शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

शहरात अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर व बालिंगाजवळील नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुढील दोन दिवस शहराला ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर व बालिंगाजवळील नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पुढील दोन दिवस शहराला अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती शहर पाणी पुरवठा विभागाने पत्रकाद्वारे दिली.

शिंगणापूर व बालिंगा येथे नदीतील पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे तेथील उपसा केंद्रातून पुरेशा प्रमाणात पाणी उपसा होत नाही. पाटबंधारे विभागाकडून राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. तथापि सोडलेले पाणी पंचगंगा नदीपात्रामध्ये शिंगणापूर बंधारा येथे येण्यासाठी गुरूवारी दुपारपर्यंतचा कालावधी लागणार आहे.

त्यामुळे बुधवारी व गुरूवारी संपूर्ण कोल्हापूर शहर व त्याला संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नळ जोडणीधारकांना होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल तर काही भागात पाणी पुरवठा होणार नाही. बुधवारी शहरात अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.