शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

कागलमध्ये शेतकऱ्यांनीच हाती घेतले ऊसदराचे आंदोलन

By विश्वास पाटील | Updated: November 15, 2023 15:19 IST

धुरांडी धिम्या गतीनेच : सर्वच गटाचे कार्यकर्ते आंदोलनात

दत्ता पाटील, कागल : ऊसदरावरुन सुरू असणाऱ्या आंदोलनाचे लोण राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातही पोहचले आहे. त्यामुळे येथील कारखाने सुरू होवून १५ दिवस उलटले तरीही धिम्या गतीनेच सुरू आहेत. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव कमी असला तरी आता आपल्या न्याय्य हक्कांसाठी राजकीय गट-तटाला तिलांजली देऊन शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत.

सध्या अपवाद वगळता शेतकरी आणि वाहनधारकांचे नुकसान होवू नये यासाठी समन्वय साधत शांततेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे.माञ, राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या तालुक्यातही चळवळीला बळ मिळतयं ही बाब अधोरेखित करणारीच आहे. तालुक्यातील अनेक गावात शेतकरी संघटनेच्या शाखाही स्थापन झाल्या आहेत. कागल तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी अनेक दिवसांपासून जिल्ह्यावर अधिराज्य गाजवले आहे.त्यामुळे येथे गट तटाला अधिक महत्त्व आहे.परंतु, राजकीय सत्तेसाठी नेते मंडळींकडूनच सोयीचे राजकारण केले जात आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांसह जनतेमध्येही आपल्या हिताचा विचार पुढे येताना दिसत आहे.

मागील वर्षीच्या ऊसाला ४००रु. व यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ३हजार५०० रु भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पदयाञेला कागल तालुक्यातही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून महिनाभर येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यासह शेतकरीही ऊसतोड बंद करण्यासाठी प्रबोधन करत आहेत.

दरम्यान, कागलमधील छञपती शाहू, हमिदवाडा,बिद्री यांनी पंधरा दिवसापुर्वी तर अन्नपूर्णा शुगरने महिन्यांपूर्वी धुरांडी पेटविली आहेत. माञ, आंदोलनामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

रात्रीचा दिवस...

ऊसाला दरवाढ मिळाली तर ती केवळ आंदोलन करणाऱ्यांनाच मिळणार नाही. तर ती सर्वांनाच मिळणार आहे... चार दिवस संयम ठेवा... असे प्रबोधन करत मोटररँलीसह येथील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काही जण राञीची चुप्पी ऊसवाहतुक करत आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर कार्यकर्ते पहारा देवून राञी जागवत आहेत.

गुरुंनंतर आता शिष्यांकडून अपेक्षा...

२०१३ च्या हंगामात स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी फोडली होती. तर सध्या त्यांचेच राजकीय शिष्य हसन मुश्रीफ हे पालकमंत्री आहेत. आता त्यांनीच यामध्ये समन्वयाची भूमिका घेवून तोडगा काढावा अशी मागणीही शेतकऱ्यातून होत आहे.

कारखानदारांची अशीही गोची..

कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात कागलमधील शेतकरी स्वयंस्फूर्तीने ऊसदराच्या आंदोलनात रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावात ऊसदराचा तिढा सुटेपर्यंत ऊसतोड न घेण्याचा ठरावही करुन कारखानदारांची गोची केली जात आहे. त्यामुळे राजकीय मंडळींना यातुन बोध घ्यावा लागणार आहे.

मुरगुडमधील सभेकडे नजरा...

राजू शेट्टी पंधरावडयात दुसऱ्यांदा कागल तालुक्यात येत आहेत. त्यामुळे येथील आंदोलनाची धार तीव्र होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती आतबट्ट्याची झाली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मुरगुड मधील सभेत चितावणी दिली तर येथील तरुण आक्रमक होवून आंदोलन तीव्र करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे येथील जाणकारांतून बोलले जात आहे.

टॅग्स :kagal-acकागल