शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांसाठी लवकरच स्वतंत्र मंडळ

By admin | Updated: November 10, 2015 00:02 IST

चंद्रकांतदादा पाटील : सहकार कायद्यात होणार स्वतंत्र भाग

सांगली : राज्यातील पतसंस्थांची चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी लवकरच स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात येईल. सहकार कायद्यात पतसंस्थांसाठीचा स्वतंत्र भाग तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, राज्यात दोन लाख ३० हजार सहकारी संस्था आहेत. यातील किमान लाखभर संस्था बोगस असल्याचा संशय आम्हाला होता. त्यानुसार आम्ही ‘फिजिकल आॅडिट’चा निर्णय घेतला आणि केलेल्या तपासणीत ७० हजार संस्था बोगस निघाल्या. लवकरच या संस्था बंद करण्यात येणार आहेत. उर्वरित संस्थांवर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण सहकार विभागाचे आहे. पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी पतसंस्थांमधील ५० हजारांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देण्याचा विचार आहे. याशिवाय सहकार कायद्यात पतसंस्थेचा उल्लेख करून त्यासाठी स्वतंत्र भाग तयार करण्यात येणार आहे. पतसंस्थांच्या चळवळीवर नियंत्रण ठेवता यावे, तसेच त्यांना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने स्वतंत्र मंडळही स्थापन होईल. सहकारी संस्थांमधील चौकशींबाबतही सरकार गंभीर आहे. शक्य तेवढ्या गतीने व कायद्यातील तरतुदीनुसार चौकशी केली जात आहे. राज्यातील एलबीटी माफी, टोल बायबॅक आणि दुष्काळी मदत अशा गोष्टींमुळे राज्यातील तिजोरीवर ताण पडला असला, तरी त्याची चिंता नाही. येत्या ३१ मार्चपर्यंत पडणारा बोजा कमी करण्याच्यादृष्टीने शासनाचे नियोजन आहे. एलबीटी माफीची कोणतीही घाई सरकारने केलेली नाही. जीएसटी लागू होईपर्यंत हा प्रश्न प्रलंबित ठेवला असता, तर पुन्हा सरकारने त्यांचे वचन पाळले नाही, असा आरोप झाला असता. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. सरकारच्या अनेक योजनांची माहिती व त्यांचे सकारात्मक परिणाम याविषयीची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली. (प्रतिनिधी)योजना कसल्या, टक्केवारी !आमच्याच योजनांची नावे बदलून भाजप सरकारने स्वत:चा ढोल बडविल्याची टीका काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, त्यांच्याही काळात या योजना होत्या; मात्र त्याचे परिणाम शून्य होते. आम्ही त्याच योजनांना अधिक गती देऊन पारदर्शीपणा व परिणामकारकता जपली. लोकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होऊ लागला आहे. आघाडी सरकारने केवळ योजना आखल्या. त्यात पारदर्शीपणापेक्षा टक्केवारीच अधिक होती, अशी टीकाही त्यांनी केली.बारामतीला गेलो म्हणून चौकशी थांबणार नाही!बारामतीला आम्ही कार्यक्रमाला जाऊन आलो, म्हणून सहकारी संस्थांमधील किंवा अन्य चौकशी थांबणार नाहीत. सिंचन घोटाळ्यांच्या चौकशीत घाईगडबड करून चालणार नाही. ९९ दोषी सुटले तरी चालतील, पण एक निर्दोष फासावर जाता कामा नये, या नियमाप्रमाणे आम्ही थोडे सबुरीने घेत आहोत. कायदेशीर पुराव्यांचा आधार घेऊन चौकशी केली जाईल. त्यामुळे यामध्ये सरकार कचखाऊ धोरण घेत असल्याचा गैरसमज कोणी करून घेऊ नये, असे ते म्हणाले. सरकारी वकिलांवर विसंबून नाहीयापूर्वी सरकारची बाजू व्यवस्थित मांडली जात नसल्यामुळे न्यायालयीन लढाईत अपयश येत होते. आता आम्ही कायदा विभागाच्या यंत्रणेत बदल केले आहेत. केवळ सरकारी वकिलांवरही विसंबून राहणार नाही. ताकदीने आम्ही सरकारच्या न्यायालयीन लढाया लढविण्यावर भर दिल्याने गेल्या वर्षभरात बहुतांश लढाया आम्ही जिंकलेल्या आहेत, असे पाटील म्हणाले. कारखान्यांना सर्वाधिक मदतपंधरा वर्षांत राज्यातील आघाडी सरकारने जेवढी मदत साखर कारखान्यांना केली नाही, तेवढी मदत एका वर्षात आमच्या सरकारने केली आहे. खरेदी करमाफी, निर्यात अनुदान, कारखान्यांना स्वतंत्र पॅकेज अशा अनेक निर्णयांतून साखर कारखान्यांना दिलासा दिला आहे. कारखाने टिकले तरच उसाची शेती व शेतकरी टिकतील म्हणून ही मदत केली आहे.