शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून कामगार कायदे बदलण्याचा उद्योग

By admin | Updated: December 28, 2015 00:32 IST

शंकरराव भोसले : तोडगा न निघाल्यास संप

इस्लामपूर : एका बाजूला शासन व साखर संघ साखर कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला मोदींचे केंद्र शासन कामगार कायदेच बदलू पाहत आहे. अशा स्थितीत संघटनेच्या माध्यमातून साखर कामगारांना संघटितपणे पुढे जावे लागेल, अशी भावना महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे जनरल सेक्रेटरी शंकरराव भोसले यांनी व्यक्त केली. सोमवारी मुंबईत होणाऱ्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, यावर दि़ २ जानेवारी १६ पासूनच्या बेमुदत संपाचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (इंटक) च्या वार्षिक सभेत ते बोलत होते़ तालुकाध्यक्ष तानाजी खराडे अध्यक्षस्थानी होते़ यावेळी एन. जी. पाटील, लालासाहेब वाटेगावकर, अशोक पाटील, शिवाजी माने, आनंदा क्षीरसागर, सूर्यकांत पाटील या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला.भोसले म्हणाले, आज काटकसर व अडचणींच्या नावाखाली प्रथम कामगारांवर सुरी फिरविली जाते़ त्रिपक्षीय समितीची मुदत संपल्यानंतर आम्ही हेलपाटे घातले. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी, कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, अशी भूमिका मांडली. आमदार जयंत पाटील यांनी सहकार्य केले. मात्र श्रेयवादामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात समिती झाली नाही़ भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर संघटना व पवार यांच्या प्रयत्नांनी त्रिपक्षीय समिती झाली़ सध्या चार बैठका होऊनही निर्णय झालेला नाही़ अध्यक्ष तानाजी खराडे यांनी स्वागत केले. यावेळी खजिनदार सर्जेराव निंबाळकर, उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सरचिटणीस शामराव पवार, जनरल सेक्रेटरी मोहनराव शिंदे, उपाध्यक्ष विकास पवार, सरचिटणीस संजय शेळके, हौसेराव पाटील, सुनील जाधव, विश्वनाथ पाटसुते, मनोहर सन्मुख, बाबासाहेब डांगे, दादासाहेब देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)तरीही सभेला हजेरी...कामगार नेते शंकरराव भोसले यांच्यावर नुकतीच बेळगाव येथे हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. डॉक्टर, कामगार व कुटुंबियांचा विश्रांतीचा सल्ला व आग्रह असतानाही ते सभेला आले. त्यांनी आपल्या ५0 मिनिटांच्या भाषणात ‘साखर उद्योग व साखर कामगारांचे भवितव्य’ याबाबत उहापोह केला.