शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

वैफल्यातून भारतने केले स्वत:चेच कुटुंब उद्ध्वस्त

By admin | Updated: September 11, 2016 00:27 IST

चौघींच्या खुनाने जत तालुका हादरला : संसाराची असफल कहाणी--आॅन दि स्पॉट रिपोर्ट

जयवंत आदाटे/संजयकुमार गुरव -- जत/डफळापूरवारकरी संप्रदायातील माळकरी भारत इरकर याने शनिवारी कुडणूर येथे आई, पत्नीसह दोन मुलींची हत्या केल्याने जत तालुका हादरला. जमिनीच्या खटल्यातून आलेला आर्थिक तणाव, त्यातून आलेले वैफल्य की आणखी काही हे तपासावे लागणार आहे.कुडणूर गाव जतपासून सुमारे पंचवीस व डफळापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. गावची लोकसंख्या दोन हजार आहे. गावातील नागरिकांचा डफळापूरशी सतत संपर्क असतो. हे गाव महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत आहे. शेती, शेतमजूर व ऊसतोडणी कामगार म्हणून येथील नागरिक काम करतात. कुडणूर, शिंगणापूर, डफळापूर या तीन गावांदरम्यान हाक्के वस्ती आहे. येथील नागरिकांचा कुडनूर गावात समावेश असला तरी, दैनंदिन व्यवहार तीनही गावात चालतात. हाक्के वस्ती मुख्य रस्त्यापासून आडवळणी आहे. तेथे भारत कुंडलिक इरकर हा आई सुशीला कुंडलिक इरकर, पत्नी सिंधूताई भारत इरकर, मुलगी रूपाली, राणी, मुलगा म्हाळाप्पा व आकाश असे सातजण राहात होते.भारतचे वडील कुंडलिक इरकर यांची येथे सुमारे ९० एकर जमीन होती. एकेकाळी ते परिसरातील मोठे जमीनदार होते. त्यांनी सहा लग्ने केली होती. त्यापैकी चार पत्नींचा मृत्यू झाला असून, त्यांना अपत्य नव्हते. जनाबाई (वय ७०) ही सावत्र आई व सुशीला (६५) ही सख्खी आई या दोघीजणी हयात आहेत. जनाबाई सांगली येथे विभक्त राहतात. शेतजमिनीच्या वादातून जनाबाई व भारत यांच्यात मागील तीस वर्षांपासून न्यायालयात वाद सुरू आहे. त्यापैकी प्रत्येकवेळी थोडी-थोडी जमीन विकून भारत याने न्यायालयीन कामासाठी पैसे खर्च केले आहेत. जनाबाई यांना न्यायालयातून जमीन मिळाली आहे. सध्या भारत याच्या नावे आठ एकर व त्याच्या मुलाच्या नावे आठ एकर शेतजमीन आहे. अत्यल्प प्रमाणात पाऊस असल्याने शेतजमिनीतून कमी प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. जमीन विकून न्यायालयीन कामासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले तरीही निकाल आपल्याविरोधात गेला. न्यायालयात काढण्यात आलेले वॉरंट त्यामुळे घरदार, शेतजमीन व कुुटुंब असूनही फरारी होऊन भारत इरकर फिरत होता. अधून-मधून आणि रात्री-अपरात्री त्याचा घरी गुपचूप वावर असायचा. तो आर्थिक तणावाखाली होता. यातून त्याने आई, पत्नी आणि दोन मुलींचा एकाचवेळी खून केला. या प्रकारामुळे संपूर्ण जत तालुका हादरला आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी डफळापूर येथे काँग्रेसचे नेते सुनील चव्हाण व त्यांची पत्नी शैलजा चव्हाण यांचा खून झाला होता. त्यानंतर शनिवारी याच परिसरात चारजणांचे हत्याकांड घडले. भारत इरकर याचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्याची दोन मुले आता पाठीमागे राहिली आहेत. ‘मी स्वत: कोयत्याने वार करून चौघींची हत्या केली आहे’, असा जबाब भारत याने पोलिसांना दिला असला तरी, या हत्याकांडामागील नेमके कारण काय आहे, याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.