शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

‘देवगड’ची आवक कमी; बाजारात ‘मद्रास हापूस’चा गोडवा

By admin | Updated: May 16, 2016 02:13 IST

बाजारभाव : कांदा घसरला; कोबी, मिरची वगळता भाज्यांचे दर स्थिर

 कोल्हापूर : रत्नागिरी, देवगडहापूस आंब्यांची आवक कमी झाली असली तरी मद्रासच्या हापूस व पायरीने आंबा मार्केट स्थिर ठेवले आहे. गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला व कडधान्यांचे दर स्थिर राहिले असून कांद्याचे मार्केट मात्र घसरले आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी सहा रुपयांपर्यंत खाली आला आहे. उष्म्यामुळे कोकणातून हापूस आंब्याची आवक कमी राहिली. त्यात मुंबई, पुणे मार्केटमधून हापूसला मागणी असल्याने यंदा कोकणातील शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरविली. सध्या रोज सरासरी दोन हजार पेट्या व साडेचार हजार बॉक्सची आवक कोकणातून होते. त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आवक मद्रास व कर्नाटकातून हापूसची होत आहे. कर्नाटकातून ‘लालबाग’ची आवक चार हजार बॉक्स, तर ‘मद्रास’मधून दोन हजार पेट्या, तर अडीच हजारांहून अधिक बॉक्सची आवक होऊ लागली आहे. त्याचबरोबर मद्रास पायरीची आवकही तेवढीच होत आहे. मद्रास हापूसची आवक वाढल्याने दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. कोबी, ओली मिरची वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. वांग्याचे दर घाऊक बाजारात सरासरी १३ रुपये, तर टोमॅटो १५ रुपयांपर्यंत राहिले आहेत. ढब्बू, गवार २० रुपये, भेंडी १७ रुपये असे प्रमुख भाज्यांचे दर आहेत. मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर दहा रुपये राहिला आहे. साखर, सरकी तेल, तीळ, जिरे, खोबरे, धने यांसह हरभराडाळ, तूरडाळ, मूग, मटकीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. शाबू ४० रुपयांपर्यंत खाली आला असून चटणी करण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने मिरचीची मागणी स्थिर आहे. कांद्याची आवक वाढली आहे. बाजार समितीत दिवसाला सरासरी २२ हजार पिशव्यांची आवक होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. बाजार समितीत कांद्याचा सरासरी सहा रुपये किलो असा दर आहे. बटाट्याच्या आवकेबरोबर दरही स्थिर आहे.