शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

गावठाण हद्दवाढ करुन सामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:28 IST

कबनूर : ग्रामस्थांच्या हितासाठी कबनूर गावची गावठाण हद्दवाढ करणे गरजेची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विषयानुसार असणाऱ्या सर्व विभागांना सूचना देऊन ...

कबनूर : ग्रामस्थांच्या हितासाठी कबनूर गावची गावठाण हद्दवाढ करणे गरजेची आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विषयानुसार असणाऱ्या सर्व विभागांना सूचना देऊन गावची गावठाण हद्दवाढ करावी, अशा मागणीचे निवेदन हातकणंगले तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा पापालाल सनदी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

या निवेदनात, कबनूर गावची लोकसंख्या सन २०११च्या जनगणनेनुसार ३९,००० इतकी आहे. मात्र, सध्या लोकसंख्या सुमारे ६०,००० आहे. भौगोलिक क्षेत्र १०३२ हेक्टर आर इतके असून, त्यामध्ये बिगरशेती जमिनी १४५ हेक्टर आर पडसर १५५ हेक्टर आर व जिरायत जमीन जवळपास ५४७ हेक्टर आर आहे. त्यामध्ये जनावरांचे गोठे व रहिवासी करणासाठी वापर होत आहे. त्याचप्रमाणे गावठाण क्षेत्र १३ हेक्टर आर आहे. असे एकूण क्षेत्र जवळपास ९०० हेक्टर आर आहे. त्यामध्ये गावठाणमध्ये २५०० घर मिळकती आहेत. इतर गावठाण हद्दीबाहेरच्या जवळपास ६३३४च्या घर मिळकती ग्रामपंचायतीकडे नोंद आहेत. तसेच नागरिक रहिवासी व आपला छोटा-मोठा व्यवसाय करत असल्याने या क्षेत्राला सध्या नागरी वस्ती म्हणून बघितले जाते व त्यांना शासकीय निधीचा वापर करून नागरी सुविधा देण्याचा सर्वच लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात. तथापि, शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्याची नोंद व्यवस्थित न केल्याने नागरिकांना ७/१२ पत्रकी नावे नोंद कमी-जादा करणे, खरेदी-विक्री त्याचप्रमाणे बँकेचे कर्ज बोजा जादा-कमी करणे अवघड झाले असून, यामुळे शासनाचा हजारो रुपयांचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागतो. या सर्व बाबींचा विचार करता कबनूरची हद्दवाढ करणे जरुरीचे असल्याचे म्हटले आहे.