शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जॅकवेलची ‘तृष्णा’ भागविण्यासाठी स्वतंत्र पाणी योजना

By admin | Updated: January 1, 2016 00:03 IST

म्हाकवेतील अजब प्रकार : जॅकवेल म्हाकवेत, पाणी कौलगेत; ग्रामस्थांना नाहक त्रास

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे पिण्याच्या पाण्यासाठी ३० वर्षांत पाच योजना झाल्या. यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडूनही म्हाकवे (ता. कागल) येथील ग्रामस्थांच्या नशिबी दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेले जॅकवेल अपुरे पडत आहे. काळम्मावाडी धरणातून पाणी वेदगंगेत न सोडल्यामुळे नदीतील पाणीपातळी अत्यंत कमी झाली असून, येथील जॅकवेल नदीकाठावर पाणीपातळीच्या समपातळीवर असल्यामुळे पाणी कौलगेत, तर जॅकवेल म्हाकवेत, अशी स्थिती बनली आहे. परिणामी, जॅकवेलमध्ये पाणी पाडण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र पाणी योजना केली आहे. ग्रामपंचायतीच्या स्थापनेला ६३ वर्षे पूर्ण झाली; मात्र ग्रामस्थांना स्वच्छ पाण्यासाठी आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनानेही येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निधीचा प्रवाह कायम ठेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा खटाटोपही केला. आजतागायत शासनाने पाच पाणी योजना व डझनभर कूपनलिका खुदाईसाठी तसेच पाणी साठवणुकीसाठी टाकी बांधण्यासाठी निधीही देऊ केला.मात्र, खर्ची पडलेला निधी सत्कारणी लागला का? येथील ग्रामस्थांची तृष्णा भागविली गेली का? याचे सिंहावलोकन शासनाने केलेच नाही. केवळ निधी देण्याचेच काम केले.१९७२ मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना गावच्या उत्तरेकडील बाजूस तलाव बांधून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न झाला. तेथून १९८२ मध्ये गावासाठी पिण्याच्या पाण्याची योजना झाली. मात्र, तलावात सध्या पाणीच नसल्याने ही योजना बंद अवस्थेत आहे.त्यानंतर तत्कालीन राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निधीतून दुसरी पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतून नदीतून थेट पाणी उपसा करून ते गावच्या उत्तरेकडील बाजूला पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बांधून त्यामध्ये सोडण्यात आले, तर तलावामध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी कालव्यावरून पाणी योजना करून ती तलावात सोडण्यात आली. त्यानंतर दलित वस्तीसाठी पुन्हा नव्याने पाणी योजना मंजूर करून तीही कार्यान्वित करण्यात आली.परंतु, या चारही योजना कुचकामी ठरत असल्यामुळे ठिकठिकाणी डझनभर कूपनलिका खुदाईसाठी निधीही देण्यात आला. त्याचबरोबर गत दोन वर्षांपूर्वी पेयजल योजनेतून स्टेच गॅलरीसह नव्याने पाणीयोजना होण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची पाचवी योजना मंजूर करण्यात आली. मात्र, यातून सुमारे १९ लाख रुपये खर्च करून नदीमध्ये पाणी शुद्धिकरणाचे (स्टेच गॅलरी) काम झाले; परंतु हे काम निरुपयोगीच ठरले आहे.तसेच महाजल योजनेतून सुमारे १० लाख रुपयांचा निधी खर्चून शोभेच्या इमारतीप्रमाणे जवळपास २० फूट उंचीचे जॅकवेल बांधले आहे; परंतु हे जॅकवेळ नदीत अथवा खोलीवर न करता वरचेवरच बांधण्यात आले आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी कमी झाली की इतर विद्युतपंपांच्या आधारे नदीतील पाणी जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी दिले जाते.ग्रामस्थांवर तिहेरी भुर्दंड नदीतील पाणी जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी उचलण्यासाठी दोन्ही ठिकाणी स्वतंत्र विद्युत मोटारी आहेत, तर गावच्या उत्तरेकडील बाजूच्या तलावावर असणाऱ्या विद्युत पंपाचेही कनेक्शन चालूच आहे. त्यामुळे तेथील वीज बिलही ग्रामपंचायतीला भरावे लागत आहे. यासाठी प्रत्येक वर्षी ग्रामस्थांना सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये वीज बिलापोटी भरावे लागत आहेत. ही प्रशासनाची नियोजनशून्यताच म्हणावी लागेल.