शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महाराष्ट्रातील पहिल्या पोस्ट ्आफीस पासपोर्ट सेवा केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

By admin | Updated: March 25, 2017 15:24 IST

पासपोर्ट प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी प्रयत्नशील : ज्ञानेश्वर मुळे

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २५ : पासपोर्ट सेवा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळावी या हेतूने सामाजिक गुन्हे असलेल्या व्यक्तींना पासपोर्ट न मिळणे, पोलिस पडताळणीतील विलंब यासारख्या मुद्यांवर चर्चा करुन ही प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही भारतीय विदेश सेवा सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी दिली.

कसबा बावडा येथील रमणमळा मुख्य पोस्ट आॅफीस येथे महाराष्ट्रातील पहिल्या पोस्ट आॅफीस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. यावेळी सर्वश्री खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, डाक विभाग गोव्याचे पोस्टमास्टर जनरल विनोदकुमार शर्मा, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आदी उपस्थित होते.

सचिव डॉ. मुळे म्हणाले, डिसेंबर २०१६ पर्यंत पासपोर्ट मिळविण्यासाठी १५ कागपत्रांची पूर्तता करण्याची आवश्यकता होती परंतु त्यानंतर ती कमी करुन ९ करण्यात आली आहे. पासपोर्टसाठी आता ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही. अनाथश्रमातील मुले, घटस्फोटीत, दत्तक अशा प्रकरणात येणाऱ्या पासपोर्टच्या अडचणींची परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून सोडवणूक करण्यात आली आहे.

कोल्हापुरसारख्या चळवळीच्या जिल्ह्यात सामाजिक कारणांतून, सविनय कायदेभंग आदी स्वरुपाचे गुन्हे असलेल्या व्यक्तींना पासपोर्ट मिळावा यासाठी काय करता येईल यासंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करणार आहे व त्याकामी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करावा.

लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक एकत्र आल्यानेच कोल्हापुरातील हे पहिले पासपोर्ट सेवा केंद्र उभे राहिले आहे. तसेच पोलिस पडताळणीतला वेळ कमी व्हावा यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन तसेच स्थानिक पातळीवर जिल्हाप्रमुख यांच्याशी बैठक घेऊन चर्चा करु, असे मुळे म्हणाले.