शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जॅकवेलची ‘तृष्णा’ भागविण्यासाठी स्वतंत्र पाणी योजना

By admin | Updated: January 1, 2016 00:03 IST

म्हाकवेतील अजब प्रकार : जॅकवेल म्हाकवेत, पाणी कौलगेत; ग्रामस्थांना नाहक त्रास

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे पिण्याच्या पाण्यासाठी ३० वर्षांत पाच योजना झाल्या. यासाठी कोट्यवधी रुपये खर्ची पडूनही म्हाकवे (ता. कागल) येथील ग्रामस्थांच्या नशिबी दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आलेले जॅकवेल अपुरे पडत आहे. काळम्मावाडी धरणातून पाणी वेदगंगेत न सोडल्यामुळे नदीतील पाणीपातळी अत्यंत कमी झाली असून, येथील जॅकवेल नदीकाठावर पाणीपातळीच्या समपातळीवर असल्यामुळे पाणी कौलगेत, तर जॅकवेल म्हाकवेत, अशी स्थिती बनली आहे. परिणामी, जॅकवेलमध्ये पाणी पाडण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र पाणी योजना केली आहे. ग्रामपंचायतीच्या स्थापनेला ६३ वर्षे पूर्ण झाली; मात्र ग्रामस्थांना स्वच्छ पाण्यासाठी आजही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनानेही येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निधीचा प्रवाह कायम ठेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा खटाटोपही केला. आजतागायत शासनाने पाच पाणी योजना व डझनभर कूपनलिका खुदाईसाठी तसेच पाणी साठवणुकीसाठी टाकी बांधण्यासाठी निधीही देऊ केला.मात्र, खर्ची पडलेला निधी सत्कारणी लागला का? येथील ग्रामस्थांची तृष्णा भागविली गेली का? याचे सिंहावलोकन शासनाने केलेच नाही. केवळ निधी देण्याचेच काम केले.१९७२ मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना गावच्या उत्तरेकडील बाजूस तलाव बांधून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न झाला. तेथून १९८२ मध्ये गावासाठी पिण्याच्या पाण्याची योजना झाली. मात्र, तलावात सध्या पाणीच नसल्याने ही योजना बंद अवस्थेत आहे.त्यानंतर तत्कालीन राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निधीतून दुसरी पाणी योजना मंजूर करण्यात आली. या योजनेतून नदीतून थेट पाणी उपसा करून ते गावच्या उत्तरेकडील बाजूला पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बांधून त्यामध्ये सोडण्यात आले, तर तलावामध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी कालव्यावरून पाणी योजना करून ती तलावात सोडण्यात आली. त्यानंतर दलित वस्तीसाठी पुन्हा नव्याने पाणी योजना मंजूर करून तीही कार्यान्वित करण्यात आली.परंतु, या चारही योजना कुचकामी ठरत असल्यामुळे ठिकठिकाणी डझनभर कूपनलिका खुदाईसाठी निधीही देण्यात आला. त्याचबरोबर गत दोन वर्षांपूर्वी पेयजल योजनेतून स्टेच गॅलरीसह नव्याने पाणीयोजना होण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्चाची पाचवी योजना मंजूर करण्यात आली. मात्र, यातून सुमारे १९ लाख रुपये खर्च करून नदीमध्ये पाणी शुद्धिकरणाचे (स्टेच गॅलरी) काम झाले; परंतु हे काम निरुपयोगीच ठरले आहे.तसेच महाजल योजनेतून सुमारे १० लाख रुपयांचा निधी खर्चून शोभेच्या इमारतीप्रमाणे जवळपास २० फूट उंचीचे जॅकवेल बांधले आहे; परंतु हे जॅकवेळ नदीत अथवा खोलीवर न करता वरचेवरच बांधण्यात आले आहे. त्यामुळे नदीची पाणीपातळी कमी झाली की इतर विद्युतपंपांच्या आधारे नदीतील पाणी जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी ग्रामस्थांना पिण्यासाठी दिले जाते.ग्रामस्थांवर तिहेरी भुर्दंड नदीतील पाणी जॅकवेलमध्ये आणि जॅकवेलमधील पाणी उचलण्यासाठी दोन्ही ठिकाणी स्वतंत्र विद्युत मोटारी आहेत, तर गावच्या उत्तरेकडील बाजूच्या तलावावर असणाऱ्या विद्युत पंपाचेही कनेक्शन चालूच आहे. त्यामुळे तेथील वीज बिलही ग्रामपंचायतीला भरावे लागत आहे. यासाठी प्रत्येक वर्षी ग्रामस्थांना सुमारे साडेतीन ते चार लाख रुपये वीज बिलापोटी भरावे लागत आहेत. ही प्रशासनाची नियोजनशून्यताच म्हणावी लागेल.