शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘देवगड’ची आवक कमी; बाजारात ‘मद्रास हापूस’चा गोडवा

By admin | Updated: May 16, 2016 02:13 IST

बाजारभाव : कांदा घसरला; कोबी, मिरची वगळता भाज्यांचे दर स्थिर

 कोल्हापूर : रत्नागिरी, देवगडहापूस आंब्यांची आवक कमी झाली असली तरी मद्रासच्या हापूस व पायरीने आंबा मार्केट स्थिर ठेवले आहे. गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला व कडधान्यांचे दर स्थिर राहिले असून कांद्याचे मार्केट मात्र घसरले आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी सहा रुपयांपर्यंत खाली आला आहे. उष्म्यामुळे कोकणातून हापूस आंब्याची आवक कमी राहिली. त्यात मुंबई, पुणे मार्केटमधून हापूसला मागणी असल्याने यंदा कोकणातील शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरविली. सध्या रोज सरासरी दोन हजार पेट्या व साडेचार हजार बॉक्सची आवक कोकणातून होते. त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आवक मद्रास व कर्नाटकातून हापूसची होत आहे. कर्नाटकातून ‘लालबाग’ची आवक चार हजार बॉक्स, तर ‘मद्रास’मधून दोन हजार पेट्या, तर अडीच हजारांहून अधिक बॉक्सची आवक होऊ लागली आहे. त्याचबरोबर मद्रास पायरीची आवकही तेवढीच होत आहे. मद्रास हापूसची आवक वाढल्याने दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. कोबी, ओली मिरची वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. वांग्याचे दर घाऊक बाजारात सरासरी १३ रुपये, तर टोमॅटो १५ रुपयांपर्यंत राहिले आहेत. ढब्बू, गवार २० रुपये, भेंडी १७ रुपये असे प्रमुख भाज्यांचे दर आहेत. मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर दहा रुपये राहिला आहे. साखर, सरकी तेल, तीळ, जिरे, खोबरे, धने यांसह हरभराडाळ, तूरडाळ, मूग, मटकीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. शाबू ४० रुपयांपर्यंत खाली आला असून चटणी करण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने मिरचीची मागणी स्थिर आहे. कांद्याची आवक वाढली आहे. बाजार समितीत दिवसाला सरासरी २२ हजार पिशव्यांची आवक होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. बाजार समितीत कांद्याचा सरासरी सहा रुपये किलो असा दर आहे. बटाट्याच्या आवकेबरोबर दरही स्थिर आहे.