शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

कागलमध्ये शेतकऱ्यांनीच हाती घेतले ऊसदराचे आंदोलन

By विश्वास पाटील | Updated: November 15, 2023 15:19 IST

धुरांडी धिम्या गतीनेच : सर्वच गटाचे कार्यकर्ते आंदोलनात

दत्ता पाटील, कागल : ऊसदरावरुन सुरू असणाऱ्या आंदोलनाचे लोण राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातही पोहचले आहे. त्यामुळे येथील कारखाने सुरू होवून १५ दिवस उलटले तरीही धिम्या गतीनेच सुरू आहेत. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव कमी असला तरी आता आपल्या न्याय्य हक्कांसाठी राजकीय गट-तटाला तिलांजली देऊन शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत.

सध्या अपवाद वगळता शेतकरी आणि वाहनधारकांचे नुकसान होवू नये यासाठी समन्वय साधत शांततेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे.माञ, राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या तालुक्यातही चळवळीला बळ मिळतयं ही बाब अधोरेखित करणारीच आहे. तालुक्यातील अनेक गावात शेतकरी संघटनेच्या शाखाही स्थापन झाल्या आहेत. कागल तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी अनेक दिवसांपासून जिल्ह्यावर अधिराज्य गाजवले आहे.त्यामुळे येथे गट तटाला अधिक महत्त्व आहे.परंतु, राजकीय सत्तेसाठी नेते मंडळींकडूनच सोयीचे राजकारण केले जात आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांसह जनतेमध्येही आपल्या हिताचा विचार पुढे येताना दिसत आहे.

मागील वर्षीच्या ऊसाला ४००रु. व यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ३हजार५०० रु भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पदयाञेला कागल तालुक्यातही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून महिनाभर येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यासह शेतकरीही ऊसतोड बंद करण्यासाठी प्रबोधन करत आहेत.

दरम्यान, कागलमधील छञपती शाहू, हमिदवाडा,बिद्री यांनी पंधरा दिवसापुर्वी तर अन्नपूर्णा शुगरने महिन्यांपूर्वी धुरांडी पेटविली आहेत. माञ, आंदोलनामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

रात्रीचा दिवस...

ऊसाला दरवाढ मिळाली तर ती केवळ आंदोलन करणाऱ्यांनाच मिळणार नाही. तर ती सर्वांनाच मिळणार आहे... चार दिवस संयम ठेवा... असे प्रबोधन करत मोटररँलीसह येथील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काही जण राञीची चुप्पी ऊसवाहतुक करत आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर कार्यकर्ते पहारा देवून राञी जागवत आहेत.

गुरुंनंतर आता शिष्यांकडून अपेक्षा...

२०१३ च्या हंगामात स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी फोडली होती. तर सध्या त्यांचेच राजकीय शिष्य हसन मुश्रीफ हे पालकमंत्री आहेत. आता त्यांनीच यामध्ये समन्वयाची भूमिका घेवून तोडगा काढावा अशी मागणीही शेतकऱ्यातून होत आहे.

कारखानदारांची अशीही गोची..

कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात कागलमधील शेतकरी स्वयंस्फूर्तीने ऊसदराच्या आंदोलनात रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावात ऊसदराचा तिढा सुटेपर्यंत ऊसतोड न घेण्याचा ठरावही करुन कारखानदारांची गोची केली जात आहे. त्यामुळे राजकीय मंडळींना यातुन बोध घ्यावा लागणार आहे.

मुरगुडमधील सभेकडे नजरा...

राजू शेट्टी पंधरावडयात दुसऱ्यांदा कागल तालुक्यात येत आहेत. त्यामुळे येथील आंदोलनाची धार तीव्र होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती आतबट्ट्याची झाली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मुरगुड मधील सभेत चितावणी दिली तर येथील तरुण आक्रमक होवून आंदोलन तीव्र करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे येथील जाणकारांतून बोलले जात आहे.

टॅग्स :kagal-acकागल