शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
5
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
6
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
7
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
8
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
9
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
10
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
11
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
12
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
13
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
14
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
15
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
16
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
17
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
18
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
19
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
20
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

घरफाळ्यात वाढ अशक्य

By admin | Updated: March 27, 2016 00:51 IST

शहरवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न : महासभेचा निर्णय कायद्यातील तरतुदींनुसारच

भारत चव्हाण / कोल्हापूर महानगरपालिका पदाधिकारी, नगरसेवकांनी घरफाळा वाढ न करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसारच घेतला असल्याने आता कोणत्याही परिस्थितीत घरफाळा वाढणार नसून, पूर्वीप्रमाणेच तो आकारला जाईल, असे महापालिका कायद्याच्या जाणकारांनी सांगितले. भांडवली मूल्य किती असावे, घरफाळ्याचे दर किती असावेत, हे ठरविण्याचा अधिकार महासभेचा असून त्यास अनुसरूनच हा निर्णय झाल्यामुळे शासनाने तो विखंडित करण्याचा प्रश्नच येणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. फेबु्रवारी महिन्यात महासभेसमोर घरफाळा वाढीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यामध्ये सरसकट वाढ न करता भांडवली मूल्यानुसार पाच ते तीस टक्के अशी वाढ सुचविली होती. त्याबाबत समाजातील विविध राजकीय पक्ष व संघटनांनी घरफाळा वाढ करू नये, अशी मागणी केली होती. तसेच जर प्रशासनाने वाढ लादण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या सर्वच पदाधिकारी तसेच नगरसेवकांनी त्यास कडाडून विरोध केला आणि महासभेत तो फेटाळला होता; परंतु प्रशासनाने हा प्रस्ताव शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठविणार आहोत, असे सांगत घरफाळा वाढीची टांगती तलवार कायम ठेवली आहे. त्यामुळे त्याबाबत पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कायद्यातील अभ्यासकांचे मत काय आहे, याबाबत जाणून घेतले असता महासभेने घेतलेला निर्णय कायद्यातील तरतुदीनुसार घेतला असून, त्यात आता शासन काही बदल करणार नाही, असे सांगण्यात आले. कायद्यातील कलम ९९ नुसार घरफाळा कसा आकारावा, त्याचे दर काय असावेत आणि भांडवली मूल्य किती असावे, हे ठरविण्याचा अधिकार हा महासभेला आहे. प्रशासन पुढील वर्षाचा विचार करून प्रत्येक वर्षी दरवाढ करण्याचा प्रस्ताव देत असते; परंतु तो मान्य करायचा की अमान्य करायचा, याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा महासभेचा अर्थात नगरसेवकांचा असतो. याच कायद्यात प्रत्येक पाच वर्षांनी भांडवली मूल्य सुधारित करावे, असा नियम आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने भांडवली मूल्य १ एप्रिल २०११ रोजी सुधारित केले होते. म्हणजे पाच वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु भांडवली मूल्य सुधारित करीत असताना सर्व बाजूंनी विचार करता पूर्वीचेच (सन २०११-२०१२) भांडवली मूल्य कायम करण्याचा अधिकार महासभेलाच आहे. फेब्रुवारीत महासभेत घेतलेला निर्णय हा मिळकतधारकांचा विचार करून घेतला आहे. मात्र त्यात महापालिकेच्या आर्थिक हिताला कसलीही बाधा आलेली नाही. कायद्यातील सर्व तरतुदींचा अभ्यास करता महासभेने घेतलेला घरफाळा वाढ न करण्याचा निर्णय योग्यच असून, १ एप्रिल २०१६ पासून जुन्याच दराप्रमाणे घरफाळा आकारणी करणे प्रशासनास क्रमप्राप्त आहे.