शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

राधानगरी अभयारण्यात ‘शेखरूं’च्या संख्येतवाढ

By admin | Updated: May 1, 2015 00:22 IST

येथे किमान ४०० शेखरू असल्याचा अंदाज असून, यावेळी कर्मचाऱ्यांना १५२ शेखरूंचे प्रत्यक्ष दर्शन झाले आहे.शेखरू हा खार प्रजातीतील प्राणी आहे.

राधानगरी : महाराष्ट्राचे मानचिन्ह अशी ओळख असलेल्या ‘शेखरू’ या प्राण्याचे राधानगरी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात अस्तित्व असल्याचे आढळले आहे. या प्राण्याच्या गणतीसाठी गत आठवड्यात झालेल्या विशेष मोहिमेत अभयारण्यात २००८ घरटी आढळली. त्यानुसार येथे किमान ४०० शेखरू असल्याचा अंदाज असून, यावेळी कर्मचाऱ्यांना १५२ शेखरूंचे प्रत्यक्ष दर्शन झाले आहे.शेखरू हा खार प्रजातीतील प्राणी आहे. अंगावर तांबूस, तपकिरी किंवा गडद चॉकलेटी रंगाने चकाकणारे केस, पोटाखालचा व शेपटीचा अर्धा भाग गडद पांढऱ्या रंगाचा, टपोरे डोळे, छोटेसे कान, झुपकेदार शेपटीचा गोंडा, असा हा खूप देखणा प्राणी आहे. रंगरूपातील फरक सोडला, तर मोठी खारच असल्याचा भास होतो. कोवळी पाने, फुले, तसेच फळे खाऊन गुजराण करणारा हा प्राणी उंच झाडावरच असतो.शेखरू स्वत:ला राहण्यासाठी उंच झाडावर झाडाच्या काड्या, पाने याचा वापर करून किमान सात ते आठ घरटी बांधतो. वापरात असलेली, मोडकळीस आलेली, दुरुस्तीची गरज असलेले, सोडून दिलेली गर्भ घरटी अशी त्याची विभागणी असते. ही घरटी घुमटाकार असतात. डिसेंबर ते जानेवारी हा काळ या प्राण्यांच्या विणीचा हंगाम असतो. या काळात नर-मादी एकत्र राहतात. एक महिन्याच्या गर्भार काळानंतर मादी एकावेळी एका पिलाला जन्म देते. या काळात मादी घरट्यात पिलांचे सहा ते दहा महिने संगोपन करतात.राज्यात महाराष्ट्राचे मानचिन्ह अशी याला मान्यता दिली आहे. भीमाशंकर अभयारण्यात याचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर पश्चिम घाटात यांचे अस्तित्व काही प्रमाणात होते. त्यांची यापूर्वी स्वतंत्रपणे गणना झालेली नव्हती. गेल्या आठवड्यात १८ ते २२ एप्रिल या काळात ही गणना झाली. त्यावेळी २००८ घरटी आढळली. त्या प्रमाणात किमान चारशे शेखरू येथे असल्याचा वनकर्मचाऱ्यांचा अंदाज आहे. यावेळी १५२ शेखरूंचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचेही वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)लाजाळू व भिन्न असा हा प्राणी शक्यतो दाट जंगलात राहतो; पण येथे हत्तीमहाल मार्गावर वन्यजीवचे कार्यालय असलेल्या परिसरात अनेक दिवसांपासून एक जोडी फिरताना दिसते. या झाडावरून त्या झाडावर, झाडाच्या शेंड्यापर्यंत, तर कधी जमिनीपर्यंत सरसर धावणारा हा रंगीत देखणा प्राणी सहज नजरेस पडतो. जंगलाला लागूनच हा परिसर आहे.