शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

बगॅसचे मूल्य वाढवून २८ टक्के करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांमधून निर्माण होणाºया बगॅसचे मूल्य हे वीज प्रकल्प आहेत तिथे चार टक्के व ज्या कारखान्यात वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी मूल्यच धरू नये, अशी अधिसूचना भाजप सरकारने काढली आहे. बुधवारी (दि. १३) होणाºया ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीत हे मूल्य वाढवून २८ टक्के करावे, या मागणीसाठी अंकुश ...

ठळक मुद्देअंकुश, बळिराजा, शेतकरी संघटनेची मागणी : सोमवारी पुण्यात आमरण उपोषणमंडळातील शेतकरी प्रतिनिधींनी या बगॅसच्या चुकीच्या तरतुदीविषयी एकदाही शासनाला जाब विचारलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांमधून निर्माण होणाºया बगॅसचे मूल्य हे वीज प्रकल्प आहेत तिथे चार टक्के व ज्या कारखान्यात वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी मूल्यच धरू नये, अशी अधिसूचना भाजप सरकारने काढली आहे. बुधवारी (दि. १३) होणाºया ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीत हे मूल्य वाढवून २८ टक्के करावे, या मागणीसाठी अंकुश सामाजिक संस्था, शेतकरी संघटना, बळिराजा संघटना यांच्या वतीने सोमवार (दि. ११) पासून पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, अशी माहिती पी. जी. पाटील-वाकरेकर व धनाजी चुडमुंगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील-वाकरेकर व चुडमुंगे म्हणाले, सी. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार राज्य शासनाने २०१३ मध्ये ऊस नियंत्रण कायदा केला आहे. यामध्ये उसाचा अंतिम दर ठरविण्यासाठी ऊस नियंत्रण मंडळ स्थापन केले असून, यामध्ये कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी तसेच अध्यक्ष म्हणून राज्याचे मुख्य सचिव व मंडळाचे सचिव म्हणून साखर आयुक्त आहेत. भाजप सरकारने यामध्ये सुधारणा करून १६ फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा अधिसूचना काढली. त्यानुसार उसाचा दर निश्चित करण्याचे मापदंड दिले आहेत. त्यामध्ये उसापासून एकूण तयार होणारी साखर, मळी, बगॅस व प्रेसमड यांचे बाजारभावानुसार उत्पन्न काढायचे; त्यातून तोडणी, वाहतूक खर्च वजा करून उर्वरित रकमेतील ७० टक्के शेतकºयांना व ३० टक्के कारखानदारांना द्यायचे, असे सूत्र ठरविण्यात आले आहे.

हे सर्व बरोबर असले तरी या अधिसूचनेमध्ये बगॅसचे मूल्य हे निर्माण होणाºया संपूर्ण बगॅसचे न धरता ज्यांचे वीज प्रकल्प आहेत, त्यांनी चार टक्के बगॅसचे मूल्य धरायचे व ज्या कारखान्यांचे वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी बगॅसचे मूल्यच धरू नये, असा उपनियम केला आहे. त्यामुळे शेतकºयांचे टनाला ५०० ते ६०० रुपये नुकसान होऊन कारखान्यांचा फायदा होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही अधिसूचनेतील चूक दुरुस्त करा म्हणून आम्ही सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. उसाच्या अंतिम दरात उत्पादकांना टनाला ५०० ते ६०० रुपये तोटा होणार आहे. हे कळत असूनही नियंत्रण मंडळातील शेतकरी प्रतिनिधींनी या बगॅसच्या चुकीच्या तरतुदीविषयी एकदाही शासनाला जाब विचारलेला नाही; त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.यावेळी नितीन पाटील, अविनाश पाटील, प्रभाकर बंडगर, सत्यजित सोमण, दत्ता मोरे, आदी उपस्थित होते.