शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

प्रोत्साहनपर अनुदान आदेशाची झाली रद्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही. शासन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळलेला नाही. शासन आदेशाची रद्दी झाली तरी प्रोत्साहनपर अनुदान दिले नाही. दिवाळीला गोड बातमी देऊ असे जाहीर केले आणि आता वीज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. हे आता सहन होत नाही. म्हणून २४ फेब्रुवारीला दसरा चौकात शाहू पुतळ्यासमोर एक दिवसाचे उपोषण करण्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

घाटगे म्हणाले, मी केवळ भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून नव्हे, तर शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वारस, राज्यातील शेतकरी आणि सामान्यांचा प्रतिनिधी म्हणून उपोषणाला बसणार आहे. त्या दिवशी सकाळी पत्नीसह अंबाबाईचे दर्शन घेऊन, या सरकारला सद्‌बुध्दी दे, अशी प्रार्थना करणार आहे आणि नंतर उपोषणाला सुरुवात करणार आहे.

सरकारच्या कारभाराबाबत बोलताना घाटगे म्हणाले, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याचा आदेश काढला, परंतु ते दिले नाही. मायक्रोफायनान्स वसुलीमध्ये लक्ष घालू, असे सांगितले. त्यातही काही केले नाही. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे १० हजार देऊ, असे सांगितले. पण एकही रुपया दिला नाही. कोविड काळातील वीज बिले माफ करण्याचे आश्वासन तुमच्याच मंत्र्यांनी दिले. मग आता वसुलीच्या नोटिसा कशा पाठवता? हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्यांना फसवण्याचे काम करत आहे. या उपोषणानंतरही शासनाने काही निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ.

पत्रकार परिषदेला अमल महाडिक, अशोक चराटी, बाबासाहेब पाटील, महावीर गाट, भगवान काटे, वीरेंद्र घाटगे, राजवर्धन निंबाळकर, अशोकराव माने, नाथाजी पाटील, राहुल देसाई, पृथ्वीराज यादव, विश्वजित पाटील, डॉ. अरविंद माने, अजिंक्य इंगवले, अमित गाट उपस्थित होते.

चौकट

सहकारमंत्र्यांना कोल्हापुरात का आणलं

माझ्या शिवार संवाद यात्रेनंतर सहकारमंत्री कोल्हापुरात आले. त्यांनी प्रोत्साहनात्मक अनुदानासाठी उपसमिती नेमतो, ६०० कोटींची तरतूद करतो असे सांगितले. मात्र हे ते सांगली, सातारा जिल्ह्यात बोलले नाहीत, अधिवेशनात बोलले नाहीत, तर फ्क्त कोल्हापूर जिल्ह्यातच बोलले. कारण जिल्ह्यातील वातावरण तापल्यामुळे त्यांना कोणी तरी बोलावून आणले, असा टोला समरजित यांनी लगावला.

चौकट

शेतकऱ्यांची विचारपूस करणे हे नाटक कसे

शिवार संवाद यात्रा हे प्रसिध्दीसाठीचे नाटक आहे असे म्हणणाऱ्यांनी, महिलांना दागिने गहाण ठेवून कर्जे भरावी लागलीत, याचे भान ठेवावे. ज्यांचे पीक वाहून गेले, ज्यांना मायक्रो फायनान्सवाल्यांचा त्रास सुरू आहे. अशांची विचारपूस करणे हे नाटक आहे का, हे एकदा स्पष्ट करावे असे आवाहनही त्यांनी केले.