शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

यड्राव परिसरात वाढते गुन्हे चिंताजनक

By admin | Updated: January 9, 2015 00:03 IST

पोलिसांना आव्हान : पार्वतीमधील पोलीस चौकी कार्यरत ठेवण्याची आवश्यकता

घन:श्याम कुंभार- यड्राव -खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे भरदिवसा झालेल्या खुनातील हल्लेखोरास ग्रामस्थांनी पकडून देऊन पोलिसांचे पूर्ण काम केले. यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांचे तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पार्वती औद्योगिक वसाहतीमधील पोलीस चौकी कार्यरत ठेवल्यास गुन्ह्यांना आळा बसेल; परंतु यड्राव परिसरात वाढत असणारी गुन्हेगारी चिंताजनक बनत आहे.यड्राव परिसर पोलीस खात्याकडून संवेदनशील भाग म्हणून ओळखला जात आहे. त्यामध्ये वारंवार घडणाऱ्या या घटना त्यास ठळक करीत आहेत. पैशांची देवाण-घेवाण, खासगी सावकारी, कामाचा ठेका, गटाचे वर्चस्व, महिलांची छेडछाड, उद्योगावर हल्ले, नासधूस करणे, विविध कारणांसाठी सक्तीची वसुली यामुळे वादावादी व सशस्त्र हल्ले या सर्व गोष्टी अंगवळणी पडल्या सारख्या झाल्या आहेत. कारण, घटनेनंतर ‘आपापसात’ होते व ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ याप्रमाणे मागे तसे पुढे.पोलीस खात्यास तक्रारीची नोंद लागते. त्याशिवाय कायद्याने तपास करता येत नाही. या भूमिकेने तडजोडींना महत्त्व वाढते. यामुळेच सन २००३ मध्ये खोतवाडीमध्ये खोत दाम्पत्याचा खून प्रकरणाचा तपास अद्याप पूर्णत्वास आला नाही. मे २००६ मध्ये ओंकारेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीत सात ते आठ लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. मे २००९ मध्ये प्रियदर्शनी अपार्टमेंटमध्ये दागिण्यांसह दहा लाखांच्या रोख रकमेची लूट, जिन मंदिरातील दानपेटी या घटनेच्या मुळापर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही.सांगली नाका परिसरातील सराफी दुकानातील चोरी अद्याप उघड झाली नाही. हे सर्व गुन्हे तपासाचे आव्हान पोलिसांना आहे. यासाठी पार्वती औद्योगिक वसाहतीमधील पोलीस चौकी कार्यरत ठेवावी. तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे गुन्हेगारीस प्रतिबंध बसेल. (उत्तरार्ध)