शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

वनातील मानवाचा वाढता हस्तक्षेप संघर्षाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी, “जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी, “जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या गरजा व त्यांची जीवनशैली समजून घेतली, तर नक्कीच हा संघर्ष कमी होऊ शकतो. जंगले व वनसंपदा भविष्यासाठी सुरक्षित ठेवायची असतील तर वन व्यवस्थापनाची संकल्पना समाजापर्यंत व्यवस्थित पोहोचणे गरजचे आहे. या कामात तरुण पिढी प्रभावी भूमिका बजावू शकते” असे प्रतिपादन पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील यांनी येथे व्यक्त केले.

कर्मवीर हिरे महाविद्यालयात नववर्षारंभानिमित्त आयोजित ''''वनव्यवस्थापन व भारतीय वनविभागातील नोकरीच्या संधी'''' या विषयावरील कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील होते.

दत्तात्रय पाटील म्हणाले, “जंगले म्हणजे केवळ मौजमजा व नशाबाजी करण्याची ठिकाणे आहेत, अशी मनोवृत्ती सध्या वाढत आहे. जंगली प्राण्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे बदलल्या जात आहेत. त्याचा फटका जंगल व पर्यायाने निसर्गाला बसतो आहे. याला आपण वेळीच आवर घातला नाही, तर मानव- वन्यजीव संघर्ष अधिकच तीव्र होणार यात शंका नाही.

यावेळी दत्तात्रय पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व भारतीय वन विभागातील विविध पदे व त्यांची भरती प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉ. शरदराव व्हनाळकर, डॉ. संताजी खोपडे, प्रा. उत्तम चौगले, सौ. रेश्मा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. एस्सी. विभागप्रमुख डॉ. सागर व्हनाळकर यांनी केले. स्वागत डॉ. विलास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मृणाल देसाई यांनी केले. आभार प्रा. चेतन भगत यांनी मानले.

फोटो ओळ: कर्मवीर हिरे महाविद्यालयात आयोजित ''''वनव्यवस्थापन'''' कार्यक्रमात बोलताना वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील. यावेळी उपस्थित (डावीकडून) डॉ. सागर व्हनाळकर, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, सौ. रेश्मा पाटील, डॉ. मृणाल देसाई व डॉ. शरदराव व्हनाळकर.