शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वनातील मानवाचा वाढता हस्तक्षेप संघर्षाचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, गारगोटी, “जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

गारगोटी, “जंगली प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात माणसांचा वाढलेला हस्तक्षेप मानव- वन्यजीव संघर्षास कारणीभूत ठरत आहे. वन्यप्राण्यांच्या गरजा व त्यांची जीवनशैली समजून घेतली, तर नक्कीच हा संघर्ष कमी होऊ शकतो. जंगले व वनसंपदा भविष्यासाठी सुरक्षित ठेवायची असतील तर वन व्यवस्थापनाची संकल्पना समाजापर्यंत व्यवस्थित पोहोचणे गरजचे आहे. या कामात तरुण पिढी प्रभावी भूमिका बजावू शकते” असे प्रतिपादन पाटणे (ता. चंदगड) वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील यांनी येथे व्यक्त केले.

कर्मवीर हिरे महाविद्यालयात नववर्षारंभानिमित्त आयोजित ''''वनव्यवस्थापन व भारतीय वनविभागातील नोकरीच्या संधी'''' या विषयावरील कार्यक्रमात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील होते.

दत्तात्रय पाटील म्हणाले, “जंगले म्हणजे केवळ मौजमजा व नशाबाजी करण्याची ठिकाणे आहेत, अशी मनोवृत्ती सध्या वाढत आहे. जंगली प्राण्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे बदलल्या जात आहेत. त्याचा फटका जंगल व पर्यायाने निसर्गाला बसतो आहे. याला आपण वेळीच आवर घातला नाही, तर मानव- वन्यजीव संघर्ष अधिकच तीव्र होणार यात शंका नाही.

यावेळी दत्तात्रय पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महाराष्ट्र व भारतीय वन विभागातील विविध पदे व त्यांची भरती प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास डॉ. शरदराव व्हनाळकर, डॉ. संताजी खोपडे, प्रा. उत्तम चौगले, सौ. रेश्मा पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. एस्सी. विभागप्रमुख डॉ. सागर व्हनाळकर यांनी केले. स्वागत डॉ. विलास जगताप यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मृणाल देसाई यांनी केले. आभार प्रा. चेतन भगत यांनी मानले.

फोटो ओळ: कर्मवीर हिरे महाविद्यालयात आयोजित ''''वनव्यवस्थापन'''' कार्यक्रमात बोलताना वनक्षेत्रपाल दत्तात्रय पाटील. यावेळी उपस्थित (डावीकडून) डॉ. सागर व्हनाळकर, प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, सौ. रेश्मा पाटील, डॉ. मृणाल देसाई व डॉ. शरदराव व्हनाळकर.