शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

साखरेवरील अधिभारात वाढ

By admin | Updated: February 1, 2016 00:51 IST

प्रतिक्विंटल १२४ रुपये : आजपासून अंमलबजावणी; साखर विकास निधी वाढविण्यासाठी केंद्राचा निर्णय

चंद्रकांत कित्तुरे ल्ल कोल्हापूर साखरेवरील अधिभारात प्रतिक्विंटल शंभर रुपयांनी वाढ करून तो १२४ रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे साखरेच्या विक्रीवर प्रतिक्विंटल ७१ रुपये अबकारी कर आणि अधिभार १२४ रुपये असे १९५ रुपये कराच्या रुपाने आकारले जाणार असून, ही रक्कम केंद्राच्या साखर विकास निधीत जमा होणार आहे. याची अंमलबजावणी आज, सोमवारी केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. साखर उद्योगाला मदत करण्यासाठी केंद्र सरकारचा साखर विकास निधी आहे. साखरेवरील अधिभाराची रक्कम या निधीत जमा केली जाणार आहे. अडचणीतील साखर कारखान्यांना मदत, कारखान्यांचे विस्तारीकरण करण्यासाठी तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याकरिता अनुदान अथवा सवलतीच्या दराने कर्ज या निधीतून दिले जाते. सध्या साखरेच्या विक्रीवर प्रतिक्विंटल २४ रुपये अधिभार लावला जातो. हा अधिभार २०० रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूद करणाऱ्या विधेयकाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जानेवारी महिन्यातच मंजुरी दिली आहे. यानंतर साखरेच्या विक्रीवर प्रतिकिलो एक रुपया म्हणजेच प्रतिक्विंटल १०० रुपये अधिभार वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. साखर उत्पादन घटणार गेल्या साखर हंगामात साखरेचे विक्रमी २८० लाख टन इतके उत्पादन झाले होते. त्याचप्रमाणे जगभरातील साखर उत्पादनातही वाढ झाल्याने जागतिक पातळीवरच साखरेचे भाव कोसळले होते. परिणामी, अनेक कारखान्यांना उसाला एफआरपी इतकाही दर देणे कठीण बनले होते. यंदा महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे. परिणामी, चालू हंगामातील साखरेचे उत्पादन २६० लाख टनांवर येईल, असा अंदाज ‘इस्मा’ या साखर उद्योगाच्या शिखर संघटनेने वर्तविला आहे. साखरेवरील अधिभाराची अंमलबजावणी जानेवारीपासून करावयाची की फेब्रुवारीपासून यावर निर्णय झाला नव्हता. तो आता झाला असून, १ फेब्रुवारीपासून वाढीव अधिभार लागू करण्याचा निर्णय झाला असल्याचे साखर उद्योगातील विश्वसनीय सूत्रांनी रविवारी सांगितले. याबाबतची घोषणाही आज, सोमवारीच केली जाईल, असे सांगण्यात आले. साखरेचे दर कोसळल्याने गेल्या हंगामापासून साखर कारखाने पर्यायाने साखर उद्योगच प्रचंड अडचणीतून जात आहे. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी तसेच ऊस उत्पादकांची थकीत एफआरपी देण्याकरिता गेल्या डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने यापूर्वीच ११४७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. ३० लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट कारखान्यांना देतानाच साखर निर्यातीचे किमान उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या कारखान्याच्या ऊस उत्पादकांना प्रतिटन ४५ रुपये निर्यात अनुदान देण्याचा तसेच हे अनुदान थेट ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. बोजा साखर कारखान्यांवरच साखरेच्या दरातही हळूहळू वाढ होऊन तो प्रतिक्विंटल तीन हजारांच्या आसपास गेला आहे. साखर कारखानदारीसाठी हे शुभ संकेत असले तरी साखरेवरील अधिभाराची रक्कम साखर कारखान्यांकडूनच त्याच्या साखर विक्रीतून वसूल केली जाणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना त्याचा थेट फटका बसणार आहे.