शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘देवगड’ची आवक कमी; बाजारात ‘मद्रास हापूस’चा गोडवा

By admin | Updated: May 16, 2016 02:13 IST

बाजारभाव : कांदा घसरला; कोबी, मिरची वगळता भाज्यांचे दर स्थिर

 कोल्हापूर : रत्नागिरी, देवगडहापूस आंब्यांची आवक कमी झाली असली तरी मद्रासच्या हापूस व पायरीने आंबा मार्केट स्थिर ठेवले आहे. गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला व कडधान्यांचे दर स्थिर राहिले असून कांद्याचे मार्केट मात्र घसरले आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी सहा रुपयांपर्यंत खाली आला आहे. उष्म्यामुळे कोकणातून हापूस आंब्याची आवक कमी राहिली. त्यात मुंबई, पुणे मार्केटमधून हापूसला मागणी असल्याने यंदा कोकणातील शेतकऱ्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरविली. सध्या रोज सरासरी दोन हजार पेट्या व साडेचार हजार बॉक्सची आवक कोकणातून होते. त्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आवक मद्रास व कर्नाटकातून हापूसची होत आहे. कर्नाटकातून ‘लालबाग’ची आवक चार हजार बॉक्स, तर ‘मद्रास’मधून दोन हजार पेट्या, तर अडीच हजारांहून अधिक बॉक्सची आवक होऊ लागली आहे. त्याचबरोबर मद्रास पायरीची आवकही तेवढीच होत आहे. मद्रास हापूसची आवक वाढल्याने दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. कोबी, ओली मिरची वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. वांग्याचे दर घाऊक बाजारात सरासरी १३ रुपये, तर टोमॅटो १५ रुपयांपर्यंत राहिले आहेत. ढब्बू, गवार २० रुपये, भेंडी १७ रुपये असे प्रमुख भाज्यांचे दर आहेत. मेथी, पालक, पोकळा या पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पेंढीचा दर दहा रुपये राहिला आहे. साखर, सरकी तेल, तीळ, जिरे, खोबरे, धने यांसह हरभराडाळ, तूरडाळ, मूग, मटकीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. शाबू ४० रुपयांपर्यंत खाली आला असून चटणी करण्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने मिरचीची मागणी स्थिर आहे. कांद्याची आवक वाढली आहे. बाजार समितीत दिवसाला सरासरी २२ हजार पिशव्यांची आवक होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. बाजार समितीत कांद्याचा सरासरी सहा रुपये किलो असा दर आहे. बटाट्याच्या आवकेबरोबर दरही स्थिर आहे.