शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

बगॅसचे मूल्य वाढवून २८ टक्के करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांमधून निर्माण होणाºया बगॅसचे मूल्य हे वीज प्रकल्प आहेत तिथे चार टक्के व ज्या कारखान्यात वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी मूल्यच धरू नये, अशी अधिसूचना भाजप सरकारने काढली आहे. बुधवारी (दि. १३) होणाºया ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीत हे मूल्य वाढवून २८ टक्के करावे, या मागणीसाठी अंकुश ...

ठळक मुद्देअंकुश, बळिराजा, शेतकरी संघटनेची मागणी : सोमवारी पुण्यात आमरण उपोषणमंडळातील शेतकरी प्रतिनिधींनी या बगॅसच्या चुकीच्या तरतुदीविषयी एकदाही शासनाला जाब विचारलेला नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांमधून निर्माण होणाºया बगॅसचे मूल्य हे वीज प्रकल्प आहेत तिथे चार टक्के व ज्या कारखान्यात वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी मूल्यच धरू नये, अशी अधिसूचना भाजप सरकारने काढली आहे. बुधवारी (दि. १३) होणाºया ऊस नियंत्रण मंडळाच्या बैठकीत हे मूल्य वाढवून २८ टक्के करावे, या मागणीसाठी अंकुश सामाजिक संस्था, शेतकरी संघटना, बळिराजा संघटना यांच्या वतीने सोमवार (दि. ११) पासून पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, अशी माहिती पी. जी. पाटील-वाकरेकर व धनाजी चुडमुंगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पाटील-वाकरेकर व चुडमुंगे म्हणाले, सी. रंगराजन समितीच्या शिफारशींनुसार राज्य शासनाने २०१३ मध्ये ऊस नियंत्रण कायदा केला आहे. यामध्ये उसाचा अंतिम दर ठरविण्यासाठी ऊस नियंत्रण मंडळ स्थापन केले असून, यामध्ये कारखान्यांचे प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी तसेच अध्यक्ष म्हणून राज्याचे मुख्य सचिव व मंडळाचे सचिव म्हणून साखर आयुक्त आहेत. भाजप सरकारने यामध्ये सुधारणा करून १६ फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा अधिसूचना काढली. त्यानुसार उसाचा दर निश्चित करण्याचे मापदंड दिले आहेत. त्यामध्ये उसापासून एकूण तयार होणारी साखर, मळी, बगॅस व प्रेसमड यांचे बाजारभावानुसार उत्पन्न काढायचे; त्यातून तोडणी, वाहतूक खर्च वजा करून उर्वरित रकमेतील ७० टक्के शेतकºयांना व ३० टक्के कारखानदारांना द्यायचे, असे सूत्र ठरविण्यात आले आहे.

हे सर्व बरोबर असले तरी या अधिसूचनेमध्ये बगॅसचे मूल्य हे निर्माण होणाºया संपूर्ण बगॅसचे न धरता ज्यांचे वीज प्रकल्प आहेत, त्यांनी चार टक्के बगॅसचे मूल्य धरायचे व ज्या कारखान्यांचे वीज प्रकल्प नाहीत, त्यांनी बगॅसचे मूल्यच धरू नये, असा उपनियम केला आहे. त्यामुळे शेतकºयांचे टनाला ५०० ते ६०० रुपये नुकसान होऊन कारखान्यांचा फायदा होणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ही अधिसूचनेतील चूक दुरुस्त करा म्हणून आम्ही सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. उसाच्या अंतिम दरात उत्पादकांना टनाला ५०० ते ६०० रुपये तोटा होणार आहे. हे कळत असूनही नियंत्रण मंडळातील शेतकरी प्रतिनिधींनी या बगॅसच्या चुकीच्या तरतुदीविषयी एकदाही शासनाला जाब विचारलेला नाही; त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.यावेळी नितीन पाटील, अविनाश पाटील, प्रभाकर बंडगर, सत्यजित सोमण, दत्ता मोरे, आदी उपस्थित होते.