शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

कागलमध्ये शेतकऱ्यांनीच हाती घेतले ऊसदराचे आंदोलन

By विश्वास पाटील | Updated: November 15, 2023 15:19 IST

धुरांडी धिम्या गतीनेच : सर्वच गटाचे कार्यकर्ते आंदोलनात

दत्ता पाटील, कागल : ऊसदरावरुन सुरू असणाऱ्या आंदोलनाचे लोण राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातही पोहचले आहे. त्यामुळे येथील कारखाने सुरू होवून १५ दिवस उलटले तरीही धिम्या गतीनेच सुरू आहेत. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव कमी असला तरी आता आपल्या न्याय्य हक्कांसाठी राजकीय गट-तटाला तिलांजली देऊन शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत.

सध्या अपवाद वगळता शेतकरी आणि वाहनधारकांचे नुकसान होवू नये यासाठी समन्वय साधत शांततेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे.माञ, राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या तालुक्यातही चळवळीला बळ मिळतयं ही बाब अधोरेखित करणारीच आहे. तालुक्यातील अनेक गावात शेतकरी संघटनेच्या शाखाही स्थापन झाल्या आहेत. कागल तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी अनेक दिवसांपासून जिल्ह्यावर अधिराज्य गाजवले आहे.त्यामुळे येथे गट तटाला अधिक महत्त्व आहे.परंतु, राजकीय सत्तेसाठी नेते मंडळींकडूनच सोयीचे राजकारण केले जात आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांसह जनतेमध्येही आपल्या हिताचा विचार पुढे येताना दिसत आहे.

मागील वर्षीच्या ऊसाला ४००रु. व यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ३हजार५०० रु भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पदयाञेला कागल तालुक्यातही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून महिनाभर येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यासह शेतकरीही ऊसतोड बंद करण्यासाठी प्रबोधन करत आहेत.

दरम्यान, कागलमधील छञपती शाहू, हमिदवाडा,बिद्री यांनी पंधरा दिवसापुर्वी तर अन्नपूर्णा शुगरने महिन्यांपूर्वी धुरांडी पेटविली आहेत. माञ, आंदोलनामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

रात्रीचा दिवस...

ऊसाला दरवाढ मिळाली तर ती केवळ आंदोलन करणाऱ्यांनाच मिळणार नाही. तर ती सर्वांनाच मिळणार आहे... चार दिवस संयम ठेवा... असे प्रबोधन करत मोटररँलीसह येथील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काही जण राञीची चुप्पी ऊसवाहतुक करत आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर कार्यकर्ते पहारा देवून राञी जागवत आहेत.

गुरुंनंतर आता शिष्यांकडून अपेक्षा...

२०१३ च्या हंगामात स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी फोडली होती. तर सध्या त्यांचेच राजकीय शिष्य हसन मुश्रीफ हे पालकमंत्री आहेत. आता त्यांनीच यामध्ये समन्वयाची भूमिका घेवून तोडगा काढावा अशी मागणीही शेतकऱ्यातून होत आहे.

कारखानदारांची अशीही गोची..

कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात कागलमधील शेतकरी स्वयंस्फूर्तीने ऊसदराच्या आंदोलनात रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावात ऊसदराचा तिढा सुटेपर्यंत ऊसतोड न घेण्याचा ठरावही करुन कारखानदारांची गोची केली जात आहे. त्यामुळे राजकीय मंडळींना यातुन बोध घ्यावा लागणार आहे.

मुरगुडमधील सभेकडे नजरा...

राजू शेट्टी पंधरावडयात दुसऱ्यांदा कागल तालुक्यात येत आहेत. त्यामुळे येथील आंदोलनाची धार तीव्र होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती आतबट्ट्याची झाली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मुरगुड मधील सभेत चितावणी दिली तर येथील तरुण आक्रमक होवून आंदोलन तीव्र करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे येथील जाणकारांतून बोलले जात आहे.

टॅग्स :kagal-acकागल