी उपस्थित होते. अद्वैत दीक्षित यांनी स्वागत केले. विक्रांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रणजित नार्वेकर यांनी आभार मानले.भीती नव्हे, गरजभीती घालत नाही; पण तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांतील बदल पाहता डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंग अंगीकारणे गरजेचे असल्याचे कोटक यांनी सांगितले. ते म्हणाले, केवळ हे तंत्रज्ञान, मार्केटिंग अंगीकारून चालणार नाही, तर त्यामध्ये अद्ययावत राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या विषयाबाबत दोन हजार किलोमीटरचा प्रवास करून मी आतापर्यंत मुंबई, पुणे, बडोदा, सांगली, कोल्हापूरमध्ये मार्गदर्शन केले आहे.उद्योजक, व्यावसायिकांनी हे करावेसर्वांत पहिल्यांदा आपल्या उद्योग-व्यवसायाचे संकेतस्थळ तयार करावे.संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप, सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांच्या संपर्कात राहावे.गुगल, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, आदींमधील बदल वेळोवेळी जाणून घेऊन अद्ययावत राहावे.डिजिटल तंत्रज्ञान, मार्केटिंग लक्षात घेऊन आपलेउद्योग-व्यवसायाचे धोरण ठरवावे.हे धोरण ठरविताना दुसऱ्यांनी दिलेल्या माहितीवर विसंबून राहू नये.