शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रोत्साहनपर अनुदान आदेशाची झाली रद्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही. शासन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही. शासन आदेशाची रद्दी झाली तरी प्रोत्साहनपर अनुदान दिले नाही. दिवाळीला गोड बातमी देऊ असे जाहीर केले आणि आता वीज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. हे आता सहन होत नाही. म्हणून २४ फेब्रुवारीला दसरा चौकात शाहू पुतळ्यासमोर एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

घाटगे म्हणाले, मी केवळ भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून नव्हे, तर शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारस, राज्यातील शेतकरी आणि सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून उपोषणाला बसणार आहे. त्या दिवशी सकाळी पत्नीसह अंबाबाईचे दर्शन घेऊन, या सरकारला सद्‌बुध्दी दे, अशी प्रार्थना करणार आहे आणि नंतर उपोषणाला सुरुवात करणार आहे.

सरकारच्या कारभाराबाबत बोलताना घाटगे म्हणाले, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा आदेश काढला, परंतु ते दिले नाही. मायक्रोफायनान्स वसुलीमध्ये लक्ष घालू, असे सांगितले. त्यातही काही केले नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे १० हजार देऊ, असे सांगितले. पण एकही रुपया दिला नाही. कोविड काळातील वीज बिले माफ करण्याचे आश्वासन तुमच्याच मंत्र्यांनी दिले. मग आता वसुलीच्या नोटिसा कशा पाठवता? हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांना फसवण्याचे काम करत आहे. या उपोषणानंतरही शासनाने काही निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ.

पत्रकार परिषदेला अमल महाडिक, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील, महावीर गाट, भगवान काटे, वीरेंद्र घाटगे, राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, नाथाजी पाटील, राहुल देसाई, पृथ्वीराज यादव, विश्वजित पाटील, डॉ. अरविंद माने, अजिंक्य इंगवले, अमित गाट उपस्थित होते.

चौकट

सहकारमंत्र्यांना कोल्हापुरात का आणलं

माझ्या शिवार संवाद यात्रेनंतर सहकारमंत्री कोल्हापुरात आले. त्यांनी प्रोत्साहनात्मक अनुदानासाठी उपसमिती नेमतो, ६०० कोटींची तरतूद करतो असे सांगितले. मात्र हे ते सांगली, सातारा जिल्ह्यात बोलले नाहीत, अधिवेशनात बोलले नाहीत, तर फ्क्त कोल्हापूर जिल्ह्यातच बोलले. कारण जिल्ह्यातील वातावरण तापल्यामुळे त्यांना कोणी तरी बोलावून आणले, असा टोला समरजित यांनी लगावला.

चौकट

शेतकऱ्यांची विचारपूस करणे हे नाटक कसे

शिवार संवाद यात्रा हे प्रसिध्दीसाठीचे नाटक आहे असे म्हणणाऱ्यांनी, महिलांना दागिने गहाण ठेवून कर्जे भरावी लागलीत, याचे भान ठेवावे. ज्यांचे पीक वाहून गेले, ज्यांना मायक्रो फायनान्सवाल्यांचा त्रास सुरू आहे. अशांची विचारपूस करणे हे नाटक आहे का, हे एकदा स्पष्ट करावे असे आवाहनही त्यांनी केले.