शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
4
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
5
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
6
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
7
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
8
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
9
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
10
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
11
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
12
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
13
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
14
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
15
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
16
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
17
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
18
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
19
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
20
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

वनातील मानवाचा वाढता हस्तक्षेप संघर्षाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी, “जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी, “जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या गरजा व त्यांची जीवनशैली समजून घेतली, तर नक्कीच हा संघर्ष कमी होऊ शकतो. जंगले व वनसंपदा भविष्यासाठी सुरक्षित ठेवायची असतील तर वन व्यवस्थापनाची संकल्पना समाजापर्यंत व्यवस्थित पोहोचणे गरजचे आहे. या कामात तरुण पिढी प्रभावी भूमिका बजावू शकते” असे प्रतिपादन पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील यांनी येथे व्यक्त केले.

कर्मवीर हिरे महाविद्यालयात नववर्षारंभानिमित्त आयोजित ''''वनव्यवस्थापन व भारतीय वनविभागातील नोकरीच्या संधी'''' या विषयावरील कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील होते.

दत्तात्रय पाटील म्हणाले, “जंगले म्हणजे केवळ मौजमजा व नशाबाजी करण्याची ठिकाणे आहेत, अशी मनोवृत्ती सध्या वाढत आहे. जंगली प्राण्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे बदलल्या जात आहेत. त्याचा फटका जंगल व पर्यायाने निसर्गाला बसतो आहे. याला आपण वेळीच आवर घातला नाही, तर मानव- वन्यजीव संघर्ष अधिकच तीव्र होणार यात शंका नाही.

यावेळी दत्तात्रय पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व भारतीय वन विभागातील विविध पदे व त्यांची भरती प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉ. शरदराव व्हनाळकर, डॉ. संताजी खोपडे, प्रा. उत्तम चौगले, सौ. रेश्मा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. एस्सी. विभागप्रमुख डॉ. सागर व्हनाळकर यांनी केले. स्वागत डॉ. विलास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मृणाल देसाई यांनी केले. आभार प्रा. चेतन भगत यांनी मानले.

फोटो ओळ: कर्मवीर हिरे महाविद्यालयात आयोजित ''''वनव्यवस्थापन'''' कार्यक्रमात बोलताना वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील. यावेळी उपस्थित (डावीकडून) डॉ. सागर व्हनाळकर, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, सौ. रेश्मा पाटील, डॉ. मृणाल देसाई व डॉ. शरदराव व्हनाळकर.