शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मोदी सरकारकडून कामगार कायदे बदलण्याचा उद्योग

By admin | Updated: December 28, 2015 00:32 IST

शंकरराव भोसले : तोडगा न निघाल्यास संप

इस्लामपूर : एका बाजूला शासन व साखर संघ साखर कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मोदींचे केंद्र शासन कामगार कायदेच बदलू पाहत आहे. अशा स्थितीत संघटनेच्या माध्यमातून साखर कामगारांना संघटितपणे पुढे जावे लागेल, अशी भावना महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी शंकरराव भोसले यांनी व्यक्त केली. सोमवारी मुंबईत होणाऱ्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, यावर दि़ २ जानेवारी १६ पासूनच्या बेमुदत संपाचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (इंटक) च्या वार्षिक सभेत ते बोलत होते़ तालुकाध्यक्ष तानाजी खराडे अध्यक्षस्थानी होते़ यावेळी एन. जी. पाटील, लालासाहेब वाटेगावकर, अशोक पाटील, शिवाजी माने, आनंदा क्षीरसागर, सूर्यकांत पाटील या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.भोसले म्हणाले, आज काटकसर व अडचणींच्या नावाखाली प्रथम कामगारांवर सुरी फिरविली जाते़ त्रिपक्षीय समितीची मुदत संपल्यानंतर आम्ही हेलपाटे घातले. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी, कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, अशी भूमिका मांडली. आमदार जयंत पाटील यांनी सहकार्य केले. मात्र श्रेयवादामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात समिती झाली नाही़ भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर संघटना व पवार यांच्या प्रयत्नांनी त्रिपक्षीय समिती झाली़ सध्या चार बैठका होऊनही निर्णय झालेला नाही़ अध्यक्ष तानाजी खराडे यांनी स्वागत केले. यावेळी खजिनदार सर्जेराव निंबाळकर, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सरचिटणीस शामराव पवार, जनरल सेक्रेटरी मोहनराव शिंदे, उपाध्यक्ष विकास पवार, सरचिटणीस संजय शेळके, हौसेराव पाटील, सुनील जाधव, विश्वनाथ पाटसुते, मनोहर सन्मुख, बाबासाहेब डांगे, दादासाहेब देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)तरीही सभेला हजेरी...कामगार नेते शंकरराव भोसले यांच्यावर नुकतीच बेळगाव येथे हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टर, कामगार व कुटुंबियांचा विश्रांतीचा सल्ला व आग्रह असतानाही ते सभेला आले. त्यांनी आपल्या ५0 मिनिटांच्या भाषणात ‘साखर उद्योग व साखर कामगारांचे भवितव्य’ याबाबत उहापोह केला.