शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर कर्जमाफीचा प्रश्न सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तुरंबे : महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तुरंबे : महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला प्रोत्साहनपर कर्जमाफीचा प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.

अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे माजी उपसभापती अरुण मारुतीराव जाधव यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित युवक व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते.

यावेळी कोरोना योद्धा व माजी सैनिकांचा सत्कार, कोरोना लसीकरण, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रास्ताविक दादासोा पाटील यांनी केले. शंभूराजे देसाई म्हणाले, कोरोना संकट थोपवण्यात राज्य सरकारची पहिली दोन वर्षे गेली, सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असताना काटकसर करत सर्वाधिक निधी कोरोना संकट थोपविण्यासाठी खर्च केला. त्यामुळे कोरोना रोखण्यात राज्य सरकार यशस्वी झाले, केंद्राकडून राज्याला अद्याप साडेबत्तीस हजार कोटी येणं आहे तरीही प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यास महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, अरुण जाधव हे जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव यांच्या विचारांचा वारसा जपत लोकांची सेवा करण्याचे काम करण्याची जबाबदारी यशस्विपणे त्यांनी पेलली आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून व जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापतिपदाच्या माध्यमातून अरुण जाधव आणि वंदना जाधव यांच्यातील सामाजिक दृष्टिकोन अधोरेखित होतो.

अरुण जाधव म्हणाले १९९० ला तळाशीचा सरपंच झालो तेव्हापासून आतापर्यंत राजकारणात कधीही मागे वळून बघितले नाही. वडिलांच्या ‘शब्दा’पुढे कधी गेलो नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांचे भाषण झाले. ज्येष्ठ नेते मारुतीराव जाधव यांनी माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा आढावा घेतला. बाबुराव देसाई, नंदकुमार ढेंगे, कल्याणराव निकम, दत्तात्रय उगले, अभिजित तायशेटे, अर्जुन आबिटकर, नंदकिशोर सूर्यवंशी, शामराव भावके, अशोकराव फराकटे, प्रकाश पाटील, विश्वनाथ पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब नवणे, धैर्यशील भोसले, अविनाश चिंदगे, विश्वनाथ तहसीलदार उपस्थित होते

मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी......

हसन मुश्रीफ यांच्यावर वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखी मर्यादेच्या पलीकडे जाऊन राजकीय चिखलफेक सध्या सुरू आहे. त्याला कुठेतरी पूर्णविराम मिळाला पाहिजे. शेवटी राजकारण म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्वाचे व्यासपीठ नाही म्हणून आम्ही सर्वजण महाविकास आघाडी सरकारचा आमदार या नात्याने आम्ही मंत्री मुश्रीफ यांच्या सोबत आहोत, असे प्रकाश आबिटकर म्हणाले.

२१ आबिटकर

फोटो ओळी

अर्जुनवाडा येथे अरुण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सपत्नीक सत्कार करताना गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आमदार प्रकाश आबिटकर, वंदना जाधव, विजय देवणे, अभिजित तायशेटे, मारुतीराव जाधव.